शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

कोल्हापुरात ‘स्टार्टअप’पेक्षा ‘स्टँड-अप इंडिया’ आघाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2022 12:42 IST

कोल्हापुरातून मागील तीन वर्षात विविध १०० स्टार्टअपची नोंदणी झाली आहे

संतोष मिठारीकोल्हापूर : उद्योगाला चालना देऊन रोजगार निर्मिती वाढविण्यासाठी केंद्र सरकारने स्टार्टअप आणि स्टँड-अप इंडिया योजनांची सुरुवात करून पाऊले टाकली. ‘फौंड्री हब’ असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात स्टार्टअपच्या तुलनेत स्टँडअप इंडिया योजना आघाडीवर आहे. गेल्या सहा वर्षांत एकूण ५४७ प्रकरणांसाठी बँकांनी कर्ज मंजूर केले आहेत. कोल्हापुरातून मागील तीन वर्षात विविध १०० स्टार्टअपची नोंदणी झाली आहे.केंद्र सरकारने २०१६ मध्ये स्टँड-अप इंडिया ही योजना महिला आणि अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती समुदायातील उद्योजकतेला पाठिंबा देण्यासाठी सुरू केली. याअंतर्गत विविध क्षेत्रातील उद्योग सुरू करण्यासाठी कोल्हापुरातील ५४७ प्रकरणे मंजूर झाली आहेत. त्यांना बँकांच्या माध्यमातून १३३ कोटी ३४ लाखांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे.गेल्या तीन वर्षांपासून गती वाढली..

  • स्टार्टअप इंडिया योजना देखील २०१६ मध्ये सुरू झाली; मात्र कोल्हापूर जिल्ह्यात स्टार्टअपची गती गेल्या तीन वर्षांपासून वाढली. केंद्र सरकारच्या स्टार्टअप इंडिया पोर्टलवर कोल्हापूरमधील १०० स्टार्टअपची नोंदणी झाली आहे. त्यातील ३० स्टार्टअप हे नवसंशोधनाशी संबंधित आहेत.
  • शिवाजी विद्यापीठाच्या एसयुके रिसर्च अँड डेव्हलपमेंट फौंडेशनच्या मार्गदर्शनाखाली ६, तर सिदम इनोव्हेशन अँड बिझनेस इन्क्युबेशन सेंटरच्या मार्गदर्शनाखाली १८ स्टार्टअप सुरू आहेत.
  • विद्यार्थी, शिक्षक, युवा वर्गाने स्टार्टअप, स्टँड-अप इंडियाद्वारे उद्योग उभारणी केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील स्टार्टअप कंपन्या आर्थिक अडचणीत आल्याचे चित्र असताना कोल्हापूरमधील स्टँड-अप, स्टार्टअपची स्थिती चांगली दिसत आहे. 

या क्षेत्रातील स्टार्टअपउद्योग, कृषी, शैक्षणिक, हेल्थकेअर, फूड इंडस्ट्री, आदी क्षेत्रातील स्टार्टअप आहेत. कोरोना काळात व्हेंटिलेटर, ऑक्सिजन पुरवठा, बेड, आदी वैद्यकीय साधनांचे स्टार्टअप जिल्ह्यात सुरू झाले.

स्टँड-अप इंडिया योजनेतून गेल्या सहा वर्षांत कोल्हापुरात एकूण १३३ कोटी ३४ लाख रूपयांचे कर्ज वितरण झाले आहे. या योजनेला चांगला प्रतिसाद आहे. -गणेश गोडसे, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक 

जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून स्टार्टअपची गती वाढली आहे. शैक्षणिक संस्था स्टार्टअपसाठी पुढे येत असून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळत आहे. त्यामुळे स्टार्टअपची संख्या आणखी वाढेल. -प्रतीक ओसवाल, संचालक, सिदम इनोव्हेशन अँड बिझनेस इन्क्युबेशन सेंटर

विद्यार्थी, संशोधक, सर्वसामान्यांच्या अभिनव कल्पनांवर आधारित स्टार्टअपच्या प्रस्तावांना मार्गदर्शनासह गती देण्याचे काम शिवाजी विद्यापीठ करत आहे. विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली सध्या ६ स्टार्टअप सुरू असून आणखी ४ लवकरच सुरू होतील. -डॉ. पी. डी. राऊत, सीईओ, एसयुके रिसर्च अँड डेव्हलपमेंट फौंडेशन

टॅग्स :kolhapurकोल्हापूर