शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

साखर कारखाने आजपासून बंद ऊसदराचा प्रश्न : शासनाकडे मदतीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 01:00 IST

कोल्हापूर : शेतकरी संघटनांनी केलेली ऊसदराची मागणी, बॅँकांकडून मिळणारी उचल यांचा ताळमेळ बसत नसल्याने हंगाम चालविणे अडचणीचे आहे. त्यामुळे ...

ठळक मुद्देयंदा सरकार या प्रश्नांत सहकार्याची भूमिका घेईल असे दिसत नाहीवाढीव २०० रुपये न मिळाल्याने ते रोषाचे बळी ठरले आहेत.

कोल्हापूर : शेतकरी संघटनांनी केलेली ऊसदराची मागणी, बॅँकांकडून मिळणारी उचल यांचा ताळमेळ बसत नसल्याने हंगाम चालविणे अडचणीचे आहे. त्यामुळे तुटलेला ऊस गाळप करून आज, बुधवारपासून कारखाने बंद ठेवण्याचा निर्णय साखर कारखानदारांच्या कोल्हापुरात झालेल्या बैठकीत मंगळवारी घेण्यात आला.शासनाच्या मदतीशिवाय हंगाम सुरू करणे अशक्य असल्याचे मतही अनेक कारखानदारांनी व्यक्त केले. अशा स्थितीत शेतकऱ्यांचा वाईटपणा कारखानदारांनी घ्यायला नको म्हणून तोडगा निघेपर्यंत धुराडी बंद करण्याचे ठरले.

‘रयत क्रांती’ शेतकरी संघटनेने एफआरपी अधिक २०० रुपये, ‘स्वाभिमानी शेतकरी संघटने’ने विनाकपात ३२१७ रुपये, तर शेतकरी संघटनेने एकरकमी ३५०० रुपयांची मागणी केली आहे. जिल्ह्यातील संताजी घोरपडे, ‘राजाराम’सह इतर कारखान्यांनी गळीत हंगाम सुरू केला आहे. त्यामुळे शेतकरी संघटना आक्रमक झाली असून, त्यांनी तोडण्या रोखण्यास सुरुवात केल्याने संघर्ष निर्माण झाला आहे. कर्नाटकातील कारखाने सुरू झाल्याने सीमाभागातील ऊस तिकडे जात आहे. त्याचा फटका येथील कारखान्यांना बसणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी जिल्ह्यातील साखर कारखानदारांची जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

सध्या साखरेचा दर २९ रुपये आहे. बॅँकांकडून ८५ टक्क्यांप्रमाणे मिळणारी उचल आणि शेतकरी संघटनांची मागणी यांचा ताळमेळ बसत नाही. ऊसतोडणी-वाहतूक खर्च, मागील हंगामातील कर्जाचे हप्ते द्यावे लागणार आहेत. त्यामुळे शेतकरी संघटनांच्या मागण्यांप्रमाणे सध्या तरी दर देणे अशक्य असल्याने हंगाम बंद ठेवणेच योग्य होईल, असे कारखानदारांनी सुचविले. अशा परिस्थितीत शासनाने मदत करावी, त्यांच्या मदतीशिवाय हंगाम सुरू होणे अशक्य आहे, असा बैठकीत निर्णय घेतला. बैठकीला ‘दत्त-शिरोळ’चे अध्यक्ष गणपतराव पाटील, ‘हमीदवाडा’ कारखान्याचे अध्यक्ष प्रा. संजय मंडलिक, ‘राजाराम’चे अध्यक्ष हरीश चौगले, ‘गुरुदत्त’चे अध्यक्ष माधवराव घाटगे, ‘भोगावती’चे उपाध्यक्ष उदयसिंह पाटील, ‘जवाहर’चे उपाध्यक्ष विलास गाताडे, ‘शाहू’चे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण, साखर तज्ञ पी. जी. मेढे, आदी उपस्थित होते.हे देखील महत्त्वाचे कारणदिवाळीचा सण तोंडावर असल्याने ऊस तोडणी टोळ््या अजून मराठवाड्यातून आलेल्या नाहीत. त्यामुळे संघटनेचा रोष ओढवून घेण्यापेक्षा हंगामच बंद ठेवून दबाव वाढवण्याचाही हेतू कारखाने बंद करण्यामागे आहे. यंदा सरकार या प्रश्नांत सहकार्याची भूमिका घेईल असे दिसत नाही. कारण गेल्या हंगामात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मध्यस्थी केली, परंतु वाढीव २०० रुपये न मिळाल्याने ते रोषाचे बळी ठरले आहेत.सातारा, सांगलीतही कारखाने बंदकोल्हापुरातील कारखानदारांच्या बैठकीतील निर्णयाबद्दल आमदार हसन मुश्रीफ यांनी सांगली व सातारा जिल्ह्यांतील कारखानदारांशी फोनवरून चर्चा केली. त्यांनीही शासन मदत देत नाही तोपर्यंत हंगाम सुरू न करण्याचा निर्णय घेतला आहे.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेkolhapurकोल्हापूर