शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
5
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
6
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
7
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
8
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
9
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
10
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
11
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
12
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
13
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
14
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
15
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
16
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
17
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
18
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
19
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
20
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार

दोन महिन्यापासून प्रतिक्षेत- त्या दोन अंध विद्यार्थ्यांना ओढ गावाकडची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 11:29 IST

घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे गेली तीन वर्षे ते या शाळेतील विशेष विभागात शिकत आहेत. कामिनीचे वडील शेतमजूर असून अतुलचे वडील मुंबईत रोजगार करतात.

ठळक मुद्दे गाडीची सोय होताच पाठविण्याचा संदेशपैशाअभावी अडकले कोल्हापूरात;

संदीप आडनाईक

कोल्हापूर : कोल्हापूरात अडकलेल्या अनेकजणांनी संचारबंदीमुळे आपापल्या गावचा रस्ता पकडला. परंतु स्वतंत्र वाहन करुन जाण्याची ऐपत नसल्यामुळे गेले दोन महिने हिंगोली जिल्ह्यातील दोन अंध विद्यार्थी अद्यापही कोल्हापूरातच अडकले आहेत. आॅनलाईन अर्ज केला असला तरी गावी जाण्यासाठी एसटी बसेस सुरु नसल्यामुळे या विद्यार्थ्यांना नाईलाजाने शिक्षकांच्या घरीच रहावे लागत आहे.

मूळचे हिंगोली जिल्ह्यातील रहिवाशी असलेल्या कामिनी ज्ञानेश्वर गडवे आणि अतुल विश्वनाथ भगत हे दोन अंध विद्यार्थी कोल्हापूरातील विकास हायस्कूलमध्ये इयत्ता दहावीचे शिक्षण घेतात. घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे गेली तीन वर्षे ते या शाळेतील विशेष विभागात शिकत आहेत. कामिनीचे वडील शेतमजूर असून अतुलचे वडील मुंबईत रोजगार करतात.

मागास भाग असल्यामुळे या परिसरातील अनेक विद्यार्थी सातवीनंतरच्या शिक्षणासाठी पुणे, मुंबई, लातूर येथे जातात. येथील सुमारे १२ विद्यार्थी कोल्हापूरातील विकास हायस्कूलमध्ये शिक्षण घेतात आणि अंध युवक मंच, हणबरवाडी या संस्थेच्या राजोपाध्येनगर येथील अंध वसतिगृहात राहतात. शाळा संपल्यानंतर १७ मार्च रोजी दहा विद्यार्थी रेल्वेने गावी निघून गेले, परंतु दहावीची परिक्षा असल्यामुळे हे दोन विद्यार्थी वसतिगृहातच राहिले. २४ मार्च रोजी या दोघांचा इतिहास, भूगोल आणि भारतीय संगीत या विषयाचा पेपर होणार होता, परंतु तत्पूर्वीच २२ मार्च रोजी जनता कर्फ्यू जाहीर झाला आणि त्यानंतर सलग चार लॉक डाउनमुळे या विद्यार्र्थ्याना गावी जाता आले नाही.

या विद्यार्थ्यांना प्रथम वसतिगृहात आणि नंतर लॉकडाउन शिथील झाल्यानंतर वसतिगृहाचे अध्यक्ष संजय ढेंगे आणि सचिव अजय वणकुद्रे यांच्या घरी रहावे लागले. कामिनी हिचे गाव शेणगाव तालुक्यातील चिखलघर येथील तर अतुलचे गाव पिंपरखुर्द येथील आहे. कोल्हापूर आणि हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयाकडे गावी जाण्यासाठी आॅनलाईन परवानगी काढली आहे, मात्र स्वतंत्र वाहन घेउन जाण्याची ऐपत नसल्यामुळे त्यांना कोल्हापूरातच मुक्काम करावा लागला आहे.

 

परराज्यातील मजूरांना महाराष्ट्र सरकार रेल्वे, एसटी बसने त्यांच्या गावी पोहाचवत आहेत. परंतु या दोन गरीब विद्यार्र्थ्याची विनंती प्रशासनाने दुर्लक्षित केली आहे. या विद्यार्र्थ्याना हिंगोलीत त्यांच्या गावी पोहोचविण्याची व्यवस्था व्हावी.अजय वणकुद्रे,विशेष शिक्षक, विकास हायस्कूल, कोल्हापूर. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर