शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
4
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
5
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
6
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
7
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
8
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
9
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
10
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
11
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
12
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
13
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
14
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
15
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
16
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
17
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
18
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
19
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
20
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
Daily Top 2Weekly Top 5

आणीबाणीच्या काळातील सत्याग्रहींना राज्य सरकार देणार पेन्शन, चंद्रकांत पाटील समिताचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 21:38 IST

सन 1975 ते 1977 या कालावधीत देशात झालेल्या आणीबाणीच्या कालावधीत ज्या सत्याग्रहींनी लोकशाहीकरिता कणखर लढा देऊन बंदिवास सोसला अशा सर्व सत्याग्रहींचा यथोचित गौरव करण्याच्या दृष्टीने त्यांना पेन्शन देण्याचा महत्त्वपुर्ण निर्णय आज राज्य शासनाने घेतला आहे.

ठळक मुद्देआणीबाणीत लढा दिलेल्या सत्याग्रहींना सरकार देणार पेन्शनचंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गठीत समिताचा निर्णय

मुंबई : संपूर्ण देशात सन 1975 ते 1977 या कालावधीत झालेल्या आणीबाणीच्या कालावधीत ज्या सत्याग्रहींनी लोकशाहीकरिता कणखर लढा देऊन बंदिवास सोसला अशा सर्व सत्याग्रहींचा यथोचित गौरव करण्याच्या दृष्टीने त्यांना पेन्शन देण्याचा महत्त्वपुर्ण निर्णय आज राज्य शासनाने घेतला आहे.सन 1975 ते 1977 या काळात संपूर्ण देशातील लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न झाला. या आणीबाणीत संघर्ष करताना ज्यांना कारावास झाला त्यांच्या कुटुंबीयांना त्यावेळस प्रचंड यातना सहन कराव्या लागल्या, कोणी 1 महिना, कोणी 3 महिने तर कोणी 19 महिने जेलमध्ये होते. मात्र देशात लोकशाही सुदृढ झाली असून अशा सत्याग्रहींना पेन्शन देण्याची मागणी ब-याच काळापासून होत होती. अन्य राज्यांमध्ये 5-10 वर्षांपुर्वीच अशा प्रकारे कारावासात राहिलेल्या व्यक्तींना पेन्शन सुरु झाली आहे.

महाराष्ट्रातही अशी पेन्शन योजना सुरु व्हावी अशी ब-याच काळापासून जनमानसाची मागणी होती. त्यानुसार या मागणीला सार्थ न्याय देण्यासाठी मंत्रिमंडळाची एक उपसमिती गठीत करण्यात आली.

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हे या उपसमितीचे अध्यक्ष होते. आज झालेल्या या उपसमितीच्या पहिल्याच बैठकीत असा निर्णय झाला कि महाराष्ट्रात सुद्धा आणीबाणीच्यावेळी सत्याग्रह करून तुरूंगात गेलेल्या सत्याग्रहींना पेन्शन सुरु करण्यात येईल.यासोबतच इतरही अनेक महत्त्वपूर्ण निर्णय या बैठकीत झाले.1. एक ते सहा महिने कालावधीमध्ये ज्यांना तुरूंगवास झाला त्यांना देण्यात येणारी रक्कम वेगळी आणि 6 महिन्यापेक्षा जास्त काळ तुरूंगात राहिलेल्या सत्याग्रहिंसाठी वेगळी रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला. ह्या रकमेची आकडेवारी ह्या महिनाखेर पर्यंत सुनिश्चित करण्यात येईल.2. तुरूंगात राहिलेल्या ज्या सत्याग्रहींचे निधन झाले आहे, त्यापैकी सत्याग्रही पुरुषाच्या निधनोत्तर त्याच्या पत्नीला आणि सत्याग्रही महिलेच्या निधनोत्तर तिच्या पतीला हि पेन्शन देण्यात यावी असा निर्णय झाला.3. महिनाखेर पर्यंत पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांनी सर्व प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून यासंदर्भातली सर्व माहिती गोळा करून त्याआधारे अर्थविभागाकडे प्रस्ताव पाठवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

टॅग्स :Chandrakant Dada Bachu Patilचंद्रकांतदादा बच्चू पाटीलkolhapurकोल्हापूर