शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
3
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
4
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
5
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
6
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
7
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
8
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
9
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
10
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
11
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
12
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
13
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
14
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
17
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
18
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
19
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
20
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!

नदी प्रदूषित करणाऱ्या घटकांवर कारवाई करा - महापालिकेचे प्रदूषण मंडळाला पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 17:22 IST

गेल्या काही दिवसांपासून पंचगंगा नदीचे प्रदूषण वाढल्यामुळे शहराला दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा झाला. याची गंभीर दखल घेत महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाने प्रदूषण नियंत्रण मंडळाला पत्र लिहून नदीचे प्रदूषण

ठळक मुद्दे नदी प्रदूषित करणाऱ्या घटकांवर कारवाई करा महापालिकेचे प्रदूषण मंडळाला पत्र

कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून पंचगंगा नदीचे प्रदूषण वाढल्यामुळे शहराला दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा झाला. याची गंभीर दखल घेत महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाने प्रदूषण नियंत्रण मंडळाला पत्र लिहून नदीचे प्रदूषण करणाºया घटकांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

शहरातील सांडपाणी बºयाच वेळा पंचगंगा नदीत मिसळत असते, त्यावेळी महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाला लक्ष्य करण्यात येते. पर्यावरणवादी कार्यकर्ते महापालिकेविरुद्ध कारवाई करण्यास भाग पाडतात; परंतु यावेळी झालेल्या नदी प्रदूषणास महानगरपालिका जबाबदार नाही. अन्य काही घटकांनी नदीमध्ये मळी किंवा रसायनेमिश्रित सांडपाणी सोडले असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कोल्हापूर पद्धतीच्या बंधाºयावर बरेच दिवस साठवून ठेवलेल्या पाण्याला दुर्गंधी येते, तसाही प्रकार झाला असावा, असे सांगण्यात येते.

कारणे काहीही असली तरी शहरात गेल्या चार-पाच दिवसांपासून दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत आहे. नागरिकांतून तसेच नगरसेवकांतून त्याबाबत पाणीपुरवठा विभागाकडे तक्रारी होत होत्या. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाने नदीतील पाण्याची तपासणी केली असता सकृत्दर्शनी पाण्याला वास येत असल्याचे आढळून आले. मात्र हे प्रदूषण कशामुळे झाले याचा शोध मात्र घेता आलेला नाही. म्हणून महापालिकेचे जल अभियंता सुरेश कुलकर्णी यांनी महाराष्टÑ प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कोल्हापूर येथील कार्यालयास पत्र पाठवून प्रदूषण करणाºया घटकांचा शोध घ्यावा आणि संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

या अनुषंगाने प्रदूषण नियंत्रण मंडळाने भोगावती नदीचे हळदी, बहिरेवाडी, कोगे, शिंगणापूर, आदी ठिकाणी पाहणी करून पाण्याचे नमुने घेतले आहेत. मात्र प्रदूषणाचे कारण अस्पष्ट आहे. पाण्यात कोणते घटक मिसळल्याने हे पाणी प्रदूषित झाले हे रासायनिक पृथक्क रणानंतरच स्पष्ट होणार आहे. दरम्यान, पंचगंगा नदी प्रवाहित करणे हा मात्र तातडीचा उपाय असून तो अमलात आणल्यास शहराला स्वच्छ पाणीपुरवठा होऊ शकेल, असे अधिकाºयांचे म्हणणे आहे.

 

 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूरriverनदी