शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
2
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
3
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
4
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
5
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
6
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
7
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
8
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
9
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
10
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
11
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
12
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
13
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
14
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
15
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
16
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
17
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
18
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
19
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
20
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?

नि:स्वार्थी, जागरूक कार्यकर्त्यांची फौज हवी _ -- संग्राम सावंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 01:19 IST

अनेक ग्रामपंचायती दिव्यांगाचा निधी दिव्यांगावर खर्च न करता इतर कामांसाठी खर्च करतात. याविरोधात आम्ही लढा उभारला आहे. - संग्राम सावंत , मुक्ता संघर्ष समिती

ठळक मुद्देअनेक वर्षे आॅडिट न केल्याने गैरव्यवहार दडपले जातात.

समीर देशपांडे ।सुरुवातीपासूनच चळवळीशी बांधले गेलेले संग्राम सावंत यांनी पूर्णवेळ समाजासाठी संघर्षाची भूमिका घेतली आहे. आजरा, गडहिंग्लज, चंदगड, भुदरगडमधील प्रश्नांबाबत त्यांनी ‘मुक्ता संघर्ष समिती’च्या माध्यमातून भूमिका घेतली आहे. ग्रामपंचायत, नगरपालिकांचा दिव्यांगाचा निधी त्यांच्यासाठीच खर्च व्हावा, यासाठी त्यांनी आग्रह धरलेल्या चळवळीची दखल जागतिक मानवी हक्क परिषदेने घेतली आहे. त्यांच्याशी साधलेला संवाद.प्रश्न : सामाजिक कार्याची सुरुवात कशी झाली?उत्तर : माझं मूळ गाव सांगली जिल्ह्यातील तासगाव. चरितार्थासाठी बी.ए.,बी.एड्.चे शिक्षण घेतले. याचदरम्यान ‘परिवर्तन परिवार तासगाव’ या स्टडी सर्कलमुळे सामाजिक कार्याकडे वळलो.‘एसएफआय’या विद्यार्थी संघटनेतूनही काम केले होते. अलिबागला प्राथमिक शिक्षक म्हणून आदेशही निघाला होता. मात्र, त्याचवेळी नोकरी न करता पूर्णवेळ सामाजिक कार्य करण्याचा निर्णय घेतला. डॉ. भारत पाटणकर, धनाजी गुरव यांच्यापासूनही मी प्रेरणा घेतली आणि जीवनाची दिशा बदलली.

प्रश्न : आजरा तालुक्याकडे कसे वळलात?उत्तर : श्रमिक मुक्ती दलाच्या आजरा तालुक्यातील जेऊर येथील एका शिबिराला मी आलो होतो. तेव्हापासून हा भाग आवडला. अशातच पत्नी प्रियांका यांची ग्रामसेविका म्हणून आजरा तालुक्यात बदली झाली आणि माझे या भागातील काम सुरू झाले.

प्रश्न : सध्या कोणत्या प्रश्नांवर लढा सुरू आहे?उत्तर : आजरा, गडहिंग्लज, चंदगड, भुदरगड या तालुक्यांमध्ये प्रामुख्याने काम सुरू आहे. ग्रामपंचायती दिव्यांगासाठीचा ३ व ५ टक्के दिव्यांग कल्याण निधी खर्च करीत नाहीत. मागासवर्गीयांसाठीचा १५ टक्के निधी, तसेच महिला व बालकल्याण योजनांसाठीचा १0 टक्के निधी खर्च केला जात नाही. त्यात भ्रष्टाचार केला जातो, याबाबतीतील प्रश्न प्रामुख्याने हातात घेतले आहेत. आजरा ते मुंबई उच्च न्यायालय असा दाभिल रेशन दुकानाबाबत ८५ दिवस आंदोलन करून हा प्रश्न सोडविला. देवर्डे (ता. आजरा) येथील गायरान जमिनीत बेघर व भूमिहीन लोकांच्या घरांसाठी भूखंड मिळावेत, बुगडीकट्टी या गावच्या घरांचा व रस्त्याचा प्रश्न याबाबतीत संघर्ष सुरू आहे.

प्रश्न : ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत तुमचे मत काय?उत्तर : ग्रामस्थ जागरूक नसल्याने आणि राजकीय गटातटातच अडकल्याने ग्रामपंचायतीकडे निधी किती आला, खर्च किती झाला याचा हिशोब गावात कुणी विचारत नाही. बहुतांश वेळा राजकारणातूनच काही प्रकरणे उघडकीला येतात. ‘लोकमत’ने लावून धरलेला इटे जलसिंचन योजनेचा विषय यातीलच एक आहे. आपलेच पैसे आपल्यासाठी चांगल्या पद्धतीने खर्च व्हावेत आणि किमान दर्जेदार मूलभूत सुविधा मिळाव्यात, यासाठी दुर्दैवाने लढे उभारण्याची वेळ आली आहे. ग्रामपंचायतीचे वर्षाला आॅडिट झाले पाहिजे आणि जे आॅडिट करतात त्यांच्याही कामाचे आॅडिट झाले पाहिजे. अनेक वर्षे आॅडिट न केल्याने गैरव्यवहार दडपले जातात.

प्रश्न : दिव्यांगांसाठीच्या संघर्षाची नोंद कशी घेतली गेली? उत्तर : दिव्यांगांसाठीच्या कल्याण योजनांसाठी ३ टक्के निधी सक्तीने दिला जातो. मात्र, हा निधी खर्च होताना दिसत नाही. याविरोधात उभारलेल्या लढ्यांची दखल जागतिक पातळीवर घेण्यात आली आणि जिनिव्हा इथे २४ जूनला जागतिक मानवी हक्क परिषदेमध्ये या कार्याची दखल घेण्यात आली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSocialसामाजिक