शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
3
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
4
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
5
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
6
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
7
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
8
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
9
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
10
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
11
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
12
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
13
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
14
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
15
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
16
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
17
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
18
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
19
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
20
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!

तांब्याचीवाडी, भटवाडी होणार प्रकाशमान

By admin | Updated: June 25, 2016 00:47 IST

‘लोकमत’चा पुढाकार : स्वातंत्र्याच्या ६९ वर्षांनंतर या गावांमध्ये पहिल्यांदा वीजपुरवठा; प्रकाश आबिटकर यांचे प्रयत्न

शिवाजी सावंत-- गारगोटी भुदरगड तालुक्यातील तांब्याचीवाडी आणि भटवाडी या गावांमध्ये स्वातंत्र्याच्या ६९ वर्षांनंतर पहिल्यांदा वीजपुरवठा होणार असल्याने या दोन्ही गावांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. ही गावे प्रकाशमय होण्यासाठी आमदार प्रकाश आबिटकर यांनी प्रयत्न केले आहेत.तालुक्याच्या पश्चिम टोकाला शेवटची असणारी ही दोन गावे एरवी कोणाच्याही खीजगणतीत नसतात. मतदान कमी असल्याने केवळ निवडणुका जवळ आल्या की आश्वासने देऊन उमेदवार पसार झाले की पुन्हा निवडणूक आल्यानंतर हजर होतात. उमेदवाराने आश्वासन दिले की, तेथील भोळीभाबडी जनता गावात वीज येणार या आशेने एकटाकी मतदान करतात. उमेदवार निवडून आला की पुन्हा त्याला या मतदारांची आठवण राहत नाही, अशा परिस्थितीत या गावातील ग्रामस्थांना गप्प बसण्याशिवाय पर्याय नव्हता. देश स्वतंत्र होऊन ६९ वर्षे पूर्ण झाली आहेत, तरी ही गावे अंधारात होती़. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केले होते.गत विधानसभा निवडणुकीपूर्वी विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर यांनी मतदारसंघातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी संघर्ष यात्रा काढण्याचा निर्णय घेतला. या यात्रेची सुरुवात झाली. ही यात्रा मतदारसंघात फिरत फिरत या गावांमध्ये आल्यानंतर एका शाळकरी विद्यार्थ्याने आमदार आबिटकरांच्या हाताला धरून म्हणाला ‘साहेब, आम्हालाही शाळा शिकायची आहे. आमच्याकडे लक्ष देता का?’ हे वाक्य ऐकल्यावर आमदार आबिटकरांच्या अंगावर काटा उभा राहिला आणि त्या मुलांची आगतिकता पाहून डोळ्यांत पाणी तरळले. त्यांनी मनाचा निश्चय केला की, आमदार होऊ अगर ना होऊ, पण पदाच्या पलीकडे जाऊन या गावांना वीजपुरवठा करण्यासाठी जिवाचे रान करायचे; पण वीज मिळवून द्यायची.यानंतर सुदैवाने ते विक्रमी मतांनी विजयी झाले. त्यांना ती मुले सदोदित नजरेस दिसत होती. त्यांनी महाराष्ट्र शासन आणि महावितरण कंपनीच्या माध्यमातून ६९ लाख रुपये खर्चून या दोन्ही ठिकाणी वीजपुरवठा पोहोचविण्यात यश मिळविले. ही घटना म्हणजे खऱ्या अर्थाने ही दोन गावे ‘प्रकाशमान’ झाली आहेत, ही वचनपूर्तीची साक्ष देत आहेत.विद्यार्थ्यांसाठी अग्रक्रमाने काम पूर्ण प्रकाश आबिटकर म्हणाले, राजकारणात उलथापालथी होत असतातच; पण समाजाचे प्रतिनिधित्व करीत असताना काही रचनात्मक काम करणे हे आपले कर्तव्य आहे. स्वातंत्र्याच्या सत्तरीत ही गावे अंधारात ठेवून आपण नेमका कोणता विकास साधला आहे? या प्रश्नाचे उत्तर सर्व राजकीय पक्षांना भविष्यात द्यावे लागले असते. याशिवाय त्या निरागस विद्यार्थ्यांचा चेहरा सदैव माझ्या डोळ्यांसमोर उभा राहत होता, म्हणून मी अग्रक्रमाने हे काम पूर्ण करण्याची काळजी घेतली.