सोयाबीन खरेदीतील लूट थांबवावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:24 IST2021-09-25T04:24:58+5:302021-09-25T04:24:58+5:30
कोल्हापूर : मागील पंधरा दिवसांपूर्वी ११ हजारांच्यावर असणारा सोयाबीन खरेदीचा दर आता ५ हजारांवर आला आहे. जिल्ह्यातील व्यापारी मॉईश्चरच्या ...

सोयाबीन खरेदीतील लूट थांबवावी
कोल्हापूर : मागील पंधरा दिवसांपूर्वी ११ हजारांच्यावर असणारा सोयाबीन खरेदीचा दर आता ५ हजारांवर आला आहे. जिल्ह्यातील व्यापारी मॉईश्चरच्या नावाखाली शेतकऱ्यांची लूट आणि वजनातही तूट करत आहेत. हा प्रकार थांबवण्यात यावा व शासनामार्फत धान्य खरेदी केंद्रे सुरू करण्यात यावीत, अशी मागणी जय शिवराय किसान संघटनेने शुक्रवारी जिल्हा प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली.
संघटनेचे अध्यक्ष शिवाजी माने, सदाशिव कुलकर्णी, बंडा पाटील, उत्तम पाटील, प्रल्हाद पाटील, शीतल कांबळे, गब्बर पाटील, तातोबा कोळी आदींनी ही मागणी केली. यंदा महापुराने शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. यातूनही नदीकाठ सोडून उर्वरित क्षेत्रावरील सोयाबीन पीक काढणी सुरू आहे. त्याचा उताराही ५० टक्क्यांनी घटला आहे. दुसरीकडे व्यापारी कमी दर व वजनात तूट धरत आहेत. याबाबत कृषी अधिकारी व वजन मापक निरीक्षण यांना सूचना देण्यात यावी. जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांनी आधारभूत धान्य खरेदी योजनेतून शासकीय भात खरेदी केंद्रे सुरू केली आहेत; पण ही खरेदी केवळ चंदगड, आजरा व राधानगरी तालुक्यातच केली जाते. जिल्ह्यातील पन्हाळा, शाहूवाडी, गगनबावडा येथेदेखील शेतकरी मोठ्या प्रमाणात भात पिकवत आहेत. या तीन तालुक्यातदेखील धान्य खेरदी केंद्रे सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
---