शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणं युद्धासारखंच!
2
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
3
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
4
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
5
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
6
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
7
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
8
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
9
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
10
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
11
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
12
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
13
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
14
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
15
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
16
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
17
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
18
भारतात फुलटाइम स्टॉक ट्रेडर बनण्यासाठी जवळ किती पैसे असायला पाहिजे?
19
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
20
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला

उद्योगांचा सूर.. नंबर वन कोल्हापूर; जिल्ह्यातील १२०० हून अधिक तरुणांनी उभारले उद्योग  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 19:31 IST

जिल्हा उद्योग केंद्राची अतुलनीय कामगिरी

पोपट पवारकोल्हापूर : एकीकडे नोकरी नाही म्हणत सरकारच्या नावाने ओरडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असली, तरी सरकारच्याच योजनांचा योग्यरीत्या लाभ घेत कोल्हापूर जिल्ह्यातील १२०० हून अधिक तरुण नवउद्योजकांनी स्वत:चे उद्योग-व्यवसाय उभारत ‘राज्यात भारी, आम्ही कोल्हापुरी’चा नारा बुलंद केला आहे. २०२४-२५ या एका वर्षात मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रमांतर्गत (सीएमईजीपी) १२२२ जणांनी उद्योग उभारून राज्यात सर्वाधिक उद्योग, सर्वाधिक अनुदान व सर्वाधिक अनुदानाचे वाटप करत तिन्ही कॅटेगरीत कोल्हापूर जिल्हा नंबर वन ठरला आहे. मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती योजनेद्वारे उत्पादन क्षेत्रातील उद्योजकाला ५० लाख रुपये, तर सेवा क्षेत्रातील उद्योजकाला २० लाखांपर्यंत कर्ज दिले जाते. सर्वसाधारण प्रवर्गातील उद्योजकाला प्रकल्पाच्या एकूण कर्ज रकमेच्या १५ ते २५ टक्के, तर विशेष प्रवर्ग, एससी, एसटी, अपंग, माजी सैनिक, ओबीसी व अल्पसंख्यकांना २५ ते ३५ टक्के अनुदान दिले जाते. जिल्हा उद्योग केंद्राकडे अर्ज केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने मान्यता दिल्यानंतर संबंधित प्रकरण बँकेकडे जाते. बँकेने कर्ज प्रकरणाला मंजुरी दिल्यानंतर लाभार्थींच्या खात्यात अनुदान जमा होते. १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ या आर्थिक वर्षात जिल्हा उद्योग केंद्राला सीएमईजीपी अंतर्गत १२०० लाभार्थी करण्याचे उद्दिष्ट दिले होते. जिल्हा उद्योग केंद्राने १२२२ जणांना लाभ देत १०१.८ टक्के इतके उद्दिष्ट गाठले आहे. गारमेंटमध्ये सर्वाधिक १४४, अन्न प्रक्रिया २६, ब्युटीमध्ये ३२, फॅशन डिझायनिंगमध्ये ४०, टेक्सटाईलमध्ये ४५, ट्रान्सपोर्टमध्ये ६० असे उद्योग उभारले आहेत.७० कोटींचे अनुदानऔद्योगिक मशिनरी, मसाले, बेदाणे, बेकरी, अन्नप्रक्रिया, पैठणी, पॉवरलूम यासारख्या उद्योगांना अनुदान दिले जाते. जिल्ह्यात २०२४-२५ या एका वर्षात ७० कोटी ४० लाख रुपयांचे अनुदान लाभार्थ्यांना मंजूर झाले. यातील ३२ कोटी २२ लाख रुपयांच्या अनुदानाचे वाटप करण्यात आले. ही संख्या राज्यात सर्वाधिक आहे.

कोणत्या तालुक्यात किती लाभार्थीतालुका -  उद्दिष्ट - मंजूर  -  टक्केवारीकरवीर  -   ३५६  - ३८१  - १०७शिरोळ  - १२०  - १४४  -  १२०हातकणंगले  - २२०  -  ३२७  - १४८.६पन्हाळा  - ८०  - ९७ - १२१.३गगनबावडा - २० -  १२ - ६०भुदरगड - ६० -  ३२  - ५३.३३राधानगरी  - ६४   -  ८०  - १२५शाहुवाडी  -  ४०   -  २९  -  ७२.५कागल  -  ८०  - ५५  -  ६८.७५गडहिंग्लज -  ८०  -  ३१  -  ३८.७५आजरा  - ४०  -  १२  - ३०चंदगड  - ४०  - २२   -  ५५राष्ट्रीयीकृत बँका भारीसीएमईजीपीत जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांच्या २३१ शाखांनी ८४६ इतकी कर्ज प्रकरणे मंजूर केली आहेत. तर खासगी बँकांच्या १९७ शाखांमधून अवघी २४२ कर्ज प्रकरणे मंजूर करण्यात आली.

मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रमांतर्गत उद्योग-व्यवसाय उभारण्यासाठी अनुदान दिले जाते. २०२४-२५ या एका वर्षात १२२२ जणांनी याचा लाभ घेतला आहे. सीएमईजीपीत जिल्ह्याने उद्दिष्ट पूर्ण केले असून, अनुदान वाटपात कोल्हापूर राज्यात अव्वल आहे. - अजयकुमार पाटील, महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, कोल्हापूर

टॅग्स :kolhapurकोल्हापूर