शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

साखरेला प्रतिक्विंटल 150 रुपये अनुदान ? राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णयाची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2021 03:52 IST

राज्यातील साखर उद्योगासमोरील आव्हाने आणि उपाय या विषयावर ऑल इंडिया शुगर ट्रेड असोसिएशन (ऐस्टा)चे अध्यक्ष प्रफुल विठलानी यांनी गुरुवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत झालेल्या बैठकीत सादरीकरण केले. त्यानंतर वरील निर्णय घेण्यात आला. 

- चंद्रकांत कित्तुरेकोल्हापूर : राज्यातील साखर कारखान्यांना त्यांच्या साखर विक्री, पाठवणी आणि रेल्वे वाहतुकीच्या भाड्याच्या पावतीवर प्रतिक्विंटल १५० रुपये अनुदान देण्याच्या प्रस्तावावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवला जाणार आहे. याशिवाय साखरेचा किमान विक्री दर दुहेरी ठेवावा, तसेच गुजरातप्रमाणे उसाची एफआरपी तीन हप्त्यात देण्याची तरतूद करावी यासाठी केंद्र सरकारकडे आग्रह धरण्यात येणार आहे. (Subsidy of Rs 150 per quintal to Sugar? Possibility of decision in state cabinet meeting)राज्यातील साखर उद्योगासमोरील आव्हाने आणि उपाय या विषयावर ऑल इंडिया शुगर ट्रेड असोसिएशन (ऐस्टा)चे अध्यक्ष प्रफुल विठलानी यांनी गुरुवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत झालेल्या बैठकीत सादरीकरण केले. त्यानंतर वरील निर्णय घेण्यात आला. देशात साखरेची सर्वाधिक मागणी उत्तर आणि ईशान्य भारतातील राज्यांकडून असते. उत्तर प्रदेशातील साखर कारखान्यांना वाहतुकीच्या दृष्टीने ही राज्ये जवळ असल्याने वाहतूक भाडे कमी होते. परिणामी तेथील साखर महाराष्ट्रातील साखरेपेक्षा स्वस्त पडते. त्यामुळे राज्यातील साखरेला मागणी कमी झाली आहे. राज्याच्या वाट्याला आलेल्या विक्री कोट्यापैकी ३० टक्के साखर विकलीच गेलेली नाही. प्रति क्विंटल २०० रुपये रेल्वे भाड्याच्या पावतीवर साखरेला अनुदान दिल्यास राज्यातील साखर कारखाने उत्तर प्रदेशातील कारखान्यांशी दराची स्पर्धा करू शकतील, असे विठलानी यांनी यावेळी सांगितले. सादरीकरणानंतर तिन्ही प्रस्तावावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह उपस्थित मंत्र्यांनी सहमती दर्शविली.साखरेचा विक्री दर दुहेरी ठेवावाईशान्येकडील राज्यांचे अंतर उत्तर प्रदेशातील कारखान्यांना हजार ते १२०० किलोमीटर, तर महाराष्ट्रातील कारखान्यांना २१०० ते २२०० किलोमीटर पडते. यामुळे महाराष्ट्रातील कारखान्यांना सुमारे १००० किलोमीटरचे वाहतूक भाडे जादा द्यावे लागते. साखरेचा किमान विक्री दर मात्र देशभर एकच आहे. हे अंतर लक्षात घेऊन साखरेचा किमान विक्री दर उत्तर भारतातील कारखान्यांना प्रतिक्विंटल १०० रुपये जादा ठेवावा, असे मत विठलानी यांनी मांडले. त्यासाठी केंद्र सरकारकडे आग्रह धरण्याला बैठकीत मान्यता देण्यात आली. 

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार