शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

साखर कारखाने धुमधडाक्यात सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 00:50 IST

कोल्हापूर : ऊसदराची कोंडी फुटल्याने रविवारी जिल्ह्यातील सर्वच साखर कारखान्यांच्या ऊसतोडी धुमधडाक्यात सुरू झाल्या. पंधरा दिवस प्रतीक्षेत असलेले ऊसतोड ...

कोल्हापूर : ऊसदराची कोंडी फुटल्याने रविवारी जिल्ह्यातील सर्वच साखर कारखान्यांच्या ऊसतोडी धुमधडाक्यात सुरू झाल्या. पंधरा दिवस प्रतीक्षेत असलेले ऊसतोड मजुरांचे कोयते अखेर तोडीसाठी सरसावले. साखर कारखान्यांवर अवलंबून असणाऱ्या यंत्रणेची लगबग वाढली आहे.‘स्वाभिमानी’ शेतकरी संघटनेने ‘एफआरपी’ अधिक २०० रुपयांची मागणी करून ऊसदर आंदोलनाचे रणशिंग फुंकले होते. संघटना व कारखानदार आपापल्या भूमिकांवर ठाम राहिल्याने पेच वाढत गेला. जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखान्यांचे ऊसतोडणी मजूर परजिल्ह्यातून दाखल झाले होते. त्यांच्या पोटाचा प्रश्न निर्माण झाला होताच; पण त्याबरोबर हंगाम लांबला तर जानेवारीनंतर पाणीटंचाईच्या झळा जाणवणार, ही समस्या कारखानदारांसमोर होती. पंधरा दिवस चर्चेच्या फेºया रंगल्या. याकडे सर्व ऊस उत्पादकांचे लक्ष लागून राहिले होते.अखेर शनिवारी (दि. १०) स्वाभिमानी शेतकरी संघटना व साखर कारखानदार यांच्यात तडजोड झाली. ऊसदराची कोंडी फुटल्याने ‘स्वाभिमानी’चे चक्का जाम आंदोलन मागे घेतल्याने कारखान्यांनी शनिवारी दुपारपासूनच आपापली ऊसतोडणी यंत्रणा सुरू केली होती. पंधरा दिवस हंगामाच्या प्रतीक्षेत असलेले ऊसतोड मजुरांचे कोयते, खुरपी अखेर सरसावली. रविवारी सकाळी बहुतांश कारखान्यांनी ऊसतोडणीची प्रक्रिया सुरू केली असून, अनेक कारखान्यांनी प्रत्यक्ष गाळपही सुरू केले आहे.‘राजाराम’, ‘संताजी घोरपडे’, ‘बिद्री’, ‘हमीदवाडा’, ‘डी. वाय. पाटील’, ‘दत्त-शिरोळ’ या कारखान्यांचे गाळप सुरू आहे. ‘कुंभी’, ‘दालमिया’, ‘वारणा’, ‘शरद’, ‘शाहू’ने रविवारी ऊसतोडी दिल्या; तर ‘पंचगंगा’ कारखाना आज, सोमवारी ऊसतोडी देणार आहे. येत्या तीन-चार दिवसांत सर्वच कारखान्यांचा गळीत हंगाम गती घेईल.वैरणीचा प्रश्न मिटलासप्टेंबरपासूनच पावसाने दडी मारण्यास सुरुवात केल्याने यंदा ओल्या वैरणीचा प्रश्न दूध उत्पादकांसमोर आहे. दराच्या कोंडीमुळे कारखाने उशिरा सुरू झाल्याने अडचणी वाढल्या होत्या. अखेर कोंडी फुटली आणि दूध उत्पादकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.‘शिरोळ’मध्ये अजून आंदोलनाची धग‘स्वाभिमानी’ने आंदोलन मागे घेतले असले तरी अजून ‘शिरोळ’मध्ये आंदोलनाची धग कायम आहे. ‘अंकुश’, ‘बळिराजा’सह इतर संघटनांनी रविवारी ‘अन्नत्याग’ आंदोलन सुरू केल्याने तणाव आहे.