शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

तांब्याचीवाडी, भटवाडी होणार प्रकाशमान

By admin | Updated: June 25, 2016 00:47 IST

‘लोकमत’चा पुढाकार : स्वातंत्र्याच्या ६९ वर्षांनंतर या गावांमध्ये पहिल्यांदा वीजपुरवठा; प्रकाश आबिटकर यांचे प्रयत्न

शिवाजी सावंत-- गारगोटी भुदरगड तालुक्यातील तांब्याचीवाडी आणि भटवाडी या गावांमध्ये स्वातंत्र्याच्या ६९ वर्षांनंतर पहिल्यांदा वीजपुरवठा होणार असल्याने या दोन्ही गावांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. ही गावे प्रकाशमय होण्यासाठी आमदार प्रकाश आबिटकर यांनी प्रयत्न केले आहेत.तालुक्याच्या पश्चिम टोकाला शेवटची असणारी ही दोन गावे एरवी कोणाच्याही खीजगणतीत नसतात. मतदान कमी असल्याने केवळ निवडणुका जवळ आल्या की आश्वासने देऊन उमेदवार पसार झाले की पुन्हा निवडणूक आल्यानंतर हजर होतात. उमेदवाराने आश्वासन दिले की, तेथील भोळीभाबडी जनता गावात वीज येणार या आशेने एकटाकी मतदान करतात. उमेदवार निवडून आला की पुन्हा त्याला या मतदारांची आठवण राहत नाही, अशा परिस्थितीत या गावातील ग्रामस्थांना गप्प बसण्याशिवाय पर्याय नव्हता. देश स्वतंत्र होऊन ६९ वर्षे पूर्ण झाली आहेत, तरी ही गावे अंधारात होती़. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केले होते.गत विधानसभा निवडणुकीपूर्वी विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर यांनी मतदारसंघातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी संघर्ष यात्रा काढण्याचा निर्णय घेतला. या यात्रेची सुरुवात झाली. ही यात्रा मतदारसंघात फिरत फिरत या गावांमध्ये आल्यानंतर एका शाळकरी विद्यार्थ्याने आमदार आबिटकरांच्या हाताला धरून म्हणाला ‘साहेब, आम्हालाही शाळा शिकायची आहे. आमच्याकडे लक्ष देता का?’ हे वाक्य ऐकल्यावर आमदार आबिटकरांच्या अंगावर काटा उभा राहिला आणि त्या मुलांची आगतिकता पाहून डोळ्यांत पाणी तरळले. त्यांनी मनाचा निश्चय केला की, आमदार होऊ अगर ना होऊ, पण पदाच्या पलीकडे जाऊन या गावांना वीजपुरवठा करण्यासाठी जिवाचे रान करायचे; पण वीज मिळवून द्यायची.यानंतर सुदैवाने ते विक्रमी मतांनी विजयी झाले. त्यांना ती मुले सदोदित नजरेस दिसत होती. त्यांनी महाराष्ट्र शासन आणि महावितरण कंपनीच्या माध्यमातून ६९ लाख रुपये खर्चून या दोन्ही ठिकाणी वीजपुरवठा पोहोचविण्यात यश मिळविले. ही घटना म्हणजे खऱ्या अर्थाने ही दोन गावे ‘प्रकाशमान’ झाली आहेत, ही वचनपूर्तीची साक्ष देत आहेत.विद्यार्थ्यांसाठी अग्रक्रमाने काम पूर्ण प्रकाश आबिटकर म्हणाले, राजकारणात उलथापालथी होत असतातच; पण समाजाचे प्रतिनिधित्व करीत असताना काही रचनात्मक काम करणे हे आपले कर्तव्य आहे. स्वातंत्र्याच्या सत्तरीत ही गावे अंधारात ठेवून आपण नेमका कोणता विकास साधला आहे? या प्रश्नाचे उत्तर सर्व राजकीय पक्षांना भविष्यात द्यावे लागले असते. याशिवाय त्या निरागस विद्यार्थ्यांचा चेहरा सदैव माझ्या डोळ्यांसमोर उभा राहत होता, म्हणून मी अग्रक्रमाने हे काम पूर्ण करण्याची काळजी घेतली.