शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

साखर कारखाने धुमधडाक्यात सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 00:50 IST

कोल्हापूर : ऊसदराची कोंडी फुटल्याने रविवारी जिल्ह्यातील सर्वच साखर कारखान्यांच्या ऊसतोडी धुमधडाक्यात सुरू झाल्या. पंधरा दिवस प्रतीक्षेत असलेले ऊसतोड ...

कोल्हापूर : ऊसदराची कोंडी फुटल्याने रविवारी जिल्ह्यातील सर्वच साखर कारखान्यांच्या ऊसतोडी धुमधडाक्यात सुरू झाल्या. पंधरा दिवस प्रतीक्षेत असलेले ऊसतोड मजुरांचे कोयते अखेर तोडीसाठी सरसावले. साखर कारखान्यांवर अवलंबून असणाऱ्या यंत्रणेची लगबग वाढली आहे.‘स्वाभिमानी’ शेतकरी संघटनेने ‘एफआरपी’ अधिक २०० रुपयांची मागणी करून ऊसदर आंदोलनाचे रणशिंग फुंकले होते. संघटना व कारखानदार आपापल्या भूमिकांवर ठाम राहिल्याने पेच वाढत गेला. जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखान्यांचे ऊसतोडणी मजूर परजिल्ह्यातून दाखल झाले होते. त्यांच्या पोटाचा प्रश्न निर्माण झाला होताच; पण त्याबरोबर हंगाम लांबला तर जानेवारीनंतर पाणीटंचाईच्या झळा जाणवणार, ही समस्या कारखानदारांसमोर होती. पंधरा दिवस चर्चेच्या फेºया रंगल्या. याकडे सर्व ऊस उत्पादकांचे लक्ष लागून राहिले होते.अखेर शनिवारी (दि. १०) स्वाभिमानी शेतकरी संघटना व साखर कारखानदार यांच्यात तडजोड झाली. ऊसदराची कोंडी फुटल्याने ‘स्वाभिमानी’चे चक्का जाम आंदोलन मागे घेतल्याने कारखान्यांनी शनिवारी दुपारपासूनच आपापली ऊसतोडणी यंत्रणा सुरू केली होती. पंधरा दिवस हंगामाच्या प्रतीक्षेत असलेले ऊसतोड मजुरांचे कोयते, खुरपी अखेर सरसावली. रविवारी सकाळी बहुतांश कारखान्यांनी ऊसतोडणीची प्रक्रिया सुरू केली असून, अनेक कारखान्यांनी प्रत्यक्ष गाळपही सुरू केले आहे.‘राजाराम’, ‘संताजी घोरपडे’, ‘बिद्री’, ‘हमीदवाडा’, ‘डी. वाय. पाटील’, ‘दत्त-शिरोळ’ या कारखान्यांचे गाळप सुरू आहे. ‘कुंभी’, ‘दालमिया’, ‘वारणा’, ‘शरद’, ‘शाहू’ने रविवारी ऊसतोडी दिल्या; तर ‘पंचगंगा’ कारखाना आज, सोमवारी ऊसतोडी देणार आहे. येत्या तीन-चार दिवसांत सर्वच कारखान्यांचा गळीत हंगाम गती घेईल.वैरणीचा प्रश्न मिटलासप्टेंबरपासूनच पावसाने दडी मारण्यास सुरुवात केल्याने यंदा ओल्या वैरणीचा प्रश्न दूध उत्पादकांसमोर आहे. दराच्या कोंडीमुळे कारखाने उशिरा सुरू झाल्याने अडचणी वाढल्या होत्या. अखेर कोंडी फुटली आणि दूध उत्पादकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.‘शिरोळ’मध्ये अजून आंदोलनाची धग‘स्वाभिमानी’ने आंदोलन मागे घेतले असले तरी अजून ‘शिरोळ’मध्ये आंदोलनाची धग कायम आहे. ‘अंकुश’, ‘बळिराजा’सह इतर संघटनांनी रविवारी ‘अन्नत्याग’ आंदोलन सुरू केल्याने तणाव आहे.