शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
2
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
3
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
4
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
5
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
6
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
7
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
8
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
9
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
10
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
11
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
12
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
13
Ahmedabad Plane Crash Live Updates: विमान अपघातातील १०० जणांचे मृतदेह मिळाले, २५ जखमींवर उपचार सुरू
14
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
15
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
16
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
17
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
18
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
19
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
20
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो

महाविकास आघाडीतून ‘स्वाभिमानी’ बाहेर पडणार? राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत होणार निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2022 13:53 IST

आघाडीमध्ये सामावून घेताना ‘स्वाभिमानी’ला दिलेले शब्द पाळले नाहीत. त्याचबरोबर शेतकरी, शेतमजुरांच्या प्रश्नांबाबत निर्णय घेताना संघटनेला विचारात घेतले जात नाही, असा नाराजीचा सूर गेले वर्षभर संघटनेच्या नेत्यांचा आहे.

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटना राज्यातील महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याच्या तयारीत आहे. याबाबत संघटनेने ५ एप्रिलला कोल्हापुरात राज्य कार्यकारिणीची बैठक बोलावली आहे. यामध्ये बाहेर पडण्याचा निर्णय होण्याची दाट शक्यता आहे.आघाडीमध्ये सामावून घेताना ‘स्वाभिमानी’ला दिलेले शब्द पाळले नाहीत. त्याचबरोबर शेतकरी, शेतमजुरांच्या प्रश्नांबाबत निर्णय घेताना संघटनेला विचारात घेतले जात नाही, असा नाराजीचा सूर गेले वर्षभर संघटनेच्या नेत्यांचा आहे. त्यातच विधान परिषदेवर संधी देण्याचे आश्वासन राज्यपालांच्या खोड्यामुळे पाळले गेले नसल्याने अस्वस्थता वाढत आहे.महावितरणविरोधातील आंदोलनात राज्य सरकारने फारशी दखल घेतली नाही, चौदा दिवस ठिय्या दिल्यानंतर चर्चेला बोलावले. यातून संघटना पदाधिकाऱ्यांच्या मनात राग आहे. या सगळ्या गोेष्टींची चर्चा करण्यासाठी ५ एप्रिलला शाहू मार्केट यार्ड येथील शेतकरी भवनमध्ये संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक आयोजित केली आहे. एकूणच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची मानसिकता पाहता आघाडीशी काडीमोड घ्यावी, असा सूर दिसत आहे.बारावे घातलेल्या सरकारसोबत रहायचे का?शेतीपंपांच्या वीजबिल व दिवसा वीजपुरवठा यासाठी महावितरणच्या दारात १४ दिवस आंदोलन केले. तिथे राज्य सरकारचे बारावेही ‘स्वाभिमानी’ने घातले. त्यामुळे बारावे घातलेल्या सरकारसोबत पुन्हा रहायचे का, असा प्रश्नही काही पदाधिकारी करत आहेत.सांगली बँकेत सर्वपक्षीयांचा चुना लावण्याचा प्रयत्नसांगली जिल्हा बँकेत सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्रित येत दीडशे कोटींचा चुना लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. यामध्ये सर्वाधिक लाभ भाजपच्या जिल्हाध्यक्षांना होणार आहे. त्यासाठी राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांचा पुढाकार आहे. विधिमंडळात एकमेकांचे वस्त्रहरण करायचे आणि जिल्ह्यात गळ्यात गळे घालण्याचे काम आहे, हे सगळे जनता उघड्या डोळ्यांनी बघत असल्याची टीका शेट्टी यांनी केली.

आम्ही रस्त्यावर उतरून उत्तर देतो. आमच्या भूमिकेमुळे सरकारच्या स्थैर्यावर परिणाम होणार नाही, हे जरी खरे असले तरी हे सरकार ‘स्वाभिमानी’ने अनेक वर्षे कमावलेल्या नैतिकतेवर उभा आहे. आमदारकीबाबत यापूर्वीच सांगितले आहे, सर्वांशी चर्चा करून निर्णय घेऊ. - राजू शेट्टी (नेते, स्वाभिमानी शेतकरी संघटना)

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMahavikas Aghadiमहाविकास आघाडीSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाPoliticsराजकारण