शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
5
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
6
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
7
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
8
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
9
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
10
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
11
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
13
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
14
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
15
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
16
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
17
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
18
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
19
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
20
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?

पंचनाम्याची सोंगे बंद करा, तत्काळ मदत द्या, संभाजी ब्रिगेडची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2020 19:03 IST

farmar, sambhaji brigade, kolhapurnews, collector अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची गरज असताना सरकार पंचनामे करीत आहे. ही सोंगे बंद करून तत्काळ प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर ५० हजार रुपये जमा करावेत, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. मंगळवारी दुपारी रूपेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून भरपाईची मागणी केली.

ठळक मुद्देपंचनाम्याची सोंगे बंद करा, तत्काळ मदत द्या, संभाजी ब्रिगेडची निदर्शने अतिवृष्टीग्रस्तांना ५० हजार भरपाईची मागणी

कोल्हापूर: अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची गरज असताना सरकार पंचनामे करीत आहे. ही सोंगे बंद करून तत्काळ प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर ५० हजार रुपये जमा करावेत, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. मंगळवारी दुपारी रूपेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून भरपाईची मागणी केली.अतिवृष्टीमुळे राज्यभर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पावसामुळे शेतकरी पूर्णपणे मोडून पडला आहे. वर्षभराच्या बेगमीचे धान्य कुजून गेल्याने तो हवालदिल झाला आहे. अशा परिस्थितीत त्याला उभे राहण्यासाठी थेट आर्थिक मदतीची गरज आहे; पण शासनस्तरावर पंचनामे सुरू केले आहेत. याला विलंब लागणार असल्याचे तातडीने मदत द्यावी म्हणून संभाची ब्रिगेडने राज्यभर आंदोलन सुरू केले आहे. मंगळवारी कोल्हापुरात आंदोलन झाले.

निदर्शने करून सरसकट ५० हजार द्या, पीक विमा रक्कम खात्यात जमा करा, अशा मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकाऱ्यांना दिले. आंदोलनात अभिजित भोसले, नीलेश सुतार, विकी जाधव, अभिजित कांजर, शिवाजी गुरव, उमेश जाधव, सच्चिदानंद गुरव, अमरसिंह पाटील, अविनाश आंबी, हरीश कारंडे, सचिन नालंग, राकेश जाधव यांनी सहभाग घेतला.

टॅग्स :sambhaji brigadeसंभाजी ब्रिगेडFarmerशेतकरीkolhapurकोल्हापूरcollectorजिल्हाधिकारी