शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

(स्टार ८२२) कोरोना काळात हजारांवर आत्महत्या; भावनिक, आर्थिक आधाराची गरज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 4:18 AM

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोरोना संकटाने उद्योगधंदे-व्यवसाय बंद पडले, अनेकांच्या नोक-या गेल्या, बेरोजगारी वाढली, कुटूंब कसे चालवायचे हा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कोरोना संकटाने उद्योगधंदे-व्यवसाय बंद पडले, अनेकांच्या नोक-या गेल्या, बेरोजगारी वाढली, कुटूंब कसे चालवायचे हा प्रश्न बहुतांशी जणांसमोर उभारला, जिव्हाळ्याची माणसे कोरोनाने मृत्यू पडली, नैराश्यमय वातावरणात अनेकांना जगणे असह्य झाले, कमकुवत मनाच्या लोकांत नैराश्येची भावना वाढली व आत्महत्येचे टोकाचे निर्णय घेतले. अशांना वेळीच सावरण्यासाठी त्यांना भावनिक व आर्थिक आधाराची गरज असते. गेल्या दीड वर्षात कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल १००६ जणांनी आत्महत्या केल्याची पोलिसांत नोंद आहे.

कोरोनामुळे जीवनातील अर्थचक्रच बंद पडले, त्यामुळे २०२० मध्ये अनेकांचे आर्थिक नुकसान झाले. माणसे कर्जाच्या खाईत लोटली अशातच व्यसनाधीनता वाढली. परिणामी नैराश्य येऊन असुरक्षिततेची भावना निर्माण झाली. त्यातून आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेतला. त्या कालावधीत ६१९ जणांनी आत्महत्या केल्या. कोरोनाच्या पहिल्या लाटेतून सावरतानाच दुस-या लाटेनेही पुन्हा डोके वर काढले. दुस-या लाटेत, हे संकट फक्त आपल्या एकट्यावरच नाही तर सारेच अडचणीत असल्याची भावना वाढल्याचे दिसते. जानेवारी ते मे २०२१ या कालावधीत ३०७ जणांनी जीवनयात्रा संपवली.

जिल्ह्यातील आत्महत्या-

- २०१९ मध्ये आत्महत्या : ५७०

- २०२० मध्ये आत्महत्या : ६१९

- २०२१ जाने. ते मे आत्महत्या : ३०७

आत्महत्या कोणत्या वयात... (जाने. ते मे २०२१)

- २५ वयापेक्षा कमी : ३५

- २६ ते ४० वयोगट : १३२

- ४१ ते ६० वयोगट : ११८

- ६० पेक्षा जास्त : २२

हे दिवस जातील...

प्रत्येकाच्या आयुष्यात अडचणीचा काळ येत असतो, नंतर आनंदाचे क्षणही येतात. हा विचार प्रत्येकाने करायला हवा. कोरोनाचे संकट हे फक्त एकट्यावरच नसून सर्वांवर आहे, त्याचा सर्वांनाच त्रास सुरू आहे. कोरोनामुळे सामाजिक बंधणे आली. एकलकोंडेपणा वाढला, नैराश्य आले असले तरीही अपराधीपणाची व नकारात्मक भावना सोडून प्रत्येकाने एकमेकांशी संभाषण सुरू ठेवावे. हेही दिवस लवकरच जातील, अशा अपेक्षा बाळगून परिस्थितीचा सामना करावा.

कुटूंबाने काळजी घेण्याची गरज...

संकटामुळे माणसावर आर्थिक, मानसिक दडपण असल्यास कुटूंबातील सदस्याने एकाप्याने राहिले पाहीजे. नैराश्य आले, त्याला एकटे नाही, कुटूंब व मित्रपरिवार सोबत आहे, याची जाणीव करून द्यावी. भावना व्यक्त झाल्या पाहिजे, माणसातील नैराश्य, भयगंड कमी करून विश्वासाची भावना निर्माण झाली पाहिजे.

कोट...

कोरोनामुळे नैराश्य, काळजी, चिंता याचे आजार वाढले. अशांना मानसिक आधाराची गरज असते, प्रसंगी अशा व्यक्तींना समुपदेशन अथवा मानसोपचारतज्ज्ञाकडून उपचार करून घेणे योग्य राहील. - डॉ. राकेश बेळगुद्री, मानसोपचारतज्ज्ञ, गडहिंग्लज.

कोट...

कोरोनामुळे मानसिक आजाराच्या प्रमाणात २० टक्के वाढ झाली. नैराश्य व भयगंड टाळण्यासाठी अपराधीपणाची भावना अगर नकारात्मकता काढली पाहिजे, वेळीच समुपदेशन केल्यास, मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घेतल्यास आत्महत्या रोखता येतील - डॉ. निखिल चौगुले, मानसोपचारतज्ज्ञ, कोल्हापूर.