शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

कोल्हापुरातील शिरोळला वादळी पावसाने झोडपले, पिकांचे मोठे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2023 13:18 IST

नुकसानीचा महसूल विभागाकडून त्वरित पंचनामा होऊन नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी होत आहे.

शिरोळ/ कुरुंदवाड : शिरोळ तालुक्याला बुधवारी मध्यरात्री वादळी वारा व पावसाने झोडपून काढले. त्यामुळे काढणीला आलेली गहू, हरभरा, शाळू पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.दरम्यान, वादळी वाऱ्यामुळे तेरवाड (ता. शिरोळ) येथील बसथांब्याजवळ असलेली पानटपरी उडून रस्त्यावर पडली होती, तर येथील शेतकऱ्यांची शेवगा झाडे उन्मळून पडल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.उन्हाची लाहीलाही होत असताना वातावरणात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. बुधवारी मध्यरात्री अचानक विजांचा कडकडाट, वादळी वारे आणि पावसाने झोडपून काढले. ऊस पिकाला मानवणारा पाऊस असला तरी रात्रीच्या सुमारास पाऊस आल्याने गहू, हरभरा, शाळूची कापणी व मळणी सुरू असलेल्या शेतकऱ्यांचे धान्य भिजल्याने मोठे नुकसान झाले आहे. शेवगा शेंगांनी बहरलेली तेरवाड येथील बाळासो हलवाई या शेतकऱ्याची शेवगा झाडे पाऊस आणि वादळी वाऱ्याने उन्मळून जमीनदोस्त झाली आहेत.

त्यामुळे वर्षभर झाडे जगवून पीक काढणीच्या वेळेला झाडेच उन्मळून पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे, तर वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. दरम्यान, या नुकसानीचा महसूल विभागाकडून त्वरित पंचनामा होऊन नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी होत आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊस