शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू
2
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
3
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण
4
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
5
तुमची मुलगी बनेल लखपती; महिन्याला वाचवा १००० रुपये, २१ व्या वर्षी मिळतील ₹५.५ लाख
6
Padalkar Awhad: विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण?
7
दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू
8
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
9
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
10
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
11
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
12
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
13
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
14
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
15
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
16
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
17
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
18
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
19
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
20
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय

राजाराम कारखान्यांच्या अपात्र सभासदांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा, पण..

By राजाराम लोंढे | Updated: January 4, 2023 19:26 IST

निवडणूक पावसाळ्यानंतरच होण्याची शक्यता

कोल्हापूर : कसबा बावडा (ता. करवीर) येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यांच्या अपात्र १३४६ सभासदांना सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी तात्पुरता दिलासा दिला. उच्च न्यायालयाने अपात्र ठरवलेल्या सभासदांना प्रादेशिक साखर सहसंचालकांसमोर पुन्हा म्हणणे मांडता येणार असून त्यासाठी दोन महिन्याचा कालावधी दिला असून त्यानंतर तीन महिन्यात पात्र,अपात्रतेबाबत सहसंचालकांना निर्णय घेता येणार आहे. तत्कालीन प्रादेशिक साखर सहसंचालकांनी हे सभासद अपात्र ठरवले होते. सत्तारुढ गटाने या निकालाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागितली. तिथेही सहसंचालकांचा निर्णय कायम राखण्यात आला. ७०९ सभासदांच्या वतीने सत्तारुढ गटाने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. त्यावर बुधवारी सुनावणी होऊन या सभासदांनी प्रादेशिक साखर सहसंचालकांसमोर पुराव्यासह म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले.

त्यासाठी दोन महिन्याचा कालावधी दिला असून यामध्ये त्यांनी म्हणणे सादर करायचे आहे. त्यानंतरच्या तीन महिन्यात साखर सहसंचालकांनी सुनावणी घेऊन निर्णय देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश व्ही. चंद्रचूड आणि न्यायमूर्ती पी. नरसिंह यांच्या खंडपीठाने दिला.या प्रक्रियेसाठी पाच महिने जाणार असल्याने निवडणूक पावसाळ्यानंतरच होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखानेSupreme Courtसर्वोच्च न्यायालय