शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

ज्याचा जोर, त्याला जादा पाणी; कोल्हापुरात काही माजी नगरसेवकांनी स्वत:ची उभी केली यंत्रणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2023 14:10 IST

शहराच्या एका प्रभागात तर पाण्याचे व्हॉल्व्ह कायमचे सोडलेले

भारत चव्हाण कोल्हापूर : शहराच्या काही भागातील पाणीपुरवठा विस्कळीत होण्याकरिता जशी जलवाहिनीवरील गळती कारणीभूत आहे, तसा माजी नगरसेवकांचा वितरण व्यवस्थेतील कमालीचा हस्तक्षेप देखील कारणीभूत असल्याचे समोर येत आहे. काही नगरसेवकांनी पाणी वितरणाची स्वत:चीच यंत्रणा उभी केली असून केवळ आपल्या प्रभागाला जास्तीत जास्त पाणी पुरवठा कसा होईल याकडेच त्यांनी अधिक लक्ष दिले आहे. साहजिकच दुसऱ्या भागाला अपुऱ्या दाबाच्या पाणीपुरवठ्याचा अन्याय सहन करावा लागत आहे.कोल्हापूर शहराला वळसा घालून जाणारी पंचगंगा नदी बारा महिने वाहत आहे. कितीही कडक उन्हाळा पडला तरी पंचगंगा काठोकाठ भरलेली असते. छत्रपती शाहू महाराज यांच्या कृपेने झालेले राधानगरी धरण आणि नंतरच्या काळात झालेल्या काळम्मावाडी, तुळशी यासारख्या अन्य छोट्या छोट्या धरणांमुळे कोल्हापूरला पाण्याचा दुष्काळ कधीच जाणवला नाही. मात्र, पाणी वितरण व्यवस्थेत मात्र गेल्या काही वर्षांपासून दुष्काळ आहे. जुन्या जलवाहिन्यांमुळे गळती मोठी असल्याने आतापर्यंत अपुऱ्या, कमी दाबाने होणाऱ्या पाणी पुरवठ्याचे खापर गळतीवर फोडले गेले. परंतु त्याही पेक्षा अधिक गलथानपणा वितरण व्यवस्थेत असल्याचे दिसून येते.मी आणि माझा मतदार संघ एवढ्या संकुचित वृत्तीने काम करणाऱ्या काही माजी नगरसेवकांनी शहरातील पाणी वितरण व्यवस्था आपल्या मर्जीप्रमाणे राबविण्यास सुरुवात केली आहे. आपल्या मतदारांना पाणी पुरवठा मुबलक व्हावा याकरिता त्यांनी स्वत:ची यंत्रणा राबविल्याचे चित्र समोर येत आहे. प्रभागात कोठे कोठे व्हॉल्व्ह आहेत, पाणी किती वाजता येते आणि बंद होते याची त्यांनी माहिती करून घेतली आहे. किती आठ्ठ्या सोडल्या की जास्त दाबाने पाणी येते याचीही त्यांना माहिती आहे. एवढेच काय तर व्हॉल्व्ह सोडबंद करणारे पाणेसुद्धा त्यांनी खरेदी केले आहेत. हे पाणे घेऊनच काही माजी नगरसेवकांचे पगारी नोकर, कार्यकर्ते पाणी सोडबंद करतात.पाच ते सहा माजी नगरसेवकांनी अशी स्वत:ची यंत्रणा उभी केली आहे. त्यामुळे महापालिकेचे चावीवाले काहीच करू शकलेले नाहीत. आपण स्वत: व्हॉल्व्ह सोडबंद करावेत, तक्रार करावी म्हटली तर शिव्याशाप, उद्धार ठरलेलाच असतो. त्यामुळे या माजी नगरसेवकांच्या वितरण व्यवस्थेतील हस्तक्षेपाला कोणीही पायबंद घालू शकलेले नाही. म्हणूनच दुसऱ्या भागात नागरिकांना पिण्याचे पाणी अपुरे, कमी दाबाने मिळत आहे. या नागरिकांना मात्र कायम कृत्रिम पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे.सिमेंट घालून बंद केलेत व्हॉल्व्हशहराच्या एका प्रभागात तर पाण्याचे व्हॉल्व्ह कायमचे सोडलेले आहेत. सोडलेले व्हॉल्व्ह सिमेंट घालून बंद केल्याची चर्चा आहे. त्यामुळे या भागातील पाणी बंद होण्याचा प्रश्नच येत नाही. टाकीतून सोडलेले पाणी थेट घराघरात पोहोचते. याची माहिती असूनही पालिकेच्या चावीवाल्यांना गप्प बसण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरWaterपाणी