शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
3
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला
4
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
5
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
6
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
7
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
8
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारच्या आगामी सिनेमाची घोषणा, 'ही' अभिनेत्री साकारणार आईची भूमिका
9
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी
10
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
11
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
12
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
13
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
14
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
15
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
16
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
17
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
18
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
19
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
20
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...

सर्व्हे होन तीन वर्षे उलटली; ‘कोल्हापूर-वैभववाडी’ रेल्वे पुढे सरकेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 14:07 IST

मार्गाचा सर्व्हे आणि भूमिपूजन होऊन तीन वर्षे उलटली, तरी ‘कोल्हापूर-वैभववाडी’ रेल्वेचे काम पुढे सरकलेले नाही. या कामाला अद्याप प्रत्यक्षात सुरुवात झालेली नाही. त्यामुळे कोल्हापूरकरांचे स्वप्न असणाऱ्या या रेल्वेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देसर्व्हे होन तीन वर्षे उलटली; ‘कोल्हापूर-वैभववाडी’ रेल्वे पुढे सरकेनाभूमिपूजन होऊनही कामाला अद्याप सुरुवात नाही

कोल्हापूर : मार्गाचा सर्व्हे आणि भूमिपूजन होऊन तीन वर्षे उलटली, तरी ‘कोल्हापूर-वैभववाडी’ रेल्वेचे काम पुढे सरकलेले नाही. या कामाला अद्याप प्रत्यक्षात सुरुवात झालेली नाही. त्यामुळे कोल्हापूरकरांचे स्वप्न असणाऱ्या या रेल्वेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.कोकण आणि कोल्हापूरच्या विकासाला गती देण्याच्या उद्देशाने कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. या रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण जानेवारी २०१६ मध्ये पूर्ण झालेशिवाय त्याचा सविस्तर अहवाल रेल्वे महामंडळाला सादर झाला. या मार्गाला अर्थसंकल्पात मान्यता मिळाली.

अर्थसंकल्पातदेखील या मार्गाच्या कामासाठी २६० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. त्याच्या कामासाठी महाराष्ट्र लोहमार्ग पायाभूत विकास कंपनीच्या स्थापनेचा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाने सरकारला सादर केला. त्यानंतर या रेल्वेमार्गाच्या कामाचे भूमिपूजन जून २०१७ मध्ये तत्कालीन केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते कराड येथून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्यात आले. त्यानंतर अद्याप प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली नसल्याचे चित्र आहे. त्यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी एकत्रितपणे पाठपुरावा करणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

‘कोल्हापूर-मिरज’ विद्युतीकरण पूर्णकोल्हापूर ते मिरज या ५० किलोमीटर मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. यासाठी सुमारे ५० कोटी रुपयांचा निधी लागला. या मार्गाची दोन महिन्यांपूर्वी रेल्वे सुरक्षा आयुक्त समितीकडून (सीआरएस) पाहणी झाली आहे. या समितीच्या पथकाने या मार्गावरून रेल्वेची चाचणीदेखील घेतली आहे. राणी चन्नमा रेल्वे या मार्गावरून धावत आहे. विद्युतीकरणानंतर आता या मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम लवकर व्हावे, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे.

रेल्वेमार्गाचा प्रकल्प दृष्टिक्षेपात

  •  कोल्हापूर-वैभववाडी हा सुमारे १०७ किलोमीटर अंतराचा रेल्वेमार्ग
  •  यासाठी एकूण ३२४४ कोटी रुपये खर्च अपेक्षित
  •  पहिल्या टप्प्यासाठी सुमारे १३७५ कोटी रुपयांची तरतूद

 

 

टॅग्स :railwayरेल्वेkolhapurकोल्हापूरsindhudurgसिंधुदुर्ग