शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
2
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
3
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
4
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
5
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
6
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story
7
Shravan Shanivar 2025: शनिवारी कसे करावे अश्वत्थ मारुती पूजन? पिंपळाच्या झाडाचीही पूजा महत्त्वाची!
8
नागरिकांची झोप उडवणाऱ्या चड्डी- बनियान टोळीला पकडण्यात पोलिसांना यश!
9
आशा भोसलेंनी पुण्यातील आलिशान फ्लॅट विकला! एकाच झटक्यात कमावले इतके कोटी, तब्बल ४२ टक्के वाढ
10
कुठल्याही देवावर विश्वास नाही, कुठलाही धर्म मानत नाही, या १० देशांमधील बहुतांश लोक आहेत नास्तिक
11
Viral Video: भल्यामोठ्या अजगराला दुचाकीला बांधून फरफटत नेलं, संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात रेकॉर्ड!
12
वानखेडे स्टेडियममध्ये सुनील गावसकर, शरद पवार यांचा होणार गौरव, MCA उभारणार पुतळा
13
जुहूच्या समुद्रात दोन अल्पवयीन मुले बुडाली; एकाला वाचवलं, दुसऱ्याचा शोध सुरू!
14
Prajwal Revanna: माजी पंतप्रधान देवेगौडांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा अत्याचार प्रकरणात दोषी, उद्या शिक्षेची घोषणा
15
Dahi Handi 2025: गोविंदा आला रे...! सरकार संरक्षण देणार; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार...
16
मानहानी प्रकरणात कंगनाला मोठा धक्का; उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका, नेमकं प्रकरण काय?
17
'हल्ली मुली नग्न होऊन पैसे कमावत आहेत'; साध्वी ऋतंभरा यांच्या विधानाने नवा वाद
18
फक्त ३,००० रुपये भरा आणि वर्षभर टोल फ्री प्रवास करा, १५ ऑगस्टपासून नवा नियम! फक्त 'या' वाहनांना लागू
19
IND vs ENG : एक धाव वाचवण्याच्या नादात 'मॅच विनर' खेळाडू कसोटीतून OUT; टीम इंडिया याचा फायदा उठवणार?
20
कृषिमंत्रिपदाची सर्वात पहिली ऑफर अजित पवारांनी मला दिली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट

दोन महिन्यापासून प्रतिक्षेत- त्या दोन अंध विद्यार्थ्यांना ओढ गावाकडची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 11:29 IST

घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे गेली तीन वर्षे ते या शाळेतील विशेष विभागात शिकत आहेत. कामिनीचे वडील शेतमजूर असून अतुलचे वडील मुंबईत रोजगार करतात.

ठळक मुद्दे गाडीची सोय होताच पाठविण्याचा संदेशपैशाअभावी अडकले कोल्हापूरात;

संदीप आडनाईक

कोल्हापूर : कोल्हापूरात अडकलेल्या अनेकजणांनी संचारबंदीमुळे आपापल्या गावचा रस्ता पकडला. परंतु स्वतंत्र वाहन करुन जाण्याची ऐपत नसल्यामुळे गेले दोन महिने हिंगोली जिल्ह्यातील दोन अंध विद्यार्थी अद्यापही कोल्हापूरातच अडकले आहेत. आॅनलाईन अर्ज केला असला तरी गावी जाण्यासाठी एसटी बसेस सुरु नसल्यामुळे या विद्यार्थ्यांना नाईलाजाने शिक्षकांच्या घरीच रहावे लागत आहे.

मूळचे हिंगोली जिल्ह्यातील रहिवाशी असलेल्या कामिनी ज्ञानेश्वर गडवे आणि अतुल विश्वनाथ भगत हे दोन अंध विद्यार्थी कोल्हापूरातील विकास हायस्कूलमध्ये इयत्ता दहावीचे शिक्षण घेतात. घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे गेली तीन वर्षे ते या शाळेतील विशेष विभागात शिकत आहेत. कामिनीचे वडील शेतमजूर असून अतुलचे वडील मुंबईत रोजगार करतात.

मागास भाग असल्यामुळे या परिसरातील अनेक विद्यार्थी सातवीनंतरच्या शिक्षणासाठी पुणे, मुंबई, लातूर येथे जातात. येथील सुमारे १२ विद्यार्थी कोल्हापूरातील विकास हायस्कूलमध्ये शिक्षण घेतात आणि अंध युवक मंच, हणबरवाडी या संस्थेच्या राजोपाध्येनगर येथील अंध वसतिगृहात राहतात. शाळा संपल्यानंतर १७ मार्च रोजी दहा विद्यार्थी रेल्वेने गावी निघून गेले, परंतु दहावीची परिक्षा असल्यामुळे हे दोन विद्यार्थी वसतिगृहातच राहिले. २४ मार्च रोजी या दोघांचा इतिहास, भूगोल आणि भारतीय संगीत या विषयाचा पेपर होणार होता, परंतु तत्पूर्वीच २२ मार्च रोजी जनता कर्फ्यू जाहीर झाला आणि त्यानंतर सलग चार लॉक डाउनमुळे या विद्यार्र्थ्याना गावी जाता आले नाही.

या विद्यार्थ्यांना प्रथम वसतिगृहात आणि नंतर लॉकडाउन शिथील झाल्यानंतर वसतिगृहाचे अध्यक्ष संजय ढेंगे आणि सचिव अजय वणकुद्रे यांच्या घरी रहावे लागले. कामिनी हिचे गाव शेणगाव तालुक्यातील चिखलघर येथील तर अतुलचे गाव पिंपरखुर्द येथील आहे. कोल्हापूर आणि हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयाकडे गावी जाण्यासाठी आॅनलाईन परवानगी काढली आहे, मात्र स्वतंत्र वाहन घेउन जाण्याची ऐपत नसल्यामुळे त्यांना कोल्हापूरातच मुक्काम करावा लागला आहे.

 

परराज्यातील मजूरांना महाराष्ट्र सरकार रेल्वे, एसटी बसने त्यांच्या गावी पोहाचवत आहेत. परंतु या दोन गरीब विद्यार्र्थ्याची विनंती प्रशासनाने दुर्लक्षित केली आहे. या विद्यार्र्थ्याना हिंगोलीत त्यांच्या गावी पोहोचविण्याची व्यवस्था व्हावी.अजय वणकुद्रे,विशेष शिक्षक, विकास हायस्कूल, कोल्हापूर. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर