शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

पैसा देणारं पीक; राज्यात दहा वर्षात ऊस क्षेत्रात १० लाख एकरची वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2022 13:36 IST

महाराष्ट्रातील सर्वाधिक साखर उतारा असलेल्या दहापैकी सात कारखाने कोल्हापूर जिल्ह्यातील.

विश्वास पाटीलकोल्हापूर : महाराष्ट्रात गेल्या दहा वर्षात उसाखालील क्षेत्रात दहा लाख एकराने वाढ झाली आहे. त्यामुळे सरासरी ३२ लाख टन ऊस वाढला आहे. साखर आयुक्त कार्यालयाने दिलेल्या माहितीवरून हे चित्र पुढे आले आहे. दहा वर्षात साखर कारखान्यांची संख्याही ३० ने वाढली आहे. कारखान्यांची गाळप क्षमता दिवसाला ३ लाख टनांनी वाढली आहे. हुकमी पैसा मिळवून देणारे पीक म्हणून शेतकरी उसाकडे मोठ्या प्रमाणावर वळत असल्याचेच त्यातून दिसत आहे.जिथे पाणी आले तिथे ऊस वाढला असे राज्यभरातील सर्वसाधारण चित्र दिसते. महाराष्ट्राच्या २०१२-१३ च्या हंगामात उसाखालील क्षेत्र ९.६४ लाख हेक्टर होते. तेच आज १३.६७ लाख हेक्टर आहे. म्हणजेच तब्बल ४.०३ लाख हेक्टर (दहा लाख एकर) क्षेत्र वाढले. शेतकरी सिंचनाची सोय झाली की ऊसपीक घेतो. त्यासाठी फारसे कष्ट नाहीत. बियाण्यापासून खतापर्यंत सगळे सहज उपलब्ध होते. कायद्याने हमीभाव मिळण्याची सोय आहे. त्याला पिकवलेला ऊस बाजारात विकायला जावा लागत नाही. निसर्ग कितीही कोपला तरी पिकाचे मर्यादित नुकसान होते. या कारणांमुळे शेतकरी या पिकाकडे वळत असल्याचे चित्र प्रामुख्याने दिसते.सोलापूर, अहमदनगर, पुणे, उस्मानाबाद, लातूर, औरंगाबाद, परभणी, नांदेड, बीड या जिल्ह्यात उसाचे क्षेत्र वाढल्याचे चित्र आहे. याउलट तृणधान्ये (११ टक्के), कडधान्ये (२७ टक्के) व तेलबिया (१३ टक्के) पिकाखालील क्षेत्र कमी होत असल्याचे आर्थिक पाहणी अहवाल सांगतो. मावळत्या हंगामात महाराष्ट्रात सर्वाधिक २४ लाख ७८ हजार टन ऊस गाळप सोलापूर जिल्ह्यातील माढा येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी कारखान्याने केले आहे.

साखर उताऱ्यात कोल्हापूर भारी..महाराष्ट्रातील सर्वाधिक साखर उतारा असलेल्या दहापैकी सात कारखाने कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. बिद्री कारखाना १२.९९ उताऱ्यासह सर्वोच्चस्थानी आहे. त्याशिवाय पंचगंगा (रेणुका शुगर्स), शाहू कागल, अथनी शुगर्स भुदरगड, ओलम चंदगड, भोगावती परिते, कुंभीकासारी कुडित्रे व इको केन चंदगड यांचा त्यामध्ये समावेश आहे.

१८६९ कोटी रुपये एफआरपी थकीत

राज्यातील १९९ पैकी ६५ कारखान्यांनी शंभर टक्के एफआरपी दिली आहे. १३४ कारखान्यांकडे १८६९ कोटी रुपये एफआरपी थकीत आहे. चार कारखान्यांवर एफआरपी वसुलीसाठी आरआरसीची कारवाई करण्यात आली आहे.हंगाम दृष्टिक्षेपात..एकूण गाळप - १३ कोटी २० लाख टनसाखर उत्पादन - १३७ लाख टनसरासरी उतारा : १०.४० टक्केसरासरी गाळप दिवस : १७३जास्तीत जास्त गाळप दिवस : २४०कमीतकमी गाळप दिवस - ३६

टॅग्स :kolhapurकोल्हापूर