शहरं
Join us  
Trending Stories
1
"बुलडोझर कुठे चालवायचा? याची ट्यूशन योगीजींकडून घ्या..."; पंतप्रधान मोदींनी या दोन पक्षांना दिला सल्ला!
2
पहिली बॅटिंग, दुसरी बॅटिंग? RCB कन्फ्युज! कसं जुळवणार Playoffs चं गणित? लै झंझट
3
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
4
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
5
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
6
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला
7
‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर
8
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
9
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
10
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
11
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
12
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा
13
"मला एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती, पण...", किरण मानेंचा गौप्यस्फोट
14
Mahindra & Mahindra च्या शेअरवर गुंतवणूकदार तुटून पडले; एक्सपर्ट म्हणाले, "₹२९०० पर्यंत..."
15
बाहुबलीच्या आयुष्यात होणार देवसेनाची एन्ट्री?; प्रभासची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत
16
३.५ किलो वजन, १२०० रुपये किंमत, या दुर्मीळ आंब्याची उरलीत केवळ १० झाडं, मध्य प्रदेश सरकार चिंतीत 
17
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
18
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
19
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
20
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा

केंद्रामुळे ऊस उत्पादकांचे वर्षाला १६०० कोटींचे नुकसान:राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 11:45 PM

इचलकरंजी (जि.कोल्हापूर) : केंद्र सरकारने बेकायदेशीररीत्या एफआरपीचा (निर्धारित हमीभाव) बेस अर्ध्या टक्क्याने वाढवून राज्यातील शेतकऱ्यांचे वर्षाला १६०० कोटींचे नुकसान ...

इचलकरंजी (जि.कोल्हापूर) : केंद्र सरकारने बेकायदेशीररीत्या एफआरपीचा (निर्धारित हमीभाव) बेस अर्ध्या टक्क्याने वाढवून राज्यातील शेतकऱ्यांचे वर्षाला १६०० कोटींचे नुकसान केले आहे. याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करून कायद्याने अद्दल घडविणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, खासदार राजू शेट्टी यांनी दिला.इचलकरंजी येथे शनिवारी रात्री भाजप सरकारच्या कारभाराचा पंचनामा या विषयावर आयोजित सभेत ते बोलत होते. शेट्टी म्हणाले, एफआरपीमध्ये २०० रुपयांची वाढ केल्याने राजू शेट्टी यांना आता काही काम राहिले नाही अशी टीका दोन्ही सरकारमधील भाजप नेते करत आहेत. मात्र, २०० रुपयांची वाढ, अशी फसवी घोषणा केली. सरकारने प्रत्यक्षात २०० रुपयांची वाढ दिल्याचे सांगत असले तरी रिकव्हरीचा ९.५ टक्के असलेला बेस दहा टक्के केला आहे. त्यामुळे शेतकºयांना फक्त १३.५० रुपयांचीच वाढ मिळणार आहे. त्यातही उत्पादन खर्च वाढल्याने चौदा रुपयांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे शेतकरी ५० पैसे नुकसानीतच राहणार आहे.वस्त्रोद्योगासाठी लढा उभारणारशेट्टी म्हणाले, भाजप सरकारने वस्त्रोद्योगाची परिस्थिती बिकट बनविली आहे. वीज दर कमी केले म्हणून तीनवेळा भाजप नेत्यांनी साखर वाटली. ही साखर वाटून लोकांची साखर वाढली. मात्र, वीज दर कमी झाले नाहीत. वस्त्रोद्योगमंत्र्यांनी अनेक घोषणा केल्या, त्याही आजतागायत पूर्ण केल्या नाहीत. त्यामुळे भविष्यात यंत्रमागधारकांना सोबत घेऊन याविरोधात मोठा लढा उभारणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.चंद्रकांत पाटील यांनीच माझ्याविरुद्ध लढावेराजू शेट्टी म्हणाले, हातकणंगले लोकसभा मतदारसंघात प्रत्येक वेळी माझ्याविरोधात नव्या उमेदवारांची नावे घोषित करीत बसण्यापेक्षा कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीच माझ्या विरोधात निवडणूक लढवावी. माझे त्यांना जाहीर आव्हान आहे.