शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
2
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
3
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
4
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
5
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
6
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
7
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
8
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
9
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
10
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का
11
भारताला रामराम? पुष्कर जोग झाला UAEचा 'गोल्डन व्हिसा'धारक, म्हणाला, "माझ्या मुलीच्या..."
12
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
13
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
14
VIDEO: टीम इंडियातील ब्युटीची 'मन की बात'; थेट PM मोदींना Skin Care Routine संदर्भातील प्रश्न
15
‘वंदे मातरम्’ गीताला 150 वर्षे पूर्ण; देशभरात कार्यक्रमांचे आयोजन, गैर-इस्लामी म्हणत 'या' संघटनेचा विरोध
16
विश्वविजेत्या कन्यांचं Tata कडून खास सेलिब्रेशन...; संघातील प्रत्येक खेळाडूला देणार Sierra एसयूव्ही गिफ्ट! खास आहेत फीचर्स
17
खळबळजनक! कर्ज घेतलं, हुंड्याची प्रत्येक मागणी पूर्ण, तरी...; लेकीचा मृतदेह पाहून बापाचा टाहो
18
भारतीय महिला ‘वर्ल्ड चॅम्पियन’ कशा बनल्या? अमोल मुझुमदारांनी PM मोदींना सांगितली Untold Story
19
Numerology: प्रत्येक स्त्री ही गृहलक्ष्मी असते; पण 'या' जन्मतारखेची स्त्री ठरते 'भाग्यलक्ष्मी'!
20
Physicswallah Ltd IPO: IPO उघडण्यापूर्वीच अब्जाधीश बनले 'या' कंपनीचे मालक; किती आहे प्राईज बँड? GMP मध्ये तेजी

आणीबाणीच्या काळातील सत्याग्रहींना राज्य सरकार देणार पेन्शन, चंद्रकांत पाटील समिताचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 21:38 IST

सन 1975 ते 1977 या कालावधीत देशात झालेल्या आणीबाणीच्या कालावधीत ज्या सत्याग्रहींनी लोकशाहीकरिता कणखर लढा देऊन बंदिवास सोसला अशा सर्व सत्याग्रहींचा यथोचित गौरव करण्याच्या दृष्टीने त्यांना पेन्शन देण्याचा महत्त्वपुर्ण निर्णय आज राज्य शासनाने घेतला आहे.

ठळक मुद्देआणीबाणीत लढा दिलेल्या सत्याग्रहींना सरकार देणार पेन्शनचंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गठीत समिताचा निर्णय

मुंबई : संपूर्ण देशात सन 1975 ते 1977 या कालावधीत झालेल्या आणीबाणीच्या कालावधीत ज्या सत्याग्रहींनी लोकशाहीकरिता कणखर लढा देऊन बंदिवास सोसला अशा सर्व सत्याग्रहींचा यथोचित गौरव करण्याच्या दृष्टीने त्यांना पेन्शन देण्याचा महत्त्वपुर्ण निर्णय आज राज्य शासनाने घेतला आहे.सन 1975 ते 1977 या काळात संपूर्ण देशातील लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न झाला. या आणीबाणीत संघर्ष करताना ज्यांना कारावास झाला त्यांच्या कुटुंबीयांना त्यावेळस प्रचंड यातना सहन कराव्या लागल्या, कोणी 1 महिना, कोणी 3 महिने तर कोणी 19 महिने जेलमध्ये होते. मात्र देशात लोकशाही सुदृढ झाली असून अशा सत्याग्रहींना पेन्शन देण्याची मागणी ब-याच काळापासून होत होती. अन्य राज्यांमध्ये 5-10 वर्षांपुर्वीच अशा प्रकारे कारावासात राहिलेल्या व्यक्तींना पेन्शन सुरु झाली आहे.

महाराष्ट्रातही अशी पेन्शन योजना सुरु व्हावी अशी ब-याच काळापासून जनमानसाची मागणी होती. त्यानुसार या मागणीला सार्थ न्याय देण्यासाठी मंत्रिमंडळाची एक उपसमिती गठीत करण्यात आली.

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हे या उपसमितीचे अध्यक्ष होते. आज झालेल्या या उपसमितीच्या पहिल्याच बैठकीत असा निर्णय झाला कि महाराष्ट्रात सुद्धा आणीबाणीच्यावेळी सत्याग्रह करून तुरूंगात गेलेल्या सत्याग्रहींना पेन्शन सुरु करण्यात येईल.यासोबतच इतरही अनेक महत्त्वपूर्ण निर्णय या बैठकीत झाले.1. एक ते सहा महिने कालावधीमध्ये ज्यांना तुरूंगवास झाला त्यांना देण्यात येणारी रक्कम वेगळी आणि 6 महिन्यापेक्षा जास्त काळ तुरूंगात राहिलेल्या सत्याग्रहिंसाठी वेगळी रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला. ह्या रकमेची आकडेवारी ह्या महिनाखेर पर्यंत सुनिश्चित करण्यात येईल.2. तुरूंगात राहिलेल्या ज्या सत्याग्रहींचे निधन झाले आहे, त्यापैकी सत्याग्रही पुरुषाच्या निधनोत्तर त्याच्या पत्नीला आणि सत्याग्रही महिलेच्या निधनोत्तर तिच्या पतीला हि पेन्शन देण्यात यावी असा निर्णय झाला.3. महिनाखेर पर्यंत पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांनी सर्व प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून यासंदर्भातली सर्व माहिती गोळा करून त्याआधारे अर्थविभागाकडे प्रस्ताव पाठवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

टॅग्स :Chandrakant Dada Bachu Patilचंद्रकांतदादा बच्चू पाटीलkolhapurकोल्हापूर