शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ब्लू इकॉनॉमीकडे झेप, तब्बल १२ लाख कोटींचे करार; शिवछत्रपतींच्या विचारांनी भारत प्रगतीपथावर
2
राज ठाकरेही मेळाव्यात फोडणार मतचोरीचा बॉम्ब? बोगस नावे, मतचोरी, EVM घोटाळ्यांवर सादरीकरण
3
मुंबई पालिकेची निवडणूक जानेवारीच होणार? आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला, आयोगाकडून सूचना प्रसिद्ध
4
५ नोव्हेंबरपर्यंत पाऊसधारांचा अंदाज; कमी दाबाचा पट्टा ओमानकडे जाण्याऐवजी किनारपट्ट्यांवर रेंगाळला
5
सावध व्हा, ‘कॉल मर्जिंग स्कॅम’ धाेका ! नव्या पद्धतीने केवळ काही अवधीत लाखो रुपयांवर डल्ला
6
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
7
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
8
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
9
काँग्रेसमध्ये महापालिकेसाठी इच्छुकांची गर्दी; आले ४५० अर्ज, इच्छुकांकडून ५०० रुपये शुल्क
10
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
11
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
12
सेंट जॉर्जेस रुग्णालयातील मृत्यूदर का वाढला? दाखल रुग्णांपैकी २४ ते २५ टक्के जण दगावतात
13
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
14
अर्बन कंपनी सर्च केले आणि ऑनलाइन मेड मागविली; महिलेचे खातेच झाले रिकामे
15
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
16
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
17
संभाव्य दुबार मतदारांची तपासणी करा; राज्य निवडणूक आयोगाचे मतदार याद्यांबाबत आदेश
18
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
19
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
20
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!

Kolhapur: प्राधिकारण विश्वासात घेऊन करा, जोतिबा ग्रामस्थांची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2025 12:14 IST

नक्की काय करणार याबद्दल संभ्रमाचे वातावरण

जोतिबा : संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत असेलल्या श्री क्षेत्र जोतिबा डोंगर परिसराचा सर्वांगीण विकास व्हावा, अशी आमचीही इच्छा आहे. विकास जरूर करा, हवं तर त्यासाठी प्राधिकरण करा; पण आम्हाला विश्वासात घ्या, अशी जोतिबा ग्रामस्थांची अपेक्षा आहे.गेली कित्येक वर्षे मंदिर विकासाच्या चर्चा सुरू आहेत. १७०० कोटींचा आराखडा केला गेला, प्राधिकरणाचा निर्णय झाला, त्यात आमचे काय होणार आहे. डोंगर मोकळा करून आम्ही विस्थापित होणार का, आमचे पुनर्वसन कुठे केले जााणार, जोतिबा मंदिरासंबंधीचे आमचे हक्क अबाधित राहणार का, असे अनेक प्रश्न ग्रामस्थांसमोर उभे आहेत, ज्यांची उत्तरे प्रशासनाकडून अपेक्षित आहेत.

श्री क्षेत्र जोतिबा डोंगराच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र सरकार तिरुपतीच्या धर्तीवर प्राधिकरण करणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी पन्हाळा येथे झालेल्या १३ डी थिएटरच्या लोकार्पण सोहळ्यात मदार विनय कोरे यांच्या जोतिबा प्राधिकरणाच्या मागणीला प्रतिसाद देत जोतिबाच्या विकासासाठी १५ दिवसांत प्राधिकरण स्थापन करण्याची घोषणा केली.मात्र, आजवर जोतिबा ग्रामस्थांबरोबर शासन आणि प्रशासनाने मते जाणून घेतलेली नाहीत. एवढा मोठा निर्णय होत असताना ग्रामस्थांना आणि ग्रामपंचायतीला का विश्वासात घेतले जात नाही? असा सवाल नागरिकांमध्ये आहे.

हे प्राधिकरण तरी व्यवस्थित होणार का?कोल्हापूर प्राधिकरणसंदर्भात ४२ गावांचा अुनभव अतिशय वाईट आहे. या प्राधिकरणाला शासनाने १ रुपयाही दिलेला नाही. तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्याची स्थापना केली आणि नंतर त्यांनी त्याकडे ढुंकूनही पाहिले नाही. त्यामुळे प्राधिकरण म्हटले की कोल्हापूरला भीतीच वाटते. त्या पार्श्वभूमीवर ज्योतिबा विकासासाठी स्थापन होणारे प्राधिकरण कसे असेल, परिसरातील २६ गावांचा विकास कशा पद्धतीने होणार आहे, याबद्दल ग्रामस्थांमध्ये संभ्रम आहे.

पहिल्या टप्प्यातील कामेदक्षिण दिग्विजयोत्सव मैदान, खुला रंगमच, नवे तळे परिसरात १२ ज्योतिर्लिंगाच्या प्रतिकृती, शासकीय निवासस्थान व अन्नछत्र, ज्योती स्तंभ व ध्यानधारणा केंद्र, केदार विजय उद्यान, दर्शन रांग, सुविधा केंद्र, पाणपोई, वाहनतळ, माहिती केंद्र, तलाव व मंदिरांची सुधारणा.

गेल्या दोन वर्षांपासून ज्योतिबा प्राधिकरणाची चर्चा शासन स्तरावर सुरू आहे; पण जोतिबा ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांना विचारत घेतलेले नाही. आम्हा ग्रामस्थांबरोबर प्राधिकरण होण्यापूर्वी चर्चा करावी. - शिवाजीराव सांगळे, माजी सरपंच 

विकास करताना डोंगरावरील पुजारी आणि गुरव समाजाच्या उदरनिर्वाहावर हक्कांवर गंडांतर येऊ नये एवढीच आम्हा ग्रामस्थांची शासनाकडे मागणी आहे. - नवनाथ लादे, अध्यक्ष, हक्कदार समिती

टॅग्स :kolhapurकोल्हापूरJyotiba Templeजोतिबा