शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

महाविकास आघाडीतून ‘स्वाभिमानी’ बाहेर पडणार? राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत होणार निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2022 13:53 IST

आघाडीमध्ये सामावून घेताना ‘स्वाभिमानी’ला दिलेले शब्द पाळले नाहीत. त्याचबरोबर शेतकरी, शेतमजुरांच्या प्रश्नांबाबत निर्णय घेताना संघटनेला विचारात घेतले जात नाही, असा नाराजीचा सूर गेले वर्षभर संघटनेच्या नेत्यांचा आहे.

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटना राज्यातील महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याच्या तयारीत आहे. याबाबत संघटनेने ५ एप्रिलला कोल्हापुरात राज्य कार्यकारिणीची बैठक बोलावली आहे. यामध्ये बाहेर पडण्याचा निर्णय होण्याची दाट शक्यता आहे.आघाडीमध्ये सामावून घेताना ‘स्वाभिमानी’ला दिलेले शब्द पाळले नाहीत. त्याचबरोबर शेतकरी, शेतमजुरांच्या प्रश्नांबाबत निर्णय घेताना संघटनेला विचारात घेतले जात नाही, असा नाराजीचा सूर गेले वर्षभर संघटनेच्या नेत्यांचा आहे. त्यातच विधान परिषदेवर संधी देण्याचे आश्वासन राज्यपालांच्या खोड्यामुळे पाळले गेले नसल्याने अस्वस्थता वाढत आहे.महावितरणविरोधातील आंदोलनात राज्य सरकारने फारशी दखल घेतली नाही, चौदा दिवस ठिय्या दिल्यानंतर चर्चेला बोलावले. यातून संघटना पदाधिकाऱ्यांच्या मनात राग आहे. या सगळ्या गोेष्टींची चर्चा करण्यासाठी ५ एप्रिलला शाहू मार्केट यार्ड येथील शेतकरी भवनमध्ये संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक आयोजित केली आहे. एकूणच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची मानसिकता पाहता आघाडीशी काडीमोड घ्यावी, असा सूर दिसत आहे.बारावे घातलेल्या सरकारसोबत रहायचे का?शेतीपंपांच्या वीजबिल व दिवसा वीजपुरवठा यासाठी महावितरणच्या दारात १४ दिवस आंदोलन केले. तिथे राज्य सरकारचे बारावेही ‘स्वाभिमानी’ने घातले. त्यामुळे बारावे घातलेल्या सरकारसोबत पुन्हा रहायचे का, असा प्रश्नही काही पदाधिकारी करत आहेत.सांगली बँकेत सर्वपक्षीयांचा चुना लावण्याचा प्रयत्नसांगली जिल्हा बँकेत सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्रित येत दीडशे कोटींचा चुना लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. यामध्ये सर्वाधिक लाभ भाजपच्या जिल्हाध्यक्षांना होणार आहे. त्यासाठी राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांचा पुढाकार आहे. विधिमंडळात एकमेकांचे वस्त्रहरण करायचे आणि जिल्ह्यात गळ्यात गळे घालण्याचे काम आहे, हे सगळे जनता उघड्या डोळ्यांनी बघत असल्याची टीका शेट्टी यांनी केली.

आम्ही रस्त्यावर उतरून उत्तर देतो. आमच्या भूमिकेमुळे सरकारच्या स्थैर्यावर परिणाम होणार नाही, हे जरी खरे असले तरी हे सरकार ‘स्वाभिमानी’ने अनेक वर्षे कमावलेल्या नैतिकतेवर उभा आहे. आमदारकीबाबत यापूर्वीच सांगितले आहे, सर्वांशी चर्चा करून निर्णय घेऊ. - राजू शेट्टी (नेते, स्वाभिमानी शेतकरी संघटना)

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMahavikas Aghadiमहाविकास आघाडीSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाPoliticsराजकारण