ऊस उत्पादकांमुळे हालशुगर भरभराटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:28 IST2021-09-23T04:28:14+5:302021-09-23T04:28:14+5:30

शेतकरी या देशाचा आर्थिक कणा असून, शेतकऱ्यांमुळेच हालसिद्धनाथ सहकारी कारखान्याची उलाढाल वाढली आहे. निपाणी परिसरातील ऊस उत्पादकामुळे कारखाना भरभराटीस ...

Sugarcane flourishes due to sugarcane growers | ऊस उत्पादकांमुळे हालशुगर भरभराटीस

ऊस उत्पादकांमुळे हालशुगर भरभराटीस

शेतकरी या देशाचा आर्थिक कणा असून, शेतकऱ्यांमुळेच हालसिद्धनाथ सहकारी कारखान्याची उलाढाल वाढली आहे. निपाणी परिसरातील ऊस उत्पादकामुळे कारखाना भरभराटीस आला आहे. परिणामी रोजगारही निर्माण झाला आहे. खा. अण्णासाहेब जोल्ले व मंत्री शशिकला जोल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली चेअरमन चंद्रकांत कोठेवाले व संचालक मंडळाने कारखान्याची वाटचाल प्रगतीकडे ठेवली आहे, असे प्रतिपादन पंचम शिवलिंगेश्वर महास्वामीजी यांनी केले.

येथील हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याच्या बॉयलर प्रदीपन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी चंद्रकांत कोठेवाले म्हणाले की, जोल्ले दाम्पत्य यांनी बिरेश्वर संस्थेच्या माध्यमातून दिलेल्या पाठबळामुळे हालशुगर कारखान्याने विकासाची दिशा पकडली आहे. कारखान्याने उभारी घेतली आहे.

कारखान्याच्यावतीने बनवण्यात आलेल्या ८० टन वजन काट्याचे पूजन यावेळी करण्यात आले. आप्पाचीवाडी येथील हालसिद्धनाथ महाराजांच्या वालंगाचे स्वागत मान्यवरांनी केले. प्रसंगी स्वागत संचालक पप्पू पाटील यांनी केले. यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक शिव कुलकर्णी यांनी कारखान्याच्या प्रगतीचा आढावा घेतला.

यावेळी आप्पासाहेब जोल्ले, विश्वनाथ कमते, अविनाश पाटील, समित सासणे, सुकुमार पाटील, प्रताप मेत्रानी, ज्योतीप्रसाद जोल्ले, नगराध्यक्ष जयवंत भाटले यांच्यासह कारखान्याचे संचालक सभासद व शेतकरी उपस्थित होते. राजू खराबे यांनी सूत्रसंचालन केले तर कारखान्याचे उपाध्यक्ष एम. पी. पाटील यांनी आभार मानले.

Web Title: Sugarcane flourishes due to sugarcane growers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.