शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

कोल्हापूरच्या त्या विद्यार्थींनीची विनोद तावडेंनी केईएममध्ये जाऊन घेतली भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2017 14:29 IST

गृहपाठ केला नाही म्हणून ५०० उठाबशा काढणारी विद्यार्थीनी विजया निवृत्ती चौगुले हिची आज केईएम रुग्णालयात जाऊन शिक्षण मंत्री श्री.विनोद तावडे यांनी भेट घेतली.

मुंबई - गृहपाठ केला नाही म्हणून ५०० उठाबशा काढणारी विद्यार्थीनी विजया निवृत्ती चौगुले हिची आज केईएम रुग्णालयात जाऊन शिक्षण मंत्री श्री.विनोद तावडे यांनी भेट घेतली. विजयाच्या प्रकृतीची चौकशी केली व तिला हिम्मत दिली.  तिच्यावर उपचार करणारे न्यूरॉलॉजिस्ट डॉ.रावत आणि डॉ.प्रविण बांगर यांच्याकडून तिच्या उपचाराची माहिती घेतली.

तिची भेट घेतल्यानंतर प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना श्री.विनोद तावडे यांनी सांगितले की, तिच्यावरील उपचारावर तिचे कुटुंबिय समाधानी आहेत. विजया लवकरच पूर्णपणे बरी होऊन पुन्हा कोल्हापूरच्या शाळेत जाऊ शकेल. पण विजयाची पुन्हा त्याच शाळेत जाण्याची मानिसकता नसेल तर तिला तेथून जवळच्या दुस-या शाळेत प्रवेश देण्यात येईल. विजयाच्या पाठीशी सरकार पूर्णपणे पाठीशी उभे आहे.विजयाच्या उपचारावरील पूर्ण खर्च मोफत करण्यात येईल, असेही श्री. तावडे यांनी प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना सांगितले. 

तसेच विजयाचे वडील त्याच शाळेत शिपाई पदावर नोकरीला असून त्यांना त्या शाळेत नोकरी करायची नसेल तर त्यांना बाजूच्या शाळेत समायोजित केले जाईल असेही श्री. तावडे यांनी सांगितले. कोल्हापूरमधील चंदगड तालुक्यातील कानूर बुद्रुक या भावेश्वरी संदेश विदयालयातील  इयत्ता आठवीत शिकणा-या विजया चौगुले ही विद्यार्थ्यीनी शिकत आहे. उठाबशाची शिक्षा दिल्यानंतर त्या विद्यार्थ्यीनीची प्रकृती बिघडली. 

त्यानंतर तिला कोल्हापूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. काल तिला कोल्हापूरहून मुंबईच्या केईएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. उठाबशाची शिक्षा देणा-या शाळेच्या मुख्याध्यापिका अश्विनी देवणला पोलिसांनी अटक केली आहे.

टॅग्स :Vinod Tawdeविनोद तावडे