शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
2
संजय राऊतांना PM मोंदीचे नेतृत्व, क्षमतेवर शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही?”
3
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
4
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
5
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
6
"आता आर-पार करण्याची वेळ आलीय...", जावेद अख्तर यांनी पहलगाम हल्ल्यावरून पाकिस्तानला फटकारलं
7
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
8
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
9
Delhi Rains : पावसाचे थैमान! दिल्ली-NCR मध्ये रस्ते पाण्याखाली, १०० फ्लाइट्स लेट; ४ जणांनी गमावला जीव
10
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला केले जाते पितृतर्पण; कसे आणि का? सविस्तर जाणून घ्या!
11
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
12
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
13
Adani Enterprises Q4 Results: जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
14
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
15
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
16
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
17
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
18
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
19
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
20
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक

साखर कारखाने धुमधडाक्यात सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 00:50 IST

कोल्हापूर : ऊसदराची कोंडी फुटल्याने रविवारी जिल्ह्यातील सर्वच साखर कारखान्यांच्या ऊसतोडी धुमधडाक्यात सुरू झाल्या. पंधरा दिवस प्रतीक्षेत असलेले ऊसतोड ...

कोल्हापूर : ऊसदराची कोंडी फुटल्याने रविवारी जिल्ह्यातील सर्वच साखर कारखान्यांच्या ऊसतोडी धुमधडाक्यात सुरू झाल्या. पंधरा दिवस प्रतीक्षेत असलेले ऊसतोड मजुरांचे कोयते अखेर तोडीसाठी सरसावले. साखर कारखान्यांवर अवलंबून असणाऱ्या यंत्रणेची लगबग वाढली आहे.‘स्वाभिमानी’ शेतकरी संघटनेने ‘एफआरपी’ अधिक २०० रुपयांची मागणी करून ऊसदर आंदोलनाचे रणशिंग फुंकले होते. संघटना व कारखानदार आपापल्या भूमिकांवर ठाम राहिल्याने पेच वाढत गेला. जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखान्यांचे ऊसतोडणी मजूर परजिल्ह्यातून दाखल झाले होते. त्यांच्या पोटाचा प्रश्न निर्माण झाला होताच; पण त्याबरोबर हंगाम लांबला तर जानेवारीनंतर पाणीटंचाईच्या झळा जाणवणार, ही समस्या कारखानदारांसमोर होती. पंधरा दिवस चर्चेच्या फेºया रंगल्या. याकडे सर्व ऊस उत्पादकांचे लक्ष लागून राहिले होते.अखेर शनिवारी (दि. १०) स्वाभिमानी शेतकरी संघटना व साखर कारखानदार यांच्यात तडजोड झाली. ऊसदराची कोंडी फुटल्याने ‘स्वाभिमानी’चे चक्का जाम आंदोलन मागे घेतल्याने कारखान्यांनी शनिवारी दुपारपासूनच आपापली ऊसतोडणी यंत्रणा सुरू केली होती. पंधरा दिवस हंगामाच्या प्रतीक्षेत असलेले ऊसतोड मजुरांचे कोयते, खुरपी अखेर सरसावली. रविवारी सकाळी बहुतांश कारखान्यांनी ऊसतोडणीची प्रक्रिया सुरू केली असून, अनेक कारखान्यांनी प्रत्यक्ष गाळपही सुरू केले आहे.‘राजाराम’, ‘संताजी घोरपडे’, ‘बिद्री’, ‘हमीदवाडा’, ‘डी. वाय. पाटील’, ‘दत्त-शिरोळ’ या कारखान्यांचे गाळप सुरू आहे. ‘कुंभी’, ‘दालमिया’, ‘वारणा’, ‘शरद’, ‘शाहू’ने रविवारी ऊसतोडी दिल्या; तर ‘पंचगंगा’ कारखाना आज, सोमवारी ऊसतोडी देणार आहे. येत्या तीन-चार दिवसांत सर्वच कारखान्यांचा गळीत हंगाम गती घेईल.वैरणीचा प्रश्न मिटलासप्टेंबरपासूनच पावसाने दडी मारण्यास सुरुवात केल्याने यंदा ओल्या वैरणीचा प्रश्न दूध उत्पादकांसमोर आहे. दराच्या कोंडीमुळे कारखाने उशिरा सुरू झाल्याने अडचणी वाढल्या होत्या. अखेर कोंडी फुटली आणि दूध उत्पादकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.‘शिरोळ’मध्ये अजून आंदोलनाची धग‘स्वाभिमानी’ने आंदोलन मागे घेतले असले तरी अजून ‘शिरोळ’मध्ये आंदोलनाची धग कायम आहे. ‘अंकुश’, ‘बळिराजा’सह इतर संघटनांनी रविवारी ‘अन्नत्याग’ आंदोलन सुरू केल्याने तणाव आहे.