शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

कोल्हापुरात २६ पासून मुख्याध्यापक संघाचे राज्यस्तरीय अधिवेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 18:41 IST

  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे राज्यस्तरीय अधिवेशन कोल्हापुरात दि. २६ ते २८ आॅक्टोबरदरम्यान होणार आहे. येथील शिवाजी पेठेतील महाराष्ट्र हायस्कूलच्या क्रीडांगणावर होणाºया या अधिवेशनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटनशिक्षणक्षेत्रातील विविध विषयांवर होणार विचारमंथन

 कोल्हापूर , दि. १७ :  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे राज्यस्तरीय अधिवेशन कोल्हापुरात दि. २६ ते २८ आॅक्टोबरदरम्यान होणार आहे. येथील शिवाजी पेठेतील महाराष्ट्र हायस्कूलच्या क्रीडांगणावर होणाऱ्या  या अधिवेशनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.

अधिवेशनाच्या अध्यक्षपदी ठाणे जिल्ह्यातील भातसानगर प्रकल्प विद्यालयाचे मुख्याध्यापक संदिपान मस्तूद आहेत, अशी माहिती ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष डी. बी. पाटील आणि कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव आर. वाय. पाटील यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.

स्वागताध्यक्ष डी. बी. पाटील म्हणाले, राज्य संघ आणि कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघातर्फे आयोजित या अधिवेशनाचे उद्घाटन गुरुवारी (दि. २६) दुपारी दोन वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होईल. यावेळी अधिवेशनाचे चीफ पेट्रन शाहू छत्रपती, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, शिक्षणमंत्री विनोद तावडे, कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत, आदी प्रमुख उपस्थित असणार आहेत. यादिवशी सकाळी अकरा वाजता संघाची कौन्सिल कमिटीची बैठक होईल. त्यात विविध ठराव केले जाणार आहेत. शनिवारी (दि. २८) सकाळी साडेदहा वाजता ‘राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार’ वितरण होणार आहे.

सचिव आर. वाय. पाटील म्हणाले, अधिवेशनाच्या उद्घाटनादिवशी जिल्ह्यातील माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम, शाहीर आझाद नायकवडी यांचे ‘लेणं महाराष्ट्राचं!’ हा कार्यक्रम होणार आहे. अधिवेशनात शिक्षणक्षेत्रातील विविध विषयांवर विचारमंथन होणार आहे. त्यासह ग्रंथ, शैक्षणिक साहित्य प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. या पत्रकार परिषदेला मोहन थोरात, सुभाष माने, आदिनाथ थोरात, विजयसिंह गायकवाड, व्ही. जी. पोवार, डी. एस. घुगरे, आर. डी. पाटील, सी. एम. गायकवाड, के. के. पाटील, आदी उपस्थित होते.

तज्ज्ञांचे मार्गदर्शनअधिवेशनातील विविध सत्रांत भारती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे, आनंद मेणसे, सागर देशपांडे, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, शिक्षण संचालक गंगाधर म्हमाणे, शिक्षण उपसंचालक एम. के. गोंधळी, मुख्याध्यापक संघाच्या महामंडळाचे माजी अध्यक्ष सुभाष माने, रेवती नामजोशी, पुष्पलता पवार, शकुंतला काळे, नामदेवराव जरग, किरण लोहार, यजुर्वेद महाजन, देवदत्त राजोपाध्ये आदी तज्ज्ञ, अभ्यासक मार्गदर्शन करणार आहेत.

अधिवेशनातील चर्चासत्रे, व्याख्याने*शुक्रवारी (दि. २७) : सकाळी ९. ३० वाजता - नवीन शैक्षणिक धोरण २०१६: सकाळी ११ वाजता - तंत्रज्ञानयुक्त शिक्षणाच्या दिशेने: दुपारी ३ वाजता - शिक्षक, मुख्याध्यापकांसाठी नवे शैक्षणिक प्रयोग: दुपारी ४. ३० वाजता-बदलत्या शिक्षणातील मुख्याध्यापकांची भूमिका यावर व्याख्यान* शनिवारी (दि. २८) : सकाळी ९. ३० वाजता- शिक्षणव्यवस्थेतील मुख्याध्यापकांची भूमिका

 

 

टॅग्स :Chief Ministerमुख्यमंत्रीTeacherशिक्षक