शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

'आम्हास्नी वाट दिसना झालती', सैनिकाच्या पाया पडणाऱ्या 'त्या' महिलेनं सांगितली आपबिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2019 11:21 IST

कोल्हापूरच्या चिखली गावाजवळील या महिलेनं नेमंक आपल्याला काय वाटलं होतं हे शब्दात सांगितलं आहे.

ठळक मुद्देकोल्हापूरच्या चिखली गावाजवळील या महिलेनं नेमंक आपल्याला काय वाटलं होतं हे शब्दात सांगितलं आहे.आता डोळे झाकल्यावरही फक्त आर्मीवालेच दिसतात

कोल्हापूर - पंचगंगा नदीला आलेल्या पुरातील बचावकार्यात एक दृश्य अत्यंत बोलकं ठरलंय. सोशल मीडियावर तो व्हिडीओही मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय. त्यामध्ये, सैन्य दलाने पुराच्या पाण्यात अडकलेल्या कुटुंबीयाची सुखरुप सुटका केली होती. त्यावेळी, बोटीतून सुरक्षितस्थळी जात असताना बोटीतील महिलेला अश्रू अनावर झाल्याचं दिसलं. या महिलेनं देवाचा धावा केला. पण, यावेळी तिला देव भेटला होता तो पायात बुट घातलेला, अंगावर आर्मीचा ड्रेस परिधान केलेला अन् जीवाची बाजी लावणारा भारतीय सैनिक. त्या महिलेनं क्षणाचाही विचार न करता, बोटीतील जवानाचे पाय धरले. मनाला चटका लावून जाणारे हे दृश्य पाहून नेटीझन्स हळहळले. सैन्याच्या जवानानेही तितक्याच नम्रपणे अलगद आपला पाय पाठीमागे घेतला. जणू, ताई हे माझ कर्तव्यचं आहे, असंच काहीसं त्यांनी सूचवलं. मात्र, त्या माऊलीच्या डोळ्यातील पाणी, चेहऱ्यावरील भाव सारं काही सांगून जात होतं. 

कोल्हापूरच्या चिखली गावाजवळील या महिलेनं नेमंक आपल्याला काय वाटलं होतं हे शब्दात सांगितलं आहे. त्यावेळी नेमकं काय घडलं हे सांगताना पुन्हा एकदा आर्मीच्या जवानांमुळेच आम्ही जिवंत असल्याचं सुजाता यांनी म्हटलं आहे. पाण्यातून बाहेर येतुय की नाही यामुळं आम्हाला भिती वाटत होती. आदल्यादिवशीच कळाल होतं की पलुसमध्ये बोट उलटी झालेलीय. अन् आमच्या बोटीमधी आमच्या घरची सगळी माणसं होती, लहान मुलं सगळी होती. त्यामुळे भिती वाटत होती. पाणी बघून कुणाला काय झालं तर काय करायचं ? त्यात मध्येच साप आला होता. आर्मीवाल्यांनी झटकन त्याला फेकून दिला. बोटमधी शिरला असता तर काय ? ही भिती होती मनात. आम्हास्नी वाट जायना झालती. पाणी सगळ बघून आम्हाला खूप भिती वाटत होती. आम्हाला त्यांनी सुखरुप बाहेर काढलं, त्यामुळे आम्ही त्यांचे आभारी आहोत. म्हणूनच आम्ही त्यांच्या पाया पडलो. 

दोन दिवसांच्या पावसानंतर पाण्याची पातळी चांगलीच वाढली होती. चिखली गाव तर सगळ पाण्याखाली गेलं होतं. जनावरांचा जीव वाचवावा, का स्वत:चा असा प्रश्न लोकांपुढं पडला होता. घरातून निघताना जायचं की नको हा प्रश्न आमच्यापुढं होता. कारण, सगळचं, आम्ही जनावरं आणि घरातलं सगळच तिथं होतं. आमची एकदोन कुटुंब तिथ अडकली होती. पण, त्यांनाही वाचवायला कुणी जात नव्हतं. त्यामुळे, तीच परिस्थिती आपली झाली तर आपणही काहीच करु शकत नाही, हे लक्षात आल्यानं आम्हीही जायचं ठरवलं. मग, सगळ्यांना बाहेर काढलं, सगळ्यात शेवटी आम्ही बाहेर निघालो.  

आता डोळे झाकल्यावरही फक्त आर्मीवालेच दिसतात, ते हायत म्हणून आम्ही हायत, अशा शब्दात सुजात आंबी या कोल्हापुरातील पूरग्रस्त महिलेनं जवानांच्या शौर्याला आणि धाडसाला वंदन केलं आहे. आर्मीतील जवानांच्या पाया पडून, आम्हाला वाचवणारा हाच खरा देव, अशी भावना सुजाता आंबी यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना बोलून दाखवली. 

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरkolhapurकोल्हापूरIndian Armyभारतीय जवान