शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
2
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
3
एका महिलेचा कॉल अन् करोडपती बँकरला २३ कोटींचा गंडा; एक महिन्यासाठी केले डिजिटल अरेस्ट
4
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
5
Video - हायव्होल्टेज ड्रामा! लग्नाचं वेड, जीवाशी खेळ; गर्लफ्रेंड न भेटल्याने 'तो' टॉवरवर चढला
6
Health Tips: पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती? जेवण करण्यापूर्वी, जेवण करताना की जेवणानंतर? 
7
"ऑपरेशन सिंदूरचा पार्ट २, पार्ट ३ अजून बाकी"; राजनाथ सिंहांचा पाकिस्तानला 'मेसेज', मोरक्कोमध्ये काय बोलले?
8
खेळण्यातली बंदूक वापरली अन् ३ बँकांवर डल्ला मारला! पोलिसांनी दरोडेखोराला पकडताच समोर आलं धक्कादायक सत्य
9
सणासुदीच्या काळात कार खरेदी करणे झाले स्वस्त! जीएसटीमध्ये मोठी कपात, कर्जही झाले स्वस्त
10
पाकिस्ताननं कर्जाच्या आकडेवारीत असं काय लपवलं की, अमेरिकेनं दिला अल्टिमेटम; भारताशी तर कनेक्शन नाही ना?
11
दणदणीत विजयानंतर गंभीरने पाकिस्तानला डिवचले, खेळाडूंना अशी सूचना देत जखमेवर मीठ चोळले
12
ब्रेकअपचं खोटं अन् हत्येनंतरचा बनाव...कानपूर सुटकेस 'कांड' प्रकरणात ट्विस्ट, २ आरोपींना अटक
13
Accident: पाण्याचा टँकर आणि दुचाकीत भीषण धडक; तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू
14
डोनाल्ड ट्रम्प अन् इलॉन मस्कची 'दिलजमाई' झाली? चार्ली किर्कच्या शोकसभेत दिसले एकत्र! ‘तो’ एक फोटो चर्चेत
15
VIRAL: रिक्षात बसलेल्या विदेशी तरुणाला रिक्षाचालकाने फ्रेंचमध्ये विचारला प्रश्न; त्यानंतर जे झालं ते...
16
'या' ग्राहकांना हेल्थ इन्शुरन्सवर GST माफीचा फायदा नाही; आरोग्य विम्या कंपन्यांनी केलं स्पष्ट
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' सिनेमात मराठी मालिकाविश्वातील 'या' अभिनेत्याची लागली वर्णी, स्वतः दिली माहिती
18
"पैसे कमावतो, टॅक्स भरतो; चोरी करत नाही...", तगड्या कमाईवरुन अक्षय कुमारचं स्पष्टीकरण
19
FD-RD विसरुन जाल, LIC ची ही स्कीम आहे जबरदस्त, मुलीच्या लग्नासाठी मिळेल २७ लाखांची रक्कम
20
फक्त गरबाच खेळा...हुल्लडबाजी नको; दांडियामध्ये साध्या वेशात महिला पोलीस सहभागी होणार

साखर कारखाने आजपासून बंद ऊसदराचा प्रश्न : शासनाकडे मदतीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 01:00 IST

कोल्हापूर : शेतकरी संघटनांनी केलेली ऊसदराची मागणी, बॅँकांकडून मिळणारी उचल यांचा ताळमेळ बसत नसल्याने हंगाम चालविणे अडचणीचे आहे. त्यामुळे ...

ठळक मुद्देयंदा सरकार या प्रश्नांत सहकार्याची भूमिका घेईल असे दिसत नाहीवाढीव २०० रुपये न मिळाल्याने ते रोषाचे बळी ठरले आहेत.

कोल्हापूर : शेतकरी संघटनांनी केलेली ऊसदराची मागणी, बॅँकांकडून मिळणारी उचल यांचा ताळमेळ बसत नसल्याने हंगाम चालविणे अडचणीचे आहे. त्यामुळे तुटलेला ऊस गाळप करून आज, बुधवारपासून कारखाने बंद ठेवण्याचा निर्णय साखर कारखानदारांच्या कोल्हापुरात झालेल्या बैठकीत मंगळवारी घेण्यात आला.शासनाच्या मदतीशिवाय हंगाम सुरू करणे अशक्य असल्याचे मतही अनेक कारखानदारांनी व्यक्त केले. अशा स्थितीत शेतकऱ्यांचा वाईटपणा कारखानदारांनी घ्यायला नको म्हणून तोडगा निघेपर्यंत धुराडी बंद करण्याचे ठरले.

‘रयत क्रांती’ शेतकरी संघटनेने एफआरपी अधिक २०० रुपये, ‘स्वाभिमानी शेतकरी संघटने’ने विनाकपात ३२१७ रुपये, तर शेतकरी संघटनेने एकरकमी ३५०० रुपयांची मागणी केली आहे. जिल्ह्यातील संताजी घोरपडे, ‘राजाराम’सह इतर कारखान्यांनी गळीत हंगाम सुरू केला आहे. त्यामुळे शेतकरी संघटना आक्रमक झाली असून, त्यांनी तोडण्या रोखण्यास सुरुवात केल्याने संघर्ष निर्माण झाला आहे. कर्नाटकातील कारखाने सुरू झाल्याने सीमाभागातील ऊस तिकडे जात आहे. त्याचा फटका येथील कारखान्यांना बसणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी जिल्ह्यातील साखर कारखानदारांची जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

सध्या साखरेचा दर २९ रुपये आहे. बॅँकांकडून ८५ टक्क्यांप्रमाणे मिळणारी उचल आणि शेतकरी संघटनांची मागणी यांचा ताळमेळ बसत नाही. ऊसतोडणी-वाहतूक खर्च, मागील हंगामातील कर्जाचे हप्ते द्यावे लागणार आहेत. त्यामुळे शेतकरी संघटनांच्या मागण्यांप्रमाणे सध्या तरी दर देणे अशक्य असल्याने हंगाम बंद ठेवणेच योग्य होईल, असे कारखानदारांनी सुचविले. अशा परिस्थितीत शासनाने मदत करावी, त्यांच्या मदतीशिवाय हंगाम सुरू होणे अशक्य आहे, असा बैठकीत निर्णय घेतला. बैठकीला ‘दत्त-शिरोळ’चे अध्यक्ष गणपतराव पाटील, ‘हमीदवाडा’ कारखान्याचे अध्यक्ष प्रा. संजय मंडलिक, ‘राजाराम’चे अध्यक्ष हरीश चौगले, ‘गुरुदत्त’चे अध्यक्ष माधवराव घाटगे, ‘भोगावती’चे उपाध्यक्ष उदयसिंह पाटील, ‘जवाहर’चे उपाध्यक्ष विलास गाताडे, ‘शाहू’चे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण, साखर तज्ञ पी. जी. मेढे, आदी उपस्थित होते.हे देखील महत्त्वाचे कारणदिवाळीचा सण तोंडावर असल्याने ऊस तोडणी टोळ््या अजून मराठवाड्यातून आलेल्या नाहीत. त्यामुळे संघटनेचा रोष ओढवून घेण्यापेक्षा हंगामच बंद ठेवून दबाव वाढवण्याचाही हेतू कारखाने बंद करण्यामागे आहे. यंदा सरकार या प्रश्नांत सहकार्याची भूमिका घेईल असे दिसत नाही. कारण गेल्या हंगामात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मध्यस्थी केली, परंतु वाढीव २०० रुपये न मिळाल्याने ते रोषाचे बळी ठरले आहेत.सातारा, सांगलीतही कारखाने बंदकोल्हापुरातील कारखानदारांच्या बैठकीतील निर्णयाबद्दल आमदार हसन मुश्रीफ यांनी सांगली व सातारा जिल्ह्यांतील कारखानदारांशी फोनवरून चर्चा केली. त्यांनीही शासन मदत देत नाही तोपर्यंत हंगाम सुरू न करण्याचा निर्णय घेतला आहे.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेkolhapurकोल्हापूर