शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
3
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
4
"देशाला दिशा देण्याऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
5
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
6
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
7
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
8
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
9
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
10
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
11
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
12
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
13
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
14
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
15
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
16
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
17
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?
18
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
19
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
20
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...

नदी प्रदूषित करणाऱ्या घटकांवर कारवाई करा - महापालिकेचे प्रदूषण मंडळाला पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 17:22 IST

गेल्या काही दिवसांपासून पंचगंगा नदीचे प्रदूषण वाढल्यामुळे शहराला दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा झाला. याची गंभीर दखल घेत महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाने प्रदूषण नियंत्रण मंडळाला पत्र लिहून नदीचे प्रदूषण

ठळक मुद्दे नदी प्रदूषित करणाऱ्या घटकांवर कारवाई करा महापालिकेचे प्रदूषण मंडळाला पत्र

कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून पंचगंगा नदीचे प्रदूषण वाढल्यामुळे शहराला दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा झाला. याची गंभीर दखल घेत महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाने प्रदूषण नियंत्रण मंडळाला पत्र लिहून नदीचे प्रदूषण करणाºया घटकांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

शहरातील सांडपाणी बºयाच वेळा पंचगंगा नदीत मिसळत असते, त्यावेळी महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाला लक्ष्य करण्यात येते. पर्यावरणवादी कार्यकर्ते महापालिकेविरुद्ध कारवाई करण्यास भाग पाडतात; परंतु यावेळी झालेल्या नदी प्रदूषणास महानगरपालिका जबाबदार नाही. अन्य काही घटकांनी नदीमध्ये मळी किंवा रसायनेमिश्रित सांडपाणी सोडले असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कोल्हापूर पद्धतीच्या बंधाºयावर बरेच दिवस साठवून ठेवलेल्या पाण्याला दुर्गंधी येते, तसाही प्रकार झाला असावा, असे सांगण्यात येते.

कारणे काहीही असली तरी शहरात गेल्या चार-पाच दिवसांपासून दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत आहे. नागरिकांतून तसेच नगरसेवकांतून त्याबाबत पाणीपुरवठा विभागाकडे तक्रारी होत होत्या. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाने नदीतील पाण्याची तपासणी केली असता सकृत्दर्शनी पाण्याला वास येत असल्याचे आढळून आले. मात्र हे प्रदूषण कशामुळे झाले याचा शोध मात्र घेता आलेला नाही. म्हणून महापालिकेचे जल अभियंता सुरेश कुलकर्णी यांनी महाराष्टÑ प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कोल्हापूर येथील कार्यालयास पत्र पाठवून प्रदूषण करणाºया घटकांचा शोध घ्यावा आणि संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

या अनुषंगाने प्रदूषण नियंत्रण मंडळाने भोगावती नदीचे हळदी, बहिरेवाडी, कोगे, शिंगणापूर, आदी ठिकाणी पाहणी करून पाण्याचे नमुने घेतले आहेत. मात्र प्रदूषणाचे कारण अस्पष्ट आहे. पाण्यात कोणते घटक मिसळल्याने हे पाणी प्रदूषित झाले हे रासायनिक पृथक्क रणानंतरच स्पष्ट होणार आहे. दरम्यान, पंचगंगा नदी प्रवाहित करणे हा मात्र तातडीचा उपाय असून तो अमलात आणल्यास शहराला स्वच्छ पाणीपुरवठा होऊ शकेल, असे अधिकाºयांचे म्हणणे आहे.

 

 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूरriverनदी