शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

कोल्हापूर हद्दवाढीबाबत राज्य सरकारच उदासीन ?, उपमुख्यमंत्री शिंदे बैठकीकडे फिरकलेच नाहीत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 13:03 IST

बैठक झाल्याचा क्षीरसागर यांचा दावा

कोल्हापूर : कोल्हापूर शहराची हद्दवाढ करण्यास राज्य सरकारच तयार नसल्याची शंका कोल्हापूरकरांच्या मनात येऊ लागली आहे. हद्दवाढीसारख्या कोल्हापूर शहराच्या महत्त्वाच्या विषयावर बैठकीसाठी मुंबईत अधिकाऱ्यांना बोलावून घेतल्यानंतर सुद्धा दोन दोन दिवस बैठक घ्यायला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वेळ मिळत नाही यावरूनच सरकार याबाबत निर्णय घेण्याच्या बाबतीत उदासीन असल्याचे दिसून येत आहे.कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीसंदर्भात राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापूर शहराच्या हद्दवाढ करण्याच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा सुरू केला आहे. त्याची दखल घेत उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या आदेशाने सोमवारी दुपारी दोन वाजता मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली होती. परंतु, रात्री आठ वाजले तरी उपमुख्यमंत्री शिंदे बैठकीसाठी पोहचले नव्हते. शेवटी ही बैठक रद्द करून पुन्हा मंगळवारी ही बैठक घेण्याचे ठरले, परंतु मंगळवारी देखील शिंदे या बैठकीसाठी आले नाहीत. शेवटी ही बैठकही देखील रद्द करण्यात आली.कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीवरून शहरी व ग्रामीण जनतेत संघर्ष निर्माण झाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून आंदोलने सुरू आहेत. समर्थक व विरोधक आमने-सामने आले आहेत. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र, राज्य सरकारला याचे काहीही देणे-घेणे राहिलेले नाही. महापालिका, प्राधिकरणाचे अधिकारी गेले दोन दिवस आपली सगळी कामे बाजूला ठेऊन मुंबईतील बैठकीसाठी ठाम मांडून बसले आहेत. तरीही उपमुख्यमंत्री शिंदे बैठकीकडे फिरकले नाहीत याचाच अर्थ त्यांना हद्दवाढीवर निर्णय घ्यायचा नाही की काय, अशी शंका कोल्हापूरकरांच्या मनात बळावत चालली आहे.दोन दिवसांपासून कोल्हापूरकर या बैठकीत काही तरी सकारात्मक निर्णय घेतला जाईल, अशी अपेक्षा बाळगून आहेत. शहराची हद्दवाढ करणार असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी एकदा नाही तर दोन तीन वेळा आश्वासन दिले आहे. त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा असताना जर शिंदे नियोजित बैठकही घेत नसल्यामुळे त्यांच्यावर अन्य कोणाचा दबाव आहे की काय, अशीही शंका उपस्थित केली जाऊ लागली आहे.आमदार अमल महाडिक, आमदार चंद्रदीप नरके पहिल्यापासून ग्रामिण भागातील जनतेला विश्वासात घेऊनच हद्दवाढीबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी करत आहेत. त्यांना विश्वासात घेण्यासाठी तरी बैठका व्हायला पाहिजेत, चर्चा व्हायला पाहिजेत. त्यासाठी कोणी पुढाकार घ्यायचा या प्रश्नाचे उत्तर मिळत नसल्याने या प्रश्नात चालढकल केली जात असावी, अशी शंका उपस्थित होत आहे.बैठक झाल्याचा क्षीरसागर यांचा दावादरम्यान, मंत्रालयात उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत दुसरी बैठक पार पडल्याचा दावा करत, या बैठकीत दोन्ही बाजूच्या नागरिकांना विश्वासात घेवून हद्दवाढीबाबत निर्णय घेण्यात येईल. हद्दवाढीबाबत सरकार सकारात्मक आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पुन्हा बैठक होण्याची शक्यता असून, त्यामध्ये हद्दवाढीबाबत निर्णय होण्याची आशा असल्याची माहिती आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरEknath Shindeएकनाथ शिंदेRajesh Vinayakrao Kshirsagarराजेश विनायकराव क्षीरसागर