शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

मराठा आरक्षणप्रश्नी सरकारचे प्रतीकात्मक श्राद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 17:50 IST

मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकारचे प्रतीकात्मक श्राद्ध घालण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडत आंदोलकांना ताब्यात घेतले. या आंदोलनात शाळकरी विद्यार्थ्यांचाही सहभाग होता.

ठळक मुद्देमराठा आरक्षणप्रश्नी सरकारचे प्रतीकात्मक श्राद्धपोलिसांकडून आंदोलक ताब्यात

कोल्हापूर : मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. पोलीस भरती प्रक्रिया थांबली पाहिजे, विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात टाकणाऱ्या सरकारचा निषेध असो, फसवणूक करणाऱ्या सरकारचा निषेध असो!... अशा घोषणा देत मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकारचे प्रतीकात्मक श्राद्ध घालण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडत आंदोलकांना ताब्यात घेतले. या आंदोलनात शाळकरी विद्यार्थ्यांचाही सहभाग होता.सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याने समाजात असंतोषाचे वातावरण असून व्यवस्थेला जाग आणण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून कोल्हापुरात आंदोलकांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरकारचे प्रतीकात्मक श्राद्ध घालण्यात येणार होते. दुपारी १२.३० वाजता आंदोलक विविध घोषणा देत महावीर गार्डनपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत चालत आले.

येथे दिलीप पाटील म्हणाले, महाराष्ट्र शासनाने चार दिवसांपूर्वी मराठा समाजाला चांगली बातमी देऊ असे सांगितले. पोलीस भरती करण्यासाठी प्रक्रिया सुरू केली. आम्ही १४ टक्के राखीव ठेवू असे ते म्हणतात; पण हे कायद्यानुसार शक्य नाही. त्यामुळे आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत पोलीस भरती थांबविण्यात यावी, प्रशासनानेही आमच्या भावना समजून घ्याव्यात.यावेळी आंदोलकांनी सरकारचे श्राद्ध घालण्याचा प्रयत्न केला गेला. तो हाणून पाडत पोलिसांनी साहित्य जप्त केले. आंदोलकांना ताब्यात घेऊन शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंद करून सगळ्यांना सोडून देण्यात आले.

यावेळी सचिन तोडकर, स्वप्निल पार्टे, रवींद्र मुदगी, शैलेश जाधव, ऋषीकेश मराठे, केदार चौगुले, ऋषीकेश कारंजे, राजेंद्र चव्हाण, पापा प्रभावळे, अभिजित सावंत, समरजित तोडकर, स्नेहा चव्हाण, रेणुका तोडकर, उत्तम पोवार, प्रथमेश नलवडे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करू : सतेज पाटीलयावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री सतेज पाटील उपस्थित होते. त्यांनी आंदोलकांना बोलावून घेतले व मागण्या विचारल्या. आंदोलकांनी पोलीस भरती थांबली पाहिजे. सारथीचे पुनरुज्जीवन होऊन त्याला निधी मिळाला पाहिजे, विद्यार्थ्यांची फी माफ झालीच पाहिजे, आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या जाचक अटी रद्द करा आणि निधी वाढवून द्या, अशी मागणी केली. यावर मंत्री पाटील यांनी दोन दिवसांत मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर चर्चा करू, असे सांगितले. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणcollectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर