शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
4
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
5
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
6
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
7
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
8
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
9
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
10
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
11
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
12
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
13
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
14
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
15
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
16
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
17
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
18
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
19
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
20
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई

Kolhapur Politics: 'स्वाभिमानी' लोकसभा स्वतंत्र लढविणार, राजू शेट्टींनी फोडला प्रचाराचा नारळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2024 13:11 IST

सत्ताधारी व विरोधकांचे हात बरबटलेले

इचलकरंजी : सत्ताधारी आणि विरोधी या दोघांचेही हात बरबटलेले आहेत. त्यामुळे स्वाभिमानी पक्ष मतदारांसमोर स्वतंत्रपणे जाणार आहे. मतदारांना जे करायचे आहे, ते करतील, असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले. स्वाभिमानी पक्षाने लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ यानिमित्ताने फोडला.मकर संक्रांतनिमित्त स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने आयोजित हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा स्नेहमेळावा वेदभवनमध्ये झाला. त्यावेळी ते बोलत होते. शेट्टी म्हणाले, सगळे जण स्वार्थासाठी पक्ष सोडून या पक्षातून त्या पक्षात जात आहेत. निकाल देतानाही चुकीच्या पद्धतीने दिला जात आहे. हेही पात्र आणि तेही पात्र, मग मतदार अपात्र आहेत का, असा प्रश्न पडतो. व्यवस्था पूर्णपणे बरबटलेली आहे. त्याला स्वच्छ करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. सरकारचे धोरण महागाई यावर आवाज उठविण्याची कुणाची ताकद नाही. मीच त्यावर आवाज उठवू शकतो.निवडणुकीकडे आता गांभीर्याने बघण्याची वेळ आली आहे. मी सभागृहात नसल्याची जाणीव आता होत आहे. केंद्र सरकारला प्रश्न विचारणाऱ्यांचे रेकॉर्ड चांगले असले पाहिजे. जे ईडीला घाबरत नाहीत, तेच प्रश्न विचारू शकतात, ती धमक माझ्यात आहे. तुटलेल्या उसाचे पैसे मागत असताना खुळ्यात काढण्याचा प्रयत्न झाला. मात्र, आपण ही रक्कम वसूल करून दाखवली. ते फक्त स्वाभिमानीच करू शकते. आंदोलनामुळे शेतकऱ्यांच्या हातात एक हजार कोटी रुपये पडले. ३७ कुटुंबांकडून रक्कम काढून घेऊन ती १५ लाख कुटुंबांना वाटण्यात आली. शेतकऱ्यांना पैसे मिळाल्यामुळे ती रक्कम बाजारात आली आणि त्याचा सर्वच घटकांना फायदा झाला.जालंदर पाटील म्हणाले, सर्वप्रथम प्रचाराचा प्रारंभ करणारा स्वाभिमानी हा राज्यातील एकमेव पक्ष असेल. कार्यकर्त्यांनी गाफील न राहता रणनीती आखली पाहिजे. पुरोगामीचा विचार असणारा कोल्हापूर जिल्हा शेट्टींना तिसऱ्यांदा खासदार करेल. सावकार मादनाईक म्हणाले, मकर संक्रांतीचे औचित्य साधून रविवारी प्रचाराचा नारळ फुटत आहे. शरद पवारांची भेट घेतली म्हणजे त्यांच्यासोबत गेलो, असे नाही. स्वतंत्रपणे खासदारकीची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. कार्यकर्त्यांनी आता जोमाने कामाला लागावे.स्नेहमेळाव्यात रक्तदान शिबिर घेण्यात आले. विकास चौगुले, गोवर्धन दबडे, आप्पा ऐडके, सागर संभूशेटे आदींची भाषणे झाली. अण्णासाहेब शहापुरे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी जनार्दन पाटील, जयकुमार कोले, सतीश मगदूम, हेमंत वणकुंद्रे, बाळगोंड पाटील, स्वस्तिक पाटील, बसगोंडा बिरादार, पुरंदर पाटील, विठ्ठल मोरे आदी उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरlok sabhaलोकसभाRaju Shettyराजू शेट्टीSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना