शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
4
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
5
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
6
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
7
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
8
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
9
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
10
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
11
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
12
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
13
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
14
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
15
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
18
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
19
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
20
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...

जिल्ह्यातील वॉटर एटीएमची बिले थांबवा, जलव्यवस्थापन सभेत मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 15:12 IST

तत्कालिन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीमधून मंजूर केलेल्या वॉटर एटीएमची बिले थांबवण्याची मागणी जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन समितीच्या सभेत करण्यात आली. पाटील यांनी मंजूर केलेल्या निधीतील बिले थांबवण्याची मागणी करण्यात आल्याने हा वाद देखील आता रंगणार आहे. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील होते.

ठळक मुद्देजिल्ह्यातील वॉटर एटीएमची बिले थांबवा, जलव्यवस्थापन सभेत मागणी माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या काळातील निधी

कोल्हापूर : तत्कालिन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीमधून मंजूर केलेल्या वॉटर एटीएमची बिले थांबवण्याची मागणी जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन समितीच्या सभेत करण्यात आली. पाटील यांनी मंजूर केलेल्या निधीतील बिले थांबवण्याची मागणी करण्यात आल्याने हा वाद देखील आता रंगणार आहे. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील होते.जिल्हा नियोजन समितीमधून २०१८-१९ मध्ये जिल्ह्यातील ८६ गावांमध्ये दलितवस्ती आणि सर्वसाधारण ठिकाणी वॉटर एटीएम बसवण्याचा निर्णय घेण्यात आला. पालकमंत्री पाटील यांनी जिल्हा परिषदेचे तत्कालिन पदाधिकारी आणि भाजप पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून ही गावांची नावे निश्चित केली होती. मात्र ही कामे लवकर सुरू झाली नाहीत.

मार्चअखेर आल्याने हा निधी खर्च करण्यासाठी तातडीने हालचाली करत निविदा प्रक्रिया राबवण्यात आली आणि १६ फेब्रूवारी २०२० रोजी चार ठेकेदारांना कामाचे आदेश देण्यात आले.या ८६ गावांपैकी ६९ ठिकाणची कामे सुरू झाली असून १७ गावांमध्ये जागा नसणे, ग्रामपंचायतीचा ठराव न मिळणे व अन्य कारणांनी कामेच सुरू झाली नाहीत.दरम्यान, मंगळवारच्या जलव्यवस्थापन सभेमध्ये उपाध्यक्ष सतीश पाटील यांनी हा मुद्दा उपस्थित केला. जिल्हा परिषद पदाधिकारी, जलव्यवस्थापन समिती सदस्य कोणालाही विश्वासात न घेता ही नावे कशी निश्चित केली आणि कार्यांरंभ आदेशही कसे दिले असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

झालेली कामे निविदेतील तांत्रिक निकषांप्रमाणे झालेली नाहीत. त्यामुळे संबंधित ठेकेदारांची बिले अदा करू नयेत, अशाही सूचना त्यांनी दिल्या. बांधकाम समिती सभापती हंबीरराव पाटील यांनी टंचाईकाळातील कूपनलिका टंचाई संपल्यावर खोदणार आहात का, अशी संतप्त विचारणा केली.

जिल्ह्यात अशा १२ कूपनलिका खोदायच्या असून येत्या चार, पाच दिवसांत खोदण्यात येतील असे सांगण्यात आले. यावेळी सदस्य उदयराज पवार, स्वरूपाराणी जाधव, अजयकुमार माने, प्रियदर्शिनी मोरे, मनिष पवार, यांत्रिक विभागाचे थोरात उपस्थित होते.पूरस्थितीवर चर्चेसाठी खास सभा बोलवासदस्य प्रा. शिवाजी मोरे म्हणाले, सध्या जिल्हा परिषदेसह सर्व शासकीय यंत्रणा कोरोनाच्या कामात असली तरी येणाऱ्या पावसाळ्यात पूर आल्यास त्याला तोंड देण्यासाठी यंत्रणा सज्ज करणे आवश्यक आहे. यासाठी जिल्हा परिषद सदस्यांची एक विशेष सभा घेण्यात यावी. सभापती प्रविण यादव, डॉ. पद्माराणी पाटील, स्वाती सासने यांनीही या मुद्यांवर चर्चा करत यासाठी तयारी करण्याची सूचना केली.

निविदेनुसार काम न केलेल्या ठेकेदारांना झटका बसणार पालकमंत्र्यांनी यादी निश्चित करून दिल्यानंतर योजना राबवण्यासाठीचा निधी जिल्हा परिषदेकडे दिला. त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संबंधित विभागाने निविदा प्रक्रिया राबवली. यामध्ये जिल्हा परिषद पदाधिकारी आणि जलव्यवस्थापन सदस्यांच्या मान्यतेची गरज नसते, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे आता जुन्या सरकारमधील निधीतून मंजूर कामांची बिले थांबवण्याचा मुद्दा तापणार आहे. मात्र खरोखरच ठेकेदारांनी निविदेनुसार काम केले नसले तर त्यांनाही झटका बसणार आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूर