शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पुढील हंगामात साखर उत्पादन घटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 23:07 IST

चंद्रकांत कित्तुरे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : देशाच्या काही भागात पडलेला दुष्काळ आणि उसावर पडलेला लोकरी मावा यामुळे ...

चंद्रकांत कित्तुरे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : देशाच्या काही भागात पडलेला दुष्काळ आणि उसावर पडलेला लोकरी मावा यामुळे पुढील गळीत हंगामात उसाचे उत्पादन, तसेच उताराही कमी होणार असल्याने देशातील साखरेचे उत्पादन ३०० लाख टनांच्या आत येण्याची शक्यता आहे. गेल्या तीन वर्षांतील हे निचांकी उत्पादन असेल.जगात ब्राझीलबरोबर भारत सर्वाधिक साखर उत्पादन करणारा देश आहे. भारतात २०१७-१८ च्या हंगामात ३२२ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. चालू हंगामातही ३१५ लाख टन साखरेचे उत्पादन होईल, असा अंदाज आहे. देशाची गरज २६० लाख टन साखरेची असल्याने सध्या देशात अतिरिक्त साखरेचा प्रश्न गंभीर बनला आहे.ही साखर कमी करण्यासाठी सरकारने ५० लाख टन निर्यातीचे लक्ष्य ठेवले असले तरी या हंगामात सुमारे ३० लाख टनांपर्यंतच साखरेची निर्यात होईल, असा साखर उद्योगातील तज्ज्ञांचा अंदाज आहे. यामुळे पुढील हंगामाच्या सुरुवातीला देशात १२५ लाख टनांहून जादा साखर शिल्लक असणार आहे. त्यामुळे पुढील हंगामात साखरेचे उत्पादन घटले तरी त्याचा फारसा परिणाम होणार नाही.याबाबत राष्टÑीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, देशाच्या काही भागात विशेषत: महाराष्टÑ आणि कर्नाटकात दुष्काळी परिस्थिती असल्याने ऊस लागवडीखालील क्षेत्र घटले आहे. तसेच उसावर लोकरी माव्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असल्याने उताऱ्यातही घट होणार आहे. परिणामी,२०१९-२०च्या साखर हंगामात साखरेचे उत्पादन ३०० लाख टनांच्या आत राहील, असा अंदाज आहे.इथेनॉलचा परिणाम दीड ते दोन वर्षांनीअतिरिक्त साखरेवर उपाय म्हणून सरकारने इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन दिले आहे. इथेनॉल प्रकल्प उभारणी, तसेच आधुनिकीकरणासाठी विविध सवलती देऊ केल्या आहेत.उसाचे उत्पादन घटल्यास या प्रकल्पांवर किंवा या प्रकल्पांचा साखरेच्या उत्पादनावर काही परिणाम होईल का, असे विचारता उभारणी सुरू असलेल्या प्रकल्पांतून इथेनॉल निर्मिती सुरू होण्यासाठी दीड ते दोन वर्षांचा कालावधी लागेल. त्यामुळे पुढील हंगामात याचा काहीही परिणाम होणार नाही, असे नाईकनवरे यांनी सांगितले.साखरेच्या मूल्यांकनात १०० रुपयांची वाढदरम्यान , साखरेचा किमान हमीभाव ३१०० रुपये प्रतिक्विंटल निश्चित केल्याने बॅँकांनी साखरेवरील उचलीतही वाढ केली आहे. मूल्यांकनात १०० रुपयांची वाढ झाली असून, १२.५ टक्के उताºयाला ३२९३ रुपये उचल मिळणार आहे. बॅँकांकडून मिळणारी उचल, उपपदार्थांच्या पैशामुळे कारखानदारांना एफआरपी देण्यासाठी थोडासा दिलासा मिळाला असला, तरी एकरकमी एफआरपी देण्यासाठी कारखान्यांची दमछाकच होणार आहे.