शहरं
Join us  
Trending Stories
1
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
2
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
3
Aadhaar Card : तुमचे 'आधार कार्ड' लॉक करा, नाही तर बँक खाते होईल रिकामे; जाणून घ्या प्रक्रिया
4
सोन्या-चांदीच्या किंमतीबाबत बाबा वेंगानी काय म्हटलं; दरांबाबत काय केली भविष्यवाणी? जाणून घ्या
5
पुण्यात भाजपची अळीमिळी गुपचिळी! 'उमेदवारी मिळाली हो...!' उमेदवारांचे समर्थकांना सकाळीच गेले फोन, एबी फॉर्म उद्या मिळणार?
6
BMC Election 2026 Shiv Sena UBT List: उद्धवसेनेकडून मुंबई महापालिकेसाठी ५५ जणांना उमेदवारी, कोणाला मिळाले एबी फॉर्म?
7
सावधान! तुमच्या नावावर भलतेच कोणी सिम वापरत नाहीये ना? 'या' पोर्टलवर घरबसल्या करा तपासणी
8
मकर राशीसाठी नवीन वर्ष 2026: जुन्या आव्हानांचा होणार अंत; प्रगतीसाठी 'हे' सूत्र वापरा आणि यश मिळवा!
9
२०२५ची शेवटची पुत्रदा एकादशी: कसे कराल व्रतपूजन?; ‘या’ गोष्टी आवर्जून करा, पुण्य-लाभ मिळेल!
10
मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का; मुंबई अध्यक्षा राखी जाधव यांचा भाजपात प्रवेश
11
Silver Price Crash: एका तासात चांदी २१ हजार रुपयांनी आपटली; विक्रमी उच्चांकानंतर किमतीत का आला भूकंप?
12
"माझी शिवसेनेतून हकालपट्टी करा, कारण..."; KDMC च्या माजी सभागृह नेत्याचं एकनाथ शिंदेंना पत्र
13
‘मोदी आणि ईव्हीएमच्या बळावर भाजपा माज करतोय, कोणत्याही परिस्थितीत मुंबईला वाचवायचंय’, राज ठाकरेंचं मोठं विधान 
14
मालेगावात महायुतीचे नेमके अडले कुठे? आता चर्चा वरिष्ठ स्तरावर; स्थानिक पातळीवर एकमत होईना
15
VHT 2025 : टीम इंडियातील 'ध्रुवतारा' चमकला! पांड्याच्या संघातील गोलंदाजांना धु धु धुतलं
16
पश्चिममध्ये तीन प्रभागांत भाजप विरुद्ध भाजप! शिंदेसेना- राष्ट्रवादी एकत्र, महाविकास आघाडीचा प्रभाव
17
५ वर्षांत १०००% चं रिटर्न, आज अचानक जोरदार आपटला हा शेअर; कोणता आहे स्टॉक, कारण काय?
18
तोच तोच ईमेल आयडी वापरून कंटाळा आलाय? गुगल देतेय युजरनेम बदलायची संधी, अकाऊंट तेच राहणार पण...
19
राम मंदिराचा धर्म ध्वज भाविकांना भावला, देशभरातून मोठी मागणी; किती रुपयांना मिळते प्रतिकृती?
20
अरावली प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने आपल्याच निर्णयाला दिली स्थगिती, सरकारकडून माहिती अन् तज्ञ समितीकडून अहवाल मागवला
Daily Top 2Weekly Top 5

साखरेच्या बफर स्टॉकमध्ये ‘सह्याद्री’ देशात अव्वल: हुपरीचा ‘जवाहर’ दुसरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 00:29 IST

चंद्रकांत कित्तुरे ।कोल्हापूर : देशातील ५०२ साखर कारखान्यांचा साखरेचा बफर स्टॉक केंद्र सरकारने जाहीर केला आहे. यामध्ये देशात सातारा जिल्ह्यातील सह्याद्री साखर कारखाना पहिला, तर कोल्हापूर जिल्ह्यातील जवाहर साखर कारखाना दुसऱ्या स्थानावर आहे.देशात यंदा साखरेचे ३१५ लाख टनांहून अधिक उत्पादन झाले आहे, तर मागणी २५० लाख टन आहे. अतिरिक्त उत्पादन ...

ठळक मुद्देकेंद्राकडून कारखानानिहाय यादी जाहीर

चंद्रकांत कित्तुरे ।कोल्हापूर : देशातील ५०२ साखर कारखान्यांचा साखरेचा बफर स्टॉक केंद्र सरकारने जाहीर केला आहे. यामध्ये देशात सातारा जिल्ह्यातील सह्याद्री साखर कारखाना पहिला, तर कोल्हापूर जिल्ह्यातील जवाहर साखर कारखाना दुसऱ्या स्थानावर आहे.

देशात यंदा साखरेचे ३१५ लाख टनांहून अधिक उत्पादन झाले आहे, तर मागणी २५० लाख टन आहे. अतिरिक्त उत्पादन झाल्याने घाऊक बाजारातील साखरेचे दर २४ रुपयांपर्यंत खाली आले होते. ते वाढावेत यासाठी केंद्र सरकारने कारखान्यांसाठी साखरेचा विक्री दर ठरविण्यासह विविध उपाययोजना केल्या आहेत. यामध्ये ३० लाख टन साखरेचा बफर स्टॉक करण्याच्या निर्णयाचाही समावेश होता.

या निर्णयाची अंमलबजावणी करताना देशातील ५०२ साखर कारखान्यांकडील ३१ मे अखेर शिल्लक असलेला साखर साठा विचारात घेऊन प्रत्येक कारखान्याकडे किती साखरेचा बफर स्टॉक राहील याची कारखानानिहाय यादी केंद्र सरकारने जाहीर केली आहे. त्यामध्ये देशातील ३० कारखान्यांकडे १५ हजार टनांहून अधिक बफर स्टॉक राहणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांच्या वाट्याला एक लाख ९३ हजार टन साखर बफर स्टॉकसाठी आली आहे.

यात हुपरी येथील जवाहर सहकारी साखर कारखान्याकडे देशातील दुसºया क्रमांकाचा म्हणजेच ३१ हजार ३६५ टन बफर स्टॉक राहणार आहे. देशातील सर्वाधिक म्हणजे ३२ हजार ६८९ टन बफर स्टॉक सातारा जिल्ह्यातील कºहाड तालुक्यातील सह्याद्री साखर कारखान्याकडे असणार आहे. उत्तर प्रदेशातील खाटौली येथील त्रिवेणी कारखान्याकडे २३ हजार ८५५ टन, तर बेळगाव जिल्ह्यातील उगार साखर कारखान्याकडे २३ हजार ५६० टन साखरेचा बफर स्टॉक राहणार आहे.साखरेचे दर वधारणारकेंद्र सरकारने ६००० कोटींचे पॅकेज जाहीर केल्यानंतर घाऊक बाजारातील साखरेचे दर ३२०० रुपये प्रतिक्विंटलवर गेले होते. सध्या ते २९५० ते ३००० रुपयांवर आहेत. साखरेच्या बफर स्टॉकमुळे हे दर वधारतील, असा साखर उद्योगातील तज्ज्ञांचा अंदाज आहे.राज्यात जादा साखर साठागेल्या दोन-तीन वर्षापासून उत्तर प्रदेश साखर उत्पादनात प्रथम क्रमांकावर आहे. मात्र बफर स्टॉकची यादी पहाता तेथील कारखान्यांपेक्षा महाराष्टÑातील कारखान्याकडे जादा साखर शिल्लक असल्याचे दिसते. यावरुन उत्तर प्रदेशातील कारखान्यांनी त्यांच्याकडील साखर मोठ्या प्रमाणात विकून टाकल्याचे स्पष्ट होते.व्याज, विमा, गोदाम भाडे मिळणारबफर स्टॉक करणाºया साखर कारखान्यांना केंद्र सरकार व्याज, विमा आणि गोदाम भाडे देणार आहे. त्यासाठी ११०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. हा स्टॉक एक वर्षासाठी असणार आहे. 

साखर विक्रीचे दर ठरवून दिल्याने आणि बफर स्टॉक केल्याने बाजारातील साखरेचे दर वाढतील आणि कारखान्यांना त्यांची देणी देणे शक्य होईल. सह्याद्री कारखान्याने एफआरपी पेक्षा १०० रुपये जास्त दर दिला आहे. त्याची बिलेही अदा केली आहेत.- आमदार बाळासाहेब पाटील, अध्यक्ष, सह्याद्री सहकारी साखर कारखाना.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखाने