शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
2
२ डॉक्टर अन् मशिदीच्या इमामासह ७ जणांना अटक, 'व्हाइट कॉलर' दहशतवाद्यांचा पर्दाफाश, पोलिसांनी केले धक्कादायक खुलासे
3
ब्युटी आणि फॅशन क्षेत्रातील 'हा' शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकाजवळ, वर्षात ५७% रिटर्न, अजूनही संधी?
4
SIP ने केले मालामाल! ५ वर्षांत २९ फंड्सचा २०% हून अधिक परतावा; 'मिड कॅप'ची जबरदस्त कामगिरी
5
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील...
6
मत फुटले तरी लंकेंनी नगरपंचायत राखली! पारनेरच्या नगराध्यक्षपदी डॉ. विद्या कावरे, मविआने उधळला विजयाचा गुलाल
7
'महेंद्र दळवी डोक्यावर पडलेले आमदार'; शिंदेंची शिवसेना-अजित पवारांच्या राष्ट्रवादीत संघर्षाचा भडका
8
आयटी क्षेत्रामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीची मोठी झेप; पण, टाटा समूहातील 'हा' शेअर भयावह घसरला
9
CSK ‘खिडकी’तून बाहेर काढणार असल्याची चर्चा! त्यातच जड्डू Insta वरून ‘गायब’
10
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
11
५ स्टार सेफ्टी रेटिंग अन् तब्बल ७५००० डिस्काउंट असणारी कार ह्युंदाईने वेबसाईटवरूनच काढून टाकली! विक्रीही बंद होणार?
12
भंगार विक्रीतून सरकार झालं मालमाल; इतक्या कमाईत खरेदी करू शकतात ७ वंदे भारत ट्रेन
13
Video - दारूने भरलेले ग्लास, तळलेले शेंगदाणे... बंगळुरूच्या सेंट्रल जेलमध्ये कैद्यांची जंगी पार्टी
14
सत्य साईबाबा: चमत्कारी जीवन, भक्तांमध्ये दिग्गज सेलिब्रेटी, आजही जगभर अनुयायी; काय होते वैशिष्ट्य?
15
भारतात लाँच होणार लठ्ठपणावरचं नवं औषध, कंपनीचा शेअर बनला रॉकेट; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड
16
दिल्लीचे जवाहरलाल नेहरू स्टेडियम तोडले जाणार; केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचा मोठा निर्णय
17
भाजपाची त्सुनामी! १२२ पैकी १०७ जागा जिंकून ‘या’ ठिकाणी मिळवला मोठा विजय, काँग्रेसला २ जागा
18
रुपाली ठोंबरे पाटील, अमोल मिटकरींना अजित पवारांचा धक्का; राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदावरून हटवलं
19
भोपाळमध्ये मॉडेल खुशबूचा संशयास्पद मृत्यू; आईनं लावला 'लव्ह जिहाद'चा आरोप, प्रियकराला अटक
20
आता घरबसल्या आधारकार्डमध्ये करा बदल; UIDAI कडून नवीन आधार अ‍ॅप लाँच, वैशिष्ट्ये पाहून शॉक व्हाल

तांब्याचीवाडी, भटवाडी होणार प्रकाशमान

By admin | Updated: June 25, 2016 00:47 IST

‘लोकमत’चा पुढाकार : स्वातंत्र्याच्या ६९ वर्षांनंतर या गावांमध्ये पहिल्यांदा वीजपुरवठा; प्रकाश आबिटकर यांचे प्रयत्न

शिवाजी सावंत-- गारगोटी भुदरगड तालुक्यातील तांब्याचीवाडी आणि भटवाडी या गावांमध्ये स्वातंत्र्याच्या ६९ वर्षांनंतर पहिल्यांदा वीजपुरवठा होणार असल्याने या दोन्ही गावांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. ही गावे प्रकाशमय होण्यासाठी आमदार प्रकाश आबिटकर यांनी प्रयत्न केले आहेत.तालुक्याच्या पश्चिम टोकाला शेवटची असणारी ही दोन गावे एरवी कोणाच्याही खीजगणतीत नसतात. मतदान कमी असल्याने केवळ निवडणुका जवळ आल्या की आश्वासने देऊन उमेदवार पसार झाले की पुन्हा निवडणूक आल्यानंतर हजर होतात. उमेदवाराने आश्वासन दिले की, तेथील भोळीभाबडी जनता गावात वीज येणार या आशेने एकटाकी मतदान करतात. उमेदवार निवडून आला की पुन्हा त्याला या मतदारांची आठवण राहत नाही, अशा परिस्थितीत या गावातील ग्रामस्थांना गप्प बसण्याशिवाय पर्याय नव्हता. देश स्वतंत्र होऊन ६९ वर्षे पूर्ण झाली आहेत, तरी ही गावे अंधारात होती़. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केले होते.गत विधानसभा निवडणुकीपूर्वी विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर यांनी मतदारसंघातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी संघर्ष यात्रा काढण्याचा निर्णय घेतला. या यात्रेची सुरुवात झाली. ही यात्रा मतदारसंघात फिरत फिरत या गावांमध्ये आल्यानंतर एका शाळकरी विद्यार्थ्याने आमदार आबिटकरांच्या हाताला धरून म्हणाला ‘साहेब, आम्हालाही शाळा शिकायची आहे. आमच्याकडे लक्ष देता का?’ हे वाक्य ऐकल्यावर आमदार आबिटकरांच्या अंगावर काटा उभा राहिला आणि त्या मुलांची आगतिकता पाहून डोळ्यांत पाणी तरळले. त्यांनी मनाचा निश्चय केला की, आमदार होऊ अगर ना होऊ, पण पदाच्या पलीकडे जाऊन या गावांना वीजपुरवठा करण्यासाठी जिवाचे रान करायचे; पण वीज मिळवून द्यायची.यानंतर सुदैवाने ते विक्रमी मतांनी विजयी झाले. त्यांना ती मुले सदोदित नजरेस दिसत होती. त्यांनी महाराष्ट्र शासन आणि महावितरण कंपनीच्या माध्यमातून ६९ लाख रुपये खर्चून या दोन्ही ठिकाणी वीजपुरवठा पोहोचविण्यात यश मिळविले. ही घटना म्हणजे खऱ्या अर्थाने ही दोन गावे ‘प्रकाशमान’ झाली आहेत, ही वचनपूर्तीची साक्ष देत आहेत.विद्यार्थ्यांसाठी अग्रक्रमाने काम पूर्ण प्रकाश आबिटकर म्हणाले, राजकारणात उलथापालथी होत असतातच; पण समाजाचे प्रतिनिधित्व करीत असताना काही रचनात्मक काम करणे हे आपले कर्तव्य आहे. स्वातंत्र्याच्या सत्तरीत ही गावे अंधारात ठेवून आपण नेमका कोणता विकास साधला आहे? या प्रश्नाचे उत्तर सर्व राजकीय पक्षांना भविष्यात द्यावे लागले असते. याशिवाय त्या निरागस विद्यार्थ्यांचा चेहरा सदैव माझ्या डोळ्यांसमोर उभा राहत होता, म्हणून मी अग्रक्रमाने हे काम पूर्ण करण्याची काळजी घेतली.