शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

पैसा देणारं पीक; राज्यात दहा वर्षात ऊस क्षेत्रात १० लाख एकरची वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2022 13:36 IST

महाराष्ट्रातील सर्वाधिक साखर उतारा असलेल्या दहापैकी सात कारखाने कोल्हापूर जिल्ह्यातील.

विश्वास पाटीलकोल्हापूर : महाराष्ट्रात गेल्या दहा वर्षात उसाखालील क्षेत्रात दहा लाख एकराने वाढ झाली आहे. त्यामुळे सरासरी ३२ लाख टन ऊस वाढला आहे. साखर आयुक्त कार्यालयाने दिलेल्या माहितीवरून हे चित्र पुढे आले आहे. दहा वर्षात साखर कारखान्यांची संख्याही ३० ने वाढली आहे. कारखान्यांची गाळप क्षमता दिवसाला ३ लाख टनांनी वाढली आहे. हुकमी पैसा मिळवून देणारे पीक म्हणून शेतकरी उसाकडे मोठ्या प्रमाणावर वळत असल्याचेच त्यातून दिसत आहे.जिथे पाणी आले तिथे ऊस वाढला असे राज्यभरातील सर्वसाधारण चित्र दिसते. महाराष्ट्राच्या २०१२-१३ च्या हंगामात उसाखालील क्षेत्र ९.६४ लाख हेक्टर होते. तेच आज १३.६७ लाख हेक्टर आहे. म्हणजेच तब्बल ४.०३ लाख हेक्टर (दहा लाख एकर) क्षेत्र वाढले. शेतकरी सिंचनाची सोय झाली की ऊसपीक घेतो. त्यासाठी फारसे कष्ट नाहीत. बियाण्यापासून खतापर्यंत सगळे सहज उपलब्ध होते. कायद्याने हमीभाव मिळण्याची सोय आहे. त्याला पिकवलेला ऊस बाजारात विकायला जावा लागत नाही. निसर्ग कितीही कोपला तरी पिकाचे मर्यादित नुकसान होते. या कारणांमुळे शेतकरी या पिकाकडे वळत असल्याचे चित्र प्रामुख्याने दिसते.सोलापूर, अहमदनगर, पुणे, उस्मानाबाद, लातूर, औरंगाबाद, परभणी, नांदेड, बीड या जिल्ह्यात उसाचे क्षेत्र वाढल्याचे चित्र आहे. याउलट तृणधान्ये (११ टक्के), कडधान्ये (२७ टक्के) व तेलबिया (१३ टक्के) पिकाखालील क्षेत्र कमी होत असल्याचे आर्थिक पाहणी अहवाल सांगतो. मावळत्या हंगामात महाराष्ट्रात सर्वाधिक २४ लाख ७८ हजार टन ऊस गाळप सोलापूर जिल्ह्यातील माढा येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी कारखान्याने केले आहे.

साखर उताऱ्यात कोल्हापूर भारी..महाराष्ट्रातील सर्वाधिक साखर उतारा असलेल्या दहापैकी सात कारखाने कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. बिद्री कारखाना १२.९९ उताऱ्यासह सर्वोच्चस्थानी आहे. त्याशिवाय पंचगंगा (रेणुका शुगर्स), शाहू कागल, अथनी शुगर्स भुदरगड, ओलम चंदगड, भोगावती परिते, कुंभीकासारी कुडित्रे व इको केन चंदगड यांचा त्यामध्ये समावेश आहे.

१८६९ कोटी रुपये एफआरपी थकीत

राज्यातील १९९ पैकी ६५ कारखान्यांनी शंभर टक्के एफआरपी दिली आहे. १३४ कारखान्यांकडे १८६९ कोटी रुपये एफआरपी थकीत आहे. चार कारखान्यांवर एफआरपी वसुलीसाठी आरआरसीची कारवाई करण्यात आली आहे.हंगाम दृष्टिक्षेपात..एकूण गाळप - १३ कोटी २० लाख टनसाखर उत्पादन - १३७ लाख टनसरासरी उतारा : १०.४० टक्केसरासरी गाळप दिवस : १७३जास्तीत जास्त गाळप दिवस : २४०कमीतकमी गाळप दिवस - ३६

टॅग्स :kolhapurकोल्हापूर