शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

जयसिंगपुरात घनकचरा सक्षमीकरणाला गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 00:12 IST

कोंडाळीमुक्तशहरानंतर घनकचरा व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी जयसिंगपूर पालिकेने पुढाकार घेतला आहे. स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत पालिकेला १ कोटी ७२ लाखांचा निधी मंजूर झाला असून,

ठळक मुद्देस्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत पहिल्या टप्प्यात ५० लाखांचा निधी प्राप्त नगरपालिकेचा पुढाकार : ; गांडूळ प्रकल्पाला बळकटी

संदीप बावचे ।जयसिंगपूर : कोंडाळीमुक्तशहरानंतर घनकचरा व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी जयसिंगपूर पालिकेने पुढाकार घेतला आहे. स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत पालिकेला १ कोटी ७२ लाखांचा निधी मंजूर झाला असून, त्यातील ५० लाखांचा पहिल्या टप्प्यातील निधी पालिकेला प्राप्त झाला आहे.

या निधीतून घनकचऱ्याच्या ठिकाणी वजनकाटा बसविणे, ओल्या कचºयावर प्रक्रिया करण्यासाठी शेड उभारणे ही कामे केली जाणार आहेत. पहिल्या टप्प्यातील या कामामुळे ओल्या कचºयाची विल्हेवाट लावून गांडूळ खत निर्मिती प्रकल्पाला आणखी बळकटी येणार आहे.

स्वच्छ व सुंदर शहरासाठी केंद्र शासनाने मागील वर्षापासून स्वच्छता अभियान सुरू केले आहे. यंदाची स्वच्छता अभियानाची स्पर्धा सुरू झाली आहे. पाच हजार गुणांची असणाºया या स्पर्धेत जयसिंगपूर पालिकेनही यामध्ये सहभाग घेतला असून, प्रामुख्याने कचरा व्यवस्थापनावर पालिकेने भर दिला आहे. कचरा संकलन व वाहतूक, कचरा प्रक्रिया व विल्हेवाट अशी प्रक्रिया पालिका राबवित आहे. स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत घनकचरा व्यवस्थानासाठी शासनाकडून एक कोटी ७२ लाखांचा निधी मंजूर झाला आहे.

या निधीतून घंटागाड्या खरेदी करणे, घनकचºयाच्या ठिकाणी वजनकाटा बसविणे, आवश्यक मशिनरी बसविणे, ओल्या कचºयावर प्रक्रिया करण्यासाठी शेड उभारणे, मनुष्यबळ पुरविणे यांसह माहिती, शिक्षण व संवाद अंतर्गत घनकचरा व्यवस्थापनासाठी नागरिकांमध्ये प्रबोधन करणे, अशा प्रमुख बाबींचा समावेश आहे. शासनाकडून टप्प्याटप्प्याने निधी दिला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात ५० लाखांचा निधी पालिकेला प्राप्त झाला आहे. त्यामुळे घनकचरा व्यवस्थापनाला आणखी गती मिळणार असून, गांडूळ खतनिर्मिती प्रकल्प आणखी सक्षम होणार आहे. सध्या एक रुपये किलो प्रमाणे गांडूळ खताची विक्री केली जाते. पहिल्या टप्प्यातील कामानंतर खतनिर्मिती अधिक प्रमाणात होणार असून, यातून पालिकेला उत्पन्न मिळणार आहे.घंटागाड्यांची गरजशहरातील कचराकोंडाळ्या काढून टाकण्यात आल्यानंतर प्रभागामध्ये घंटागाड्या येत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आरोग्य विभागाकडे आल्यानंतर त्यामध्ये काही प्रमाणात सुधारणा झाली असली तरी घंटागाड्यांची संख्या वाढविणे गरजेचे आहे. घनकचरा प्रकल्पांतर्गत पालिकेला निधी मिळाला असून, घंटागाड्यांची खरेदी करणे आवश्यक आहे.जागा खरेदी कागदावरचघनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविण्यासाठी चौदाव्या वित्त आयोगातून जागा खरेदी करण्याचा ठराव सव्वा वर्षापूर्वी पालिकेने केला आहे. चिपरीसारखी पुन्हा समस्या निर्माण होऊ नये व कायमस्वरुपी कचºयाचा प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडे जागेची कार्यवाही करण्याचा निर्णय झाला होता. मात्र, हा निर्णय कागदावरच राहिला आहे. सुमारे चार एकर जागा या प्रकल्पासाठी आवश्यक आहे.स्वच्छतेवर सव्वादोन कोटीशहरातील कचरा संकलन करणे व वाहतूक करणे, ड्रेनेजची साफसफाई, रस्ते स्वच्छता, स्वच्छतागृहांची स्वच्छता यासह विविध कामांसाठी वर्षाकाठी तब्बल सव्वा दोन कोटींचा निधी पालिकेने मंजूर केला आहे. मात्र, संबंधित ठेकेदाराकडून आठवड्यातून एकदा स्वच्छतागृहांची साफसफाई केली जात असल्याचे नागरिकांतून सांगण्यात येते. एकीकडे मोठा निधी स्वच्छतेसाठी पालिका खर्च करते; मात्र स्वच्छतेच्या नावाने नागरिकांची ओरड कायम आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMuncipal Corporationनगर पालिका