शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

राज्यातील सत्ता नव्या अध्यक्षासाठी पूरक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 01:12 IST

कोल्हापूर : जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या इच्छुकांचे सर्व लक्ष सध्या मुंबईच्या घडामोडींकडे आहे. तेथे येणारी सत्ता ही या अध्यक्षपदासाठी पाठबळ देण्यासाठी पूरक ठरणार असल्याने, सर्वपक्षीय इच्छुक सध्या दूरचित्रवाहिनी, मोबाईल तसेच वृत्तपत्रांच्या माध्यमांतून तेथील माहिती घेण्यात गुंतले आहेत.

कोल्हापूर : जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या इच्छुकांचे सर्व लक्ष सध्या मुंबईच्या घडामोडींकडे आहे. तेथे येणारी सत्ता ही या अध्यक्षपदासाठी पाठबळ देण्यासाठी पूरक ठरणार असल्याने, सर्वपक्षीय इच्छुक सध्या दूरचित्रवाहिनी, मोबाईल तसेच वृत्तपत्रांच्या माध्यमांतून तेथील माहिती घेण्यात गुंतले आहेत.जिल्हा परिषदेच्या विद्यमान अध्यक्षांची वाढीव मुदत २१ जानेवारीला संपणार आहे. नवा अध्यक्ष ‘इतर मागासवर्गीय’ राहणार असल्याचे आरक्षणातून स्पष्टही झाले आहे; त्यामुळे ‘इतर मागासवर्गीय’ दाखला असलेले अनेक इच्छुक सत्ता कुणाची येणार याची औत्सुक्यपूर्ण चौकशी करताना दिसत आहेत.सध्या शौमिका महाडिक या अध्यक्षा असल्या तरी लोकसभा निवडणुकीनंतर काही पावले माघारी आलेला भाजप विधानसभेनंतर तर हतबल झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. जिल्ह्यातील दोन्ही आमदार पराभूत झाल्याने आणि अशात राज्यात सरकार बनत नाही, असेच शनिवार (दि. २३)पर्यंतचे चित्र असल्याने भाजपला ही निवडणूक जड जाणार असल्याचे चित्र होते.तुलनेत विधानसभेला कॉँगे्रस, राष्ट्रवादी यांनी दहापैकी सहा जागा जिंकल्याने आघाडी जोमात आहे. माजी मंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील आणि त्यांना उघड पाठबळ देणारे शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांच्यामुळे जिल्हा परिषदेत दोन्ही कॉँग्रेस आणि शिवसेना मिळून बाजी मारतील, असे चित्र निर्माण झाले होते.परंतु शनिवारी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याने भाजपच्या गोटामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. जर हे सरकार टिकले, तर कोणत्याही परिस्थितीत पुन्हा एकदा भाजपचा अध्यक्ष करणे सोपे जाईल, अशी भाजप नेत्यांची अटकळ आहे. सध्या भाजपकडून अरुण इंगवले हे या पदाचे प्रमुख दावेदार आहेत.त्यांचे अनेक मित्र राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्येही आहेत; परंतु जर राज्यात दोन्ही कॉँग्रेस आणि शिवसेना असे सरकार बनले तर ते इंगवले यांच्यासाठी जड जाणार आहे. परंतु भाजप अजित पवार यांच्या सहकार्याने सरकार स्थापन करण्यात यशस्वी झाल्यास इंगवले यांच्यासाठी ते सकारात्मक असेल.