शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

अलमट्टीच्या उंचीविरोधात रस्त्यावर उतरू : चंद्रकांत पाटील यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 16:52 IST

कर्नाटकातील अलमट्टी धरणाची उंची ५२४ मीटरपर्यंत नेण्याचा प्रयत्न झाला, तर कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांना याचा मोठा फटका बसेल. त्यामुळे वस्तुस्थिती केंद्रीय नेतृत्वाला समजून सांगू; मात्र वेळ पडली तर याविरोधात रस्त्यावर उतरण्यासही मागे पडणार नाही, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.

ठळक मुद्देअलमट्टीच्या उंचीविरोधात रस्त्यावर उतरू चंद्रकांत पाटील यांचा इशारा

कोल्हापूर : कर्नाटकातील अलमट्टी धरणाची उंची ५२४ मीटरपर्यंत नेण्याचा प्रयत्न झाला, तर कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांना याचा मोठा फटका बसेल. त्यामुळे वस्तुस्थिती केंद्रीय नेतृत्वाला समजून सांगू; मात्र वेळ पडली तर याविरोधात रस्त्यावर उतरण्यासही मागे पडणार नाही, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी अलमट्टीची उंची वाढवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार असल्याचे मंगळवारी (दि. २५) जाहीर केले होते. या पार्श्वभूमीवर पाटील यांनी हे पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.पत्रकात पाटील म्हणतात, सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या लवादाचे आदेश, तांत्रिक बाबी, आजवरची पुराची आकडेवारी तपासूनच याबद्दलचा निर्णय केंद्र सरकारला घ्यावा लागेल. कोल्हापूर जिल्ह्यातील शेती, वित्त आणि जीवित मालमत्ता यांची हानी होणार नाही, याची काळजी घेणे ही केंद्र सरकारची जबाबदारी आहे.

मुळात अलमट्टी धरणाबद्दलच्या काही बाबी न्यायप्रविष्ट आहेत. हा महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा या चार राज्यांशी संबंधित विषय आहे. त्यामुळे पंतप्रधान किंवा केंद्र सरकार घाईगडबडीने किंवा एकांगी निर्णय घेणार नाही. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी भूमिका कायम ठेवली, तर त्यांनाही पश्‍चिम महाराष्ट्रावर होणाऱ्या अन्यायाची कल्पना देऊ.

कोणत्याही परिस्थितीत कोल्हापूरसह पश्‍चिम महाराष्ट्रावर महापुराची टांगती तलवार कायम राहणार नाही, यासाठी दक्ष राहू. गतवर्षीच्या महापुराची भीषणता, त्यातून झालेले नुकसान यांची पूर्ण जाणीव असल्याने, या प्रश्‍नी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलDamधरणkolhapurकोल्हापूरKarnatakकर्नाटक