शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

ऊस दराचा चेंडू सरकारच्या कोर्टात, कोल्हापूर  जिल्ह्यात कारखान्यांची धुराडी बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 12:20 IST

सरकारलाच व्हीलन ठरवून आपापले गड शाबूत ठेवण्यालाच प्राधान्य देण्याची सावध भूमिका कारखानदार व संघटनेने घेतल्याने साखर पट्ट्यात आंदोलनाची आणि कारखान्यांचीही धुराडी बंदच आहे.

ठळक मुद्देऊस दराचा चेंडू सरकारच्या कोर्टात, कोल्हापूर  जिल्ह्यात कारखान्यांची धुराडी बंदचकारखानदार, शेतकरी संघटना सावध भूमिकेत, राज्य सरकारच्या भूमिकेकडे लक्ष

कोल्हापूर : ऊस परिषदेनंतर पेटणारे आंदोलनाचे फड यंदा नुसतेच धुमसत आहेत. तोंडावर असलेल्या लोकसभा निवडणुकीची त्याला किनार आहे. कारखानदार आणि शेतकरी संघटनांचे प्रतिनिधीच संभाव्य उमेदवार असल्याने मतदार असलेल्या शेतकऱ्यांची नाराजी कुणालाच परवडणारी नाही. त्यामुळेच या दोघांनी परस्परांवरील टीका टाळून थेट राज्य आणि केंद्र सरकारलाच लक्ष्य करत ऊस दराचा चेंडू सरकारच्या कोर्टात टोलवून नामानिराळे झाले आहेत. सरकारलाच व्हीलन ठरवून आपापले गड शाबूत ठेवण्यालाच प्राधान्य देण्याची सावध भूमिका कारखानदार व संघटनेने घेतल्याने साखर पट्ट्यात आंदोलनाची आणि कारखान्यांचीही धुराडी बंदच आहे.गेल्यावर्षी २ नोव्हेंबरपासून बहुतांश कारखान्यांचे गाळप सुरू झाले होते; पण यावर्षी पहिल्या उचलीचा गुंता सुटला नसल्याने हंगाम सुरू होण्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

शेतकरी संघटनेच्या मागणीनुसार एफआरपी अधिक २00 रुपये देणे शक्य नसल्याचे सांगत कारखानदारांनी स्वत:हून साखर कारखाने बंद ठेवले आहेत. त्यामुळेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही आपली सर्व आंदोलने स्थगित केली आहेत; मात्र संघटना एफआरपी अधिक २00 रुपये या पहिल्या उचलीच्या मागणीवर, तर कारखानदार एकरकमी एफआरपीवर ठाम आहेत. एफआरपी देण्यासाठी साखरेचे दर ३४00 रुपये व्हावेत, त्यासाठी राज्य सरकारने केंद्राकडे पाठपुरावा करावा, असा आग्रह साखर कारखानदारांचा आहे.दोघांनीही सरकारनेच मध्यस्थी करावी अशी भूमिका घेतली आहे; पण सरकारी पातळीवर दराची कोंडी फुटावी म्हणून कोणत्याही पातळीवर हालचाली होताना दिसत नाहीत. गतवर्षी स्वत: पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सर्व कारखानदार व शेतकरी संघटनांची एकत्रित बैठक घडवून आणत एफआरपी अधिक २00 रुपये असा पहिल्या उचलीचा फॉर्म्युला निश्चित केला होता; पण या फॉर्म्युल्याचे पालन जिल्ह्यातील कारखान्यांनी केलेले नसल्याने सरकारच्या मध्यस्थीवरूनही शेतकऱ्यांमध्ये असंतोष दिसत आहे.

यातून तोडगा लवकर निघावा, अशी अपेक्षा आहे; कारण यावर्षी जिल्ह्यात उसाचे क्षेत्र जास्त असले तरी अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणावर ऊस कुजून गेला आहे. लोकरी मावा, हुमणी, तांबेऱ्यांमुळे ऊस वाळला आहे. त्यामुळे उसाच्या उत्पादनात २५ ते ३0 टक्क्यांपर्यंत घट येणार असल्याने, आहे तो ऊस लवकर तुटावा, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.तिजोरी उघडण्याची प्रतीक्षाएफआरपी देताना रक्कम कमी पडली तर सरकार शेतकऱ्यांसाठी तिजोरी उघडण्यास तयार आहे, असे खुद्द मुख्यमंत्र्यांनी वारणेत झालेल्या ऊस परिषदेत जाहीर केले होते; पण यालाही आठवडा झाला तरी अजून काही तिजोरी उघडली गेलेली नाही. शेतकऱ्यांसह कारखानदार, संघटना ही तिजोरी उघडण्याच्या प्रतिक्षेत आहेत.

तोडणी मजुरात चिंतेचे वातावरणजिल्ह्यातील चार कारखान्यांनी दोन-तीन दिवस गाळप करून ते पुन्हा बंद ठेवले आहेत. ऊस तोडणीच्या टोळ्या कारखाना कार्यस्थळावर बसून आहेत. तोडीच बंद असल्याने जनावरांच्या वैरणीचाही प्रश्न या मजुरांना भेडसावू लागला आहे.

 

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेkolhapurकोल्हापूर