शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
3
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
4
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
5
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
6
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
7
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
8
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
9
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
10
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
11
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
12
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
13
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
14
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
15
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!
16
Smriti Mandhana: 'वनडे क्वीन'ची 'परफेक्ट कपल गोल' सेट करणारी लव्हस्टोरी! पलाशसोबतचा मैदानातील 'तो' व्हिडिओ व्हायरल
17
रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
18
नवरीच्या वडिलांनी लढवली शक्कल; लग्नात कपड्यांवरच लावला QR कोड, पाहुण्यांनी स्कॅन केलं अन्...
19
भारतातील आघाडीचा टूथपेस्ट ब्रँड 'कोलगेट' आता लोक खरेदी करत नाहीयेत? विक्रीत सातत्यानं घट, जाणून घ्या कारण
20
PPF, EPF की GPF? तुमच्या निवृत्तीसाठी कोणती योजना चांगली? तिन्हींमध्ये नेमका काय फरक?

ताणतणाव,भविष्याबद्दलचा अंधार हीच आत्महत्येची कारणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 12:35 IST

Suicide Kolahpur : रोगाबद्दलचे भय, आर्थिक ताणतणाव व भविष्याबद्दलची चिंता ही मुख्यत: आत्महत्या करण्यामागील महत्त्वाची कारणे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात गुरुवारी गडमुडशिंगी येथे महिलेने मुलीसह, तर शुक्रवारी पन्हाळा तालुक्यातील कळेजवळील गोठे येथील दांपत्याने मुलासह नदीत उडी मारून आत्महत्या केली. या घटनांनी समाजमन हादरले. मुलांसह आत्महत्या करण्याचे प्रमाण समाजात वाढले आहे. त्याच्या कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न लोकमतने केला.

ठळक मुद्देताणतणाव व भविष्याबद्दलचा अंधार हीच आत्महत्येची कारणे भावनिक विश्व समृद्ध करणे हाच उपाय

विश्र्वास पाटीलकोल्हापूर : रोगाबद्दलचे भय, आर्थिक ताणतणाव व भविष्याबद्दलची चिंता ही मुख्यत: आत्महत्या करण्यामागील महत्त्वाची कारणे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात गुरुवारी गडमुडशिंगी येथे महिलेने मुलीसह, तर शुक्रवारी पन्हाळा तालुक्यातील कळेजवळील गोठे येथील दांपत्याने मुलासह नदीत उडी मारून आत्महत्या केली. या घटनांनी समाजमन हादरले. मुलांसह आत्महत्या करण्याचे प्रमाण समाजात वाढले आहे. त्याच्या कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न लोकमतने केला.ज्येष्ठ समाज संवादक इंद्रजित देशमुख म्हणाले, लोकांचे भावनिक विश्व संपत येणे हे एक महत्त्वाचे कारण आहे. त्यावर जगभर संशोधन सुरू आहे. समाजातील तणावग्रस्तता विविध कारणांनी वाढली आहे आणि त्याचवेळेला आजूबाजूचे हक्काचे आधार खोकले झाले आहेत. त्यामुळे लोक मरणाला जवळ करत आहेत. एकत्र कुटुंब पद्धतीत असुरक्षितता नव्हती. आता ढीगभर नातलग असूनही कुणाचा आधार वाटत नाही. बाईला बाप असतो तोपर्यंत माहेर हक्काचे असते. भावाच्या राज्यात ते उपकाराचे होते. त्यामुळे स्वाभिमानी बाई कधीच वडील गेल्यानंतर माहेरकडे हात पसरायला जात नाही. अशा अनेक कारणांनी एकाकीपण वाढत आहे. त्यामुळे संकटाला सामोरे जाण्याऐवजी लोक मृत्यूला जवळ करत आहेत ते फारच हादरवून सोडणारे आहे.मानसोपचार तज्ज्ञ डॉ. कावेरी चौगले म्हणाल्या, कोविडमुळे संपलेला रोजगार, त्यातून आलेली आर्थिक अस्वस्थता, यातून आपल्या जीवनात भविष्यात काही चांगले घडेल असा आशावाद संपुष्टात येणे या सगळ्याचा परिणाम म्हणून सामूहिक आत्महत्या होत आहेत. या आत्महत्यांची कारणे सामाजिकच आहेत. ताण एकट्यापुरताच मर्यादित असतो तेव्हा व्यक्ती आपले जीवन संपवते; परंतु आपण भविष्यात कुटुंबाचा सांभाळ चांगल्या पद्धतीने करू शकतो हा विश्वास संपून जातो तेव्हा कुटुंबासह आत्महत्या करण्याची प्रवृत्ती बळावते. अशा पद्धतीने आत्महत्या करण्याचा निर्णयही कुटुंबप्रमुख म्हणून पुरुषाचाच असतो.कशा रोखता येतील या घटना..१.आर्थिक अडचण, कौटुंबिक मालमत्तेतील वादात झालेली फसवणूक, वेगवेगळ्या कारणांनी समाजात, कुटुंबात होणारी मानहानी अशी वरकरणी न दिसणारी अनेक कारणे या घटनांच्या तळाशी असतात. त्यांचा वेळीच शोध घेऊन संबंधित व्यक्तीचा ताण कमी केल्यास, त्याला आधार दिल्यास अशा घटना रोखता येतील.२.एखादी व्यक्ती आत्ममग्न बनली आहे. समाजापासून तुटली आहे. जगण्यात रस नाही असे वर्तन करते तेव्हा वेळीच सावध होऊन तिच्याशी सतत बोलत राहिले पाहिजे, सकारात्मक ऊर्जा पेरत राहिले पाहिजे.३.आत्महत्येचा विचार मनात आला की, लगेच तो आत्महत्या करत नाही. अनेक दिवस त्याच्या मनाच्या तळाशी तो विचार मुळे धरत असतो. त्या काळात त्याच्या वर्तणुकीतील नैराश्य हेरून मानसिक आधार देण्याचा प्रयत्न पत्नी, आईवडील, मुलांकडून झाला पाहिजे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर