शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांची उच्चशिक्षणाची वाट बिकट; इंग्रजी, मराठी माध्यमांकडे कल 

By भीमगोंड देसाई | Updated: December 19, 2024 12:55 IST

पहिली ते चौथीपर्यंत शिकताहेत एक हजार विद्यार्थी

भीमगोंडा देसाई कोल्हापूर : महापालिकेच्या उर्दू माध्यमाच्या शाळांमध्ये १ हजार ५३ विद्यार्थी शिक्षण घेत असले, तरी सातवी, आठवीनंतर शिक्षणाची आणि करिअरची वाट बिकट आहे. प्रशासनात, उच्चशिक्षणात उर्दू शिक्षणाचा फारसा उपयोग नाही, तरीही मुस्लीम समाजाचा घट्ट पगडा असलेल्या गरीब कुटुंबांतील विद्यार्थी उर्दू माध्यमात शिकत आहेत. मराठी, इंग्रजी माध्यमांच्या तुलनेत त्यांना भविष्यातील संधी मर्यादित असल्याने त्यांचे करिअरही अंधकारमय होण्याचा धोका निर्माण झाला आहे.शहरात महापालिकेच्या तीन सातवीपर्यंत, एक आठवीपर्यंत शाळा आहेत. बारावीपर्यंत उर्दू माध्यमांच्या दोन शाळा स्वतंत्र आहेत. करिअरमध्ये अडचणी आल्याने काळाच्या ओघात सिंधीसह इतर माध्यमांच्या शाळांमध्ये पटसंख्या कमी झाली. त्या बंद झाल्या, पण उर्दू माध्यमांच्या शाळांतील पटसंख्या मात्र टिकून राहिली. प्रत्येक वर्षी या शाळेत पहिलीला प्रवेश होत आहेत. आठवी ते बारावीपर्यंत उर्दू शिक्षणाच्या केवळ दोन शाळा आहेत. उर्दू माध्यमातून पदवी घेण्यासाठी शहर, जिल्ह्यात एकही दर्जेदार महाविद्यालय नाही. यामुळे उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांना उच्चशिक्षण उर्दू माध्यमातून करणे अडचणीचे आहे.महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षकांची संख्या कमी आहे. शिक्षक, मुख्याध्यापक सेवानिवृत्त झाल्यानंतर तातडीने भरली जात नाहीत. विद्यार्थ्यांच्या अध्यापनावर परिणाम होत आहे. त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. गुणवत्ताही घसरत आहे. दर्जेदार शैक्षणिक सुविधांचा अभाव आहे. चांगल्या इमारती नाहीत. मैदान नाही. अशा स्थितीत मुले शिक्षण घेत आहेत. मात्र, उर्दू शिक्षणानंतर उच्चशिक्षण, करिअरमध्ये संधी फार कमी आहेत. यांना पुन्हा मराठी किंवा इंग्रजी माध्यमांकडे यावे लागते. हे शक्य नसेल, तर शिक्षणालाच पूर्णविराम द्यावा लागत आहे, म्हणून उर्दू शिक्षण घ्यायचे का, असा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

पुढाऱ्यांची मुले, नातवंडे इंग्रजी मराठी माध्यमातमुस्लीम समाजातील अनेक पुढारी, नेत्यांची मुले चांगल्या इंग्रजी, मराठी माध्यमांच्या शाळेत शिक्षण घेतात. याउलट गरीब कुटुंबातील मुले, मुली उर्दू माध्यमात शिक्षण घेत आहेत, असे वास्तव चित्र आहे. उर्दू शिक्षण घेऊन नोकरी, उद्योगात संधी मिळाली नाही, तर त्यांच्या चरितार्थाचा प्रश्न निर्माण होतो. त्यांना मजुरी किंवा फळ, भाजीपाला विक्री करून कुटुंब चालवावे लागते.

एक हजारावर विद्यार्थ्यांसाठी केवळ ३७ शिक्षकमहापालिकेच्या पाच उर्दू माध्यमांच्या शाळांत एक हजारावर विद्यार्थी शिकत असूनही त्यांना केवळ ३७ शिक्षक अध्यापनाचे काम करतात. पाच जागा अनेक महिन्यांपासून रिक्त आहेत. सर्वच शाळांत दोन वर्गांसाठी एक शिक्षक अशी अनेक वेळा स्थिती असते. यामुळे गुणवत्तेचा फज्जा उडत असल्याच्या तक्रारी आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMuslimमुस्लीमSchoolशाळाStudentविद्यार्थी