शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

कोल्हापूर जिल्ह्यात 'स्वाईन फ्लू'च्या रुग्णात वाढ, दोन महिन्यात १३ जणांचा बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2022 14:49 IST

व्हायरल इन्फेक्शनमुळे स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे आरोग्य विभागाचे निरीक्षण

कोल्हापूर : गेल्या दोन महिन्यात कोल्हापूर जिल्ह्यातील स्वाईन फ्लूचे प्रमाण वाढले असून यामध्ये १३ जणांचा बळी गेला आहे. सध्या ९ रुग्णांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले असून, १६ जणांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे. एकूण ११३ जणांना या आजाराची लागण झाली आहे.गेल्या दोन महिन्यात व्हायरल इन्फेक्शनमुळे स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे आरोग्य विभागाचे निरीक्षण आहे. काेरोनानंतर एकूणच सर्दी, ताप, खोकला सुरू झाल्यानंतर नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची गरज असताना अनेकदा ताप अंगावर काढण्याची वृत्ती वाढत आहे. थोडा ताप कमी आला की गोळ्या बंद केल्या जातात. मग पुन्हा ताप येतो. पुन्हा चाचण्या केल्या जातात. अशातच जुना काही आजार असेल तर आरोग्यस्थिती आणखी बिघडते. त्यामुळेच स्वाईन फ्लूच्या रुग्णसंख्येत जिल्ह्यात वाढ होत आहे.सध्या ४४ जणांवर उपचारसध्या कोल्हापूर जिल्ह्यात ४४ जण रुग्णालयांमध्ये दाखल आहेत. १३ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ५७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामध्ये ७० पुरुष आणि ४४ महिलांचा समावेश आहे. ३१ ते ७० वयोगटातील रुग्णांची संख्या यामध्ये अधिक असून अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचेही दिसून येत आहे. त्यामुळेच ९ जणांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले असून १८ जणांना ऑक्सिजन लावण्यात आला आहे.वयोगटानुसार रुग्णसंख्या१ ते १० - ०५११ ते २० - ०४२१ ते ३० - १३३१ ते ४० - २२४१ ते ५० - १२५१ ते ६० - २९६१ ते ७० - २३७१ ते ८० - ०५८१ ते ९० - ०१एकूण ११४

जिल्ह्यात व्हायरल इन्फेक्शनचे प्रमाण वाढले असून त्यामुळे स्वाईन फ्लूचेही प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नागरिकांनी अंगावर ताप काढू नये. ताप कमी आला म्हणून डोस बंद करू नये. तो पूर्ण करावा. वैद्यकीय सल्ला घ्यावा. ताप आल्यास शक्यतो इतरांशी संपर्क टाळण्याचा प्रयत्न करावा. - डॉ. योगेश साळे, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद कोल्हापूर

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSwine Flueस्वाईन फ्लू