शहरं
Join us  
Trending Stories
1
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
5
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
6
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
7
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
8
KL Sharma : स्मृती इराणींच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसने उतरवलेले केएल शर्मा कोण आहेत?
9
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
10
RBI ने निर्बंध हटवले; Bajaj Finance च्या शेअर्समध्ये मोठी तेजी, ब्रोकरेजचा विश्वास वाढला
11
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
12
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
13
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
14
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
15
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
16
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
17
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
18
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
19
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
20
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!

कोल्हापुरातून ‘टेक आॅफ’ पुन्हा लांबणीवर, धावपट्टी दुरुस्तीचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 7:34 PM

 कोल्हापूर : केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू यांनी दिलेल्या ग्वाहीनुसार शुक्रवार (दि. १५) पासून कोल्हापूरमधून प्रवासी विमानाचे टेक आॅफ होण्याची आशा होती. मात्र, रनवे (धावपट्टी) दुरुस्तीचे काम आणि विमान उपलब्धतेअभावी विमानसेवेचा प्रारंभ पुन्हा लांबणीवर पडला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी ‘उडान’ योजनेत कोल्हापूरचा समावेश झाल्यानंतर गेल्या सहा ...

ठळक मुद्देकोल्हापुरातून महिनाअखेरपर्यंत विमान सेवा सुरू होण्याची शक्यतारनवे (धावपट्टी) दुरुस्तीचे काम, विमान उपलब्धतेअभावी सेवेचा प्रारंभ लांबणीवर

 कोल्हापूर : केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू यांनी दिलेल्या ग्वाहीनुसार शुक्रवार (दि. १५) पासून कोल्हापूरमधून प्रवासी विमानाचे टेक आॅफ होण्याची आशा होती. मात्र, रनवे (धावपट्टी) दुरुस्तीचे काम आणि विमान उपलब्धतेअभावी विमानसेवेचा प्रारंभ पुन्हा लांबणीवर पडला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी ‘उडान’ योजनेत कोल्हापूरचा समावेश झाल्यानंतर गेल्या सहा वर्षांपासून बंद असलेली कोल्हापूर-मुंबई प्रवासी विमानसेवा केव्हा सुरू होणार, हा कोल्हापूरवासीयांना प्रश्न पडला आहे. संबंधित योजनेतील समावेशानंतर वाहतूक परवाना आणि मुंबईतील स्लॉट (वेळ) या कारणास्तव विमानसेवा सुरू होण्यास विलंब होत होता.

भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि नागरी उड्डाण संचालनालय यांच्यातर्फे दि. २५ आणि २६ आॅक्टोबरला कोल्हापूरच्या विमानतळाची पाहणी केली. त्याचा अहवाल सादर झाल्यानंतर ‘डीजीसीए’कडून कोल्हापूर विमानतळाला प्रवासी वाहतूक परवाना देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे.

या विमानसेवेचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागावा म्हणून खासदार संभाजीराजे यांनी नोव्हेंबरमध्ये केंद्रीय मंत्री अशोक गजपती राजू यांची भेट घेतली. यावेळी मंत्री अशोक गजपती राजू यांनी दि. १५ डिसेंबरपासून विमानसेवा सुरू करण्याची ग्वाही दिली; पण याबाबतचे सध्याचे वास्तव पाहता विमानसेवेचा प्रारंभ पुन्हा लांबणीवर पडला आहे.

कोल्हापुरातून विमानसेवा पुरविण्याची तयारी दर्शविलेल्या कंपनीकडे साधारणत: दि. १८ डिसेंबरपर्यंत विमान उपलब्ध होईल. यानंतर पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दहा दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे महिना अखेरपर्यंत कोल्हापुरातून विमानसेवा सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

धावपट्टी रविवारपर्यंत बंदसध्या विमानतळाच्या धावपट्टीचे काम सुरू आहे. त्यामुळे रविवार (दि. १७) पर्यंत धावपट्टी अधिकृतरीत्या बंद राहणार आहे. या दरम्यान, वातावरण ढगाळ राहिल्यास धावपट्टी बंद राहण्याचा कालावधी वाढण्याची शक्यता आहे. 

 

टॅग्स :Airportविमानतळkolhapurकोल्हापूर