शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

जिल्हा परिषद पदाधिकारी बदलाचा विषय थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत, शिवसेनेतील गुंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 12:59 IST

Politics zp Kolhapur : कोल्हापूर जिल्हा परिषदेतील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याचा विषय आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत जाणार आहे. उच्च तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याशी मंगळवारी माजी आमदार सत्यजित पाटील आणि डॉ. सुजित मिणचेकर यांनी स्वतंत्रपणे चर्चा केली.

ठळक मुद्दे जिल्हा परिषद पदाधिकारी बदलाचा विषय थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत, शिवसेनेतील गुंता मंत्री उदय सामंत यांच्याशी सत्यजित पाटील, सुजित मिणचेकर यांची चर्चा

कोल्हापूर : जिल्हा परिषदेतील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याचा विषय आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत जाणार आहे. उच्च तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याशी मंगळवारी माजी आमदार सत्यजित पाटील आणि डॉ. सुजित मिणचेकर यांनी स्वतंत्रपणे चर्चा केली.

सत्यजित पाटील गटाचे सदस्य व बांधकाम सभापती हंबीरराव पाटील हे राजीनामा द्यायला तयार नसल्याने आता मुख्यमंत्र्यांकडूनच सत्यजित पाटील यांना त्यांचा राजीनामा घेण्याबाबत सूचना देण्यात येणार आहेत. गोकूळची झालेली निवडणूक व विधानसभेची आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राजीनामा देण्याचा गुंता तयार झाला आहे.जिल्हा परिषदेतील शिवसेनेच्या तीनही पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याचा विषय गेले दोन महिने गाजत आहे. संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर येऊन गेले, पण राजीनामे काही झाले नाहीत. या पार्श्वभूमीवर कोल्हापूरचे संपर्कमंत्री असलेल्या उदय सामंत यांनी शासकीय विश्रामगृहावर सकाळी पदाधिकाऱ्यांशी आणि माजी आमदारांशी चर्चा केली. जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी वस्तुस्थिती सांगितली.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील हे तीनही पदाधिकारी असून, आता त्यांनी राजीनामे दिल्यानंतर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील इच्छुकांना ही पदे द्यावी लागतील. जिल्हा परिषद सभागृहाची मुदत संपत आली असून, या तिघांचे राजीनामे झाल्याशिवाय कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांचा राजीनामा होऊ शकत नाही. या वेळी जिल्हाप्रमुख संजय पवार, मुरलीधर जाधव, ह्यगोकूळह्णचे संचालक अजित नरके उपस्थित होते.गोकूळ आणि विधानसभेचा संदर्भमाजी आमदार सत्यजित पाटील यांनी सामंत यांच्याशी स्वतंत्र चर्चा केली. शाहूवाडी तालुक्यात त्यांची लढाई जनसुराज्य पक्षाशी आहे. ह्यगोकूळह्णच्या निवडणुकीत आपण दोन्ही कॉंग्रेससोबत गेलो असताना ऐनवेळी जनसुराज्य पक्षाला आघाडीत घेऊन दोन जागा देण्यात आल्या. विधानसभेला या सगळ्यांची आपल्याला अडचण होणार आहे. त्यामुळे ताकद देणारे हे एक तरी पद आपल्या कार्यकर्त्यांकडे राहू दे, अशी मागणी त्यांनी केल्याचे समजते. माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांनीही सामंत यांच्याशी चर्चा केली.पक्षप्रमुख सांगतील तसे होईलजिल्हा परिषदेतील पदाधिकाऱ्यांच्या बदलाबाबत चर्चा झाली. सर्व संबंधितांशी मी बोललो आहे. त्यांच्या काही अडचणी आहेत, प्रश्न आहेत, ते मी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कानावर घालणार आहे. त्यानंतर ते जो निर्णय देतील तो सर्वांना बंधनकारक असेल, असे मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

टॅग्स :Politicsराजकारणzpजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूरUday Samantउदय सामंतShiv Senaशिवसेना