शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

पंचनाम्याची सोंगे बंद करा, तत्काळ मदत द्या, संभाजी ब्रिगेडची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2020 19:03 IST

farmar, sambhaji brigade, kolhapurnews, collector अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची गरज असताना सरकार पंचनामे करीत आहे. ही सोंगे बंद करून तत्काळ प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर ५० हजार रुपये जमा करावेत, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. मंगळवारी दुपारी रूपेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून भरपाईची मागणी केली.

ठळक मुद्देपंचनाम्याची सोंगे बंद करा, तत्काळ मदत द्या, संभाजी ब्रिगेडची निदर्शने अतिवृष्टीग्रस्तांना ५० हजार भरपाईची मागणी

कोल्हापूर: अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची गरज असताना सरकार पंचनामे करीत आहे. ही सोंगे बंद करून तत्काळ प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर ५० हजार रुपये जमा करावेत, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. मंगळवारी दुपारी रूपेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून भरपाईची मागणी केली.अतिवृष्टीमुळे राज्यभर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पावसामुळे शेतकरी पूर्णपणे मोडून पडला आहे. वर्षभराच्या बेगमीचे धान्य कुजून गेल्याने तो हवालदिल झाला आहे. अशा परिस्थितीत त्याला उभे राहण्यासाठी थेट आर्थिक मदतीची गरज आहे; पण शासनस्तरावर पंचनामे सुरू केले आहेत. याला विलंब लागणार असल्याचे तातडीने मदत द्यावी म्हणून संभाची ब्रिगेडने राज्यभर आंदोलन सुरू केले आहे. मंगळवारी कोल्हापुरात आंदोलन झाले.

निदर्शने करून सरसकट ५० हजार द्या, पीक विमा रक्कम खात्यात जमा करा, अशा मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकाऱ्यांना दिले. आंदोलनात अभिजित भोसले, नीलेश सुतार, विकी जाधव, अभिजित कांजर, शिवाजी गुरव, उमेश जाधव, सच्चिदानंद गुरव, अमरसिंह पाटील, अविनाश आंबी, हरीश कारंडे, सचिन नालंग, राकेश जाधव यांनी सहभाग घेतला.

टॅग्स :sambhaji brigadeसंभाजी ब्रिगेडFarmerशेतकरीkolhapurकोल्हापूरcollectorजिल्हाधिकारी