शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

ऊसाचा हंगाम अन् अपघातांना निमंत्रण नित्याचेच..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 17:05 IST

accident, Sugar factory, kolhapur ऊस हंगाम सुरू झाला की मुख्य प्रश्न निर्माण होतो तो वाहतुकीची कोंडी आणि अपघात रोखणे. ऊस हंगामाच्या सुरूवातीपासून अनेक अपघातांना निमंत्रण मिळत आहे. त्याचा प्रत्यय गडहिंग्लज तालुकावासियांना येत असून गेल्या पंधरा दिवसात तिघाजणांना आपण जीव गमवावा लागला आहे.

ठळक मुद्देऊसाचा हंगाम अन् अपघातांना निमंत्रण नित्याचेच..! गडहिंग्लज तालुक्यातील चित्र : १५ दिवसात तिघांचा मृत्यू

शिवानंद पाटील 

गडहिंग्लज- ऊस हंगाम सुरू झाला की मुख्य प्रश्न निर्माण होतो तो वाहतुकीची कोंडी आणि अपघात रोखणे. ऊस हंगामाच्या सुरूवातीपासून अनेक अपघातांना निमंत्रण मिळत आहे. त्याचा प्रत्यय गडहिंग्लज तालुकावासियांना येत असून गेल्या पंधरा दिवसात तिघाजणांना आपण जीव गमवावा लागला आहे.अडकूर (ता. चंदगड) येथील कादर आदम कोवाडकर (वय ४५, रा. अडकूर, ता. चंदगड) हे दुचाकीने गडहिंग्लजहून घरी परतत होते. हरळीनजीक ट्रॅक्टर ट्रॉलीला ओव्हरटेक करताना ट्रॉलीचा अ‍ॅक्सेल तुटल्याने डब्यातील संपूर्ण ऊसच त्यांच्यावर कोसळून त्यांचा जागीच मृत्यू झाला.मंगळवारी (१) नूल (ता. गडहिंग्लज) येथे भल्या पहाटे जनावरांना सायकलीवरून वाडे आणण्यासाठी जाणाऱ्या शाहरूख सनदी (वय २४) या तरूणाचा ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने दिलेल्या धडकेत प्राण गमवावा लागला.बुधवारी (२) गडहिंग्लज-उत्तूर मार्गावर उत्तूरचे कापड व्यापारी दत्तात्रय पाटील यांच्या दुचाकीने ट्रॅक्टर ट्रॉलीला धडक दिल्याने त्यांचाही जागीच मृत्यू झाला.ऊस वाहतूक करणारे ट्रक, ट्रॅक्टर-ट्रॉली सुस्थितीत नसणे, क्षमतेपेक्षा अधिक ऊसाची वाहतूक करणे, वाहनांमध्ये मोठ्याने टेप लावणे, वाहनांच्या पाठीमागील बाजूस रिपलेक्टर न लावणे, रिकामे ट्रॅक्टर व ट्रक वेगाने पळविणे आदी कारणामुळे अपघातांना निमंत्रण मिळत आहे. त्यामुळे वाहतूक प्रशासनानेही वाहनांची तपासणी करून नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे.वाहतुकीची कोंडीआजरा, चंदगड, संकेश्वर, गारगोटी, निपाणीकडे जाण्यासाठी शहरातील गडहिंग्लज-संकेश्वर-आजरा या एकाच मुख्य रस्त्यावरून वाहतूक होते. याच मुख्य रस्त्यावर शासकीय कार्यालये, वाचनालय, बाजारपेठ, नगरपालिका, पोलिस ठाणे असल्याने याठिकाणी कामानिमित्त येणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यातच ऊसाची वाहतूकही या मार्गावरून होत असल्याने या मार्गावर जीव मुठीत घेवूनच वाहने चालवावी लागतात. 

 रिंगरोड हाच उपायशहरातील मुख्य रस्त्यावर होणारी वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी शहरातून अन्य ठिकाणी जाणाऱ्या सर्व वाहनांसाठी पर्यायी मार्गाची सोय होणे गरजेचे आहे. त्यासाठी शहरातील प्रलंबित रिंगरोडचे काम पूर्ण होणे आवश्यक आहे. 

टॅग्स :Accidentअपघातkolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखाने