शहरं
Join us  
Trending Stories
1
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
2
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
3
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
4
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
5
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
6
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
7
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
8
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
9
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
10
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
11
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

भूतदयेसाठी भारत भ्रमण करणारा सुफी

By admin | Updated: July 12, 2015 21:23 IST

सात हजार कि.मी.चा प्रवास : ग्रामस्थ भारावले

रामचंद्र कुडाळकर - तळवडे --आजच्या विज्ञान-तंत्रज्ञानाच्या युगात सर्वांनाच प्रगती करण्याची व त्यातही पुढे जाण्याची घाई लागली आहे. पण एकेकाळी आपल्या जगण्याचा अविभाज्य घटक असलेल्या आणि काही प्रमाणात उदरनिर्वाहाचेही साधन ठरलेल्या पाळीव प्राण्यांचे मात्र या युगात पाहिजे तसे पालन होताना दिसत नाही. म्हणूनच आज गावोगावी भटकी कुत्री, मांजर, गायी, म्हशी असे प्राणी आढळतात. याच प्राण्यांच्या पालनपोषणाचे आवाहन करण्यासाठी जम्मू-काश्मीरहून भारतभ्रमण करणाऱ्या एका व्यक्तीचे कार्य सावंतवाडी तालुक्यातील तळवडे पंचक्रोशीत कौतुकास्पद ठरले. भूतदयेचा संदेश देणाऱ्या या अवलियाला पाहून ग्रामस्थ काही काळ भावनिक झाले. या ४३ वर्षीय व्यक्तीचे नाव सुफी अल्ताफ भाट असे असून, आतापर्यंत त्याने सात हजार किलोमीटरचा पायी प्रवास केला आहे. २६ सप्टेंबर २०१० पासून त्याने जम्मू-काश्मीर ते मुंबई, गुजरात, राजस्थान, हरियाणा, पंजाब, दिल्ली व गोवापर्यंतचा प्रवास केला. आता तो मुंबईकडे मार्गक्रमण करीत आहे. वाटेत भेटेल त्याला शांतीमय जीवनाचा व सहनशीलतेचा संदेश देत विनम्रपणे जाणारा हा अवलिया भूतदयेसाठी आदर्शवत ठरला आहे. गावोगावी फिरणारी भटकी कुत्री, जनावरे यांच्या नसबंदीअभावी वाढणारी संख्या समाजास घातक ठरतेच, पण त्याचबरोबर त्या प्राणिमात्रांचे पालनपोषणही अडचणीचे ठरते. प्लास्टिकचा कचरा रस्तोरस्ती पडत आहे. भटकणारे प्राणी हा कचरा खाऊन अनेक आजारांना बळी पडतात. प्राणी लहान मुलांवर हल्ला करतात. त्यामुळे रॅबीज लस द्यावी लागते. या प्राण्यांवर योग्य व आवश्यक उपचार केला जात नसल्याने साहजिकच प्राण्यांचे हे रोग वातावरणाद्वारे मानवाच्या आरोग्यालाही घातक होऊ शकतात. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने भटकणाऱ्या प्राण्यांना आपलेसे करून त्यांचे पालनपोषण केले तर भूतदयाही होईलच, पण त्याचबरोबर मोठे सामाजिक कामही त्यांच्या हातून घडेल, असे भावनिक विवेचन सुफी भाट ग्रामस्थांशी करतो. यामुळे ग्रामस्थही भावनिक होऊन धीरगंभीर होतात. सुुफीकडे त्याच्या भटकंतीवेळी सापडलेली दोन कुत्री व एक मांजर आहे. त्यांची तो नित्यनियमाने सेवा करतो. खिशात आवश्यक तेवढा पैसा आणि पाठीशी हवे तेवढे पाठबळ नसताना सुफीची ही वाट म्हणजे समाजाला भूतदयेचा आदर्शवत मार्ग दर्शविणारी आहे. गोवा राज्याची सफर केल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्ह्यातील मळगाव येथील महामार्गावर पायी जाणाऱ्या सुफी भाट याच्याशी ग्रामस्थांनी चर्चा केली. त्यावेळी त्याने जगाच्या नकाशावरील भारतातील पर्यटनाचे सर्वोत्तम ठिकाण म्हणून गौरविले जाणारे गोवा राज्य हे आपल्या भटकंतीच्या मुख्य उद्देशाला फायदेशीर ठरणार असल्याने आपण इकडे आल्याचे सांगितले.