शहरं
Join us  
Trending Stories
1
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
2
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
3
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
4
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
5
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
6
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
7
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
8
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
9
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
10
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
11
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
12
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
13
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
14
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
15
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
16
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
17
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
18
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
19
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
20
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     

उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांची उच्चशिक्षणाची वाट बिकट; इंग्रजी, मराठी माध्यमांकडे कल 

By भीमगोंड देसाई | Updated: December 19, 2024 12:55 IST

पहिली ते चौथीपर्यंत शिकताहेत एक हजार विद्यार्थी

भीमगोंडा देसाई कोल्हापूर : महापालिकेच्या उर्दू माध्यमाच्या शाळांमध्ये १ हजार ५३ विद्यार्थी शिक्षण घेत असले, तरी सातवी, आठवीनंतर शिक्षणाची आणि करिअरची वाट बिकट आहे. प्रशासनात, उच्चशिक्षणात उर्दू शिक्षणाचा फारसा उपयोग नाही, तरीही मुस्लीम समाजाचा घट्ट पगडा असलेल्या गरीब कुटुंबांतील विद्यार्थी उर्दू माध्यमात शिकत आहेत. मराठी, इंग्रजी माध्यमांच्या तुलनेत त्यांना भविष्यातील संधी मर्यादित असल्याने त्यांचे करिअरही अंधकारमय होण्याचा धोका निर्माण झाला आहे.शहरात महापालिकेच्या तीन सातवीपर्यंत, एक आठवीपर्यंत शाळा आहेत. बारावीपर्यंत उर्दू माध्यमांच्या दोन शाळा स्वतंत्र आहेत. करिअरमध्ये अडचणी आल्याने काळाच्या ओघात सिंधीसह इतर माध्यमांच्या शाळांमध्ये पटसंख्या कमी झाली. त्या बंद झाल्या, पण उर्दू माध्यमांच्या शाळांतील पटसंख्या मात्र टिकून राहिली. प्रत्येक वर्षी या शाळेत पहिलीला प्रवेश होत आहेत. आठवी ते बारावीपर्यंत उर्दू शिक्षणाच्या केवळ दोन शाळा आहेत. उर्दू माध्यमातून पदवी घेण्यासाठी शहर, जिल्ह्यात एकही दर्जेदार महाविद्यालय नाही. यामुळे उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांना उच्चशिक्षण उर्दू माध्यमातून करणे अडचणीचे आहे.महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षकांची संख्या कमी आहे. शिक्षक, मुख्याध्यापक सेवानिवृत्त झाल्यानंतर तातडीने भरली जात नाहीत. विद्यार्थ्यांच्या अध्यापनावर परिणाम होत आहे. त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. गुणवत्ताही घसरत आहे. दर्जेदार शैक्षणिक सुविधांचा अभाव आहे. चांगल्या इमारती नाहीत. मैदान नाही. अशा स्थितीत मुले शिक्षण घेत आहेत. मात्र, उर्दू शिक्षणानंतर उच्चशिक्षण, करिअरमध्ये संधी फार कमी आहेत. यांना पुन्हा मराठी किंवा इंग्रजी माध्यमांकडे यावे लागते. हे शक्य नसेल, तर शिक्षणालाच पूर्णविराम द्यावा लागत आहे, म्हणून उर्दू शिक्षण घ्यायचे का, असा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

पुढाऱ्यांची मुले, नातवंडे इंग्रजी मराठी माध्यमातमुस्लीम समाजातील अनेक पुढारी, नेत्यांची मुले चांगल्या इंग्रजी, मराठी माध्यमांच्या शाळेत शिक्षण घेतात. याउलट गरीब कुटुंबातील मुले, मुली उर्दू माध्यमात शिक्षण घेत आहेत, असे वास्तव चित्र आहे. उर्दू शिक्षण घेऊन नोकरी, उद्योगात संधी मिळाली नाही, तर त्यांच्या चरितार्थाचा प्रश्न निर्माण होतो. त्यांना मजुरी किंवा फळ, भाजीपाला विक्री करून कुटुंब चालवावे लागते.

एक हजारावर विद्यार्थ्यांसाठी केवळ ३७ शिक्षकमहापालिकेच्या पाच उर्दू माध्यमांच्या शाळांत एक हजारावर विद्यार्थी शिकत असूनही त्यांना केवळ ३७ शिक्षक अध्यापनाचे काम करतात. पाच जागा अनेक महिन्यांपासून रिक्त आहेत. सर्वच शाळांत दोन वर्गांसाठी एक शिक्षक अशी अनेक वेळा स्थिती असते. यामुळे गुणवत्तेचा फज्जा उडत असल्याच्या तक्रारी आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMuslimमुस्लीमSchoolशाळाStudentविद्यार्थी