शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
7
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
8
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
9
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
10
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
11
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
12
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
13
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
14
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
15
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
16
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
17
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
18
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
19
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
20
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?

ज्याचा जोर, त्याला जादा पाणी; कोल्हापुरात काही माजी नगरसेवकांनी स्वत:ची उभी केली यंत्रणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2023 14:10 IST

शहराच्या एका प्रभागात तर पाण्याचे व्हॉल्व्ह कायमचे सोडलेले

भारत चव्हाण कोल्हापूर : शहराच्या काही भागातील पाणीपुरवठा विस्कळीत होण्याकरिता जशी जलवाहिनीवरील गळती कारणीभूत आहे, तसा माजी नगरसेवकांचा वितरण व्यवस्थेतील कमालीचा हस्तक्षेप देखील कारणीभूत असल्याचे समोर येत आहे. काही नगरसेवकांनी पाणी वितरणाची स्वत:चीच यंत्रणा उभी केली असून केवळ आपल्या प्रभागाला जास्तीत जास्त पाणी पुरवठा कसा होईल याकडेच त्यांनी अधिक लक्ष दिले आहे. साहजिकच दुसऱ्या भागाला अपुऱ्या दाबाच्या पाणीपुरवठ्याचा अन्याय सहन करावा लागत आहे.कोल्हापूर शहराला वळसा घालून जाणारी पंचगंगा नदी बारा महिने वाहत आहे. कितीही कडक उन्हाळा पडला तरी पंचगंगा काठोकाठ भरलेली असते. छत्रपती शाहू महाराज यांच्या कृपेने झालेले राधानगरी धरण आणि नंतरच्या काळात झालेल्या काळम्मावाडी, तुळशी यासारख्या अन्य छोट्या छोट्या धरणांमुळे कोल्हापूरला पाण्याचा दुष्काळ कधीच जाणवला नाही. मात्र, पाणी वितरण व्यवस्थेत मात्र गेल्या काही वर्षांपासून दुष्काळ आहे. जुन्या जलवाहिन्यांमुळे गळती मोठी असल्याने आतापर्यंत अपुऱ्या, कमी दाबाने होणाऱ्या पाणी पुरवठ्याचे खापर गळतीवर फोडले गेले. परंतु त्याही पेक्षा अधिक गलथानपणा वितरण व्यवस्थेत असल्याचे दिसून येते.मी आणि माझा मतदार संघ एवढ्या संकुचित वृत्तीने काम करणाऱ्या काही माजी नगरसेवकांनी शहरातील पाणी वितरण व्यवस्था आपल्या मर्जीप्रमाणे राबविण्यास सुरुवात केली आहे. आपल्या मतदारांना पाणी पुरवठा मुबलक व्हावा याकरिता त्यांनी स्वत:ची यंत्रणा राबविल्याचे चित्र समोर येत आहे. प्रभागात कोठे कोठे व्हॉल्व्ह आहेत, पाणी किती वाजता येते आणि बंद होते याची त्यांनी माहिती करून घेतली आहे. किती आठ्ठ्या सोडल्या की जास्त दाबाने पाणी येते याचीही त्यांना माहिती आहे. एवढेच काय तर व्हॉल्व्ह सोडबंद करणारे पाणेसुद्धा त्यांनी खरेदी केले आहेत. हे पाणे घेऊनच काही माजी नगरसेवकांचे पगारी नोकर, कार्यकर्ते पाणी सोडबंद करतात.पाच ते सहा माजी नगरसेवकांनी अशी स्वत:ची यंत्रणा उभी केली आहे. त्यामुळे महापालिकेचे चावीवाले काहीच करू शकलेले नाहीत. आपण स्वत: व्हॉल्व्ह सोडबंद करावेत, तक्रार करावी म्हटली तर शिव्याशाप, उद्धार ठरलेलाच असतो. त्यामुळे या माजी नगरसेवकांच्या वितरण व्यवस्थेतील हस्तक्षेपाला कोणीही पायबंद घालू शकलेले नाही. म्हणूनच दुसऱ्या भागात नागरिकांना पिण्याचे पाणी अपुरे, कमी दाबाने मिळत आहे. या नागरिकांना मात्र कायम कृत्रिम पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे.सिमेंट घालून बंद केलेत व्हॉल्व्हशहराच्या एका प्रभागात तर पाण्याचे व्हॉल्व्ह कायमचे सोडलेले आहेत. सोडलेले व्हॉल्व्ह सिमेंट घालून बंद केल्याची चर्चा आहे. त्यामुळे या भागातील पाणी बंद होण्याचा प्रश्नच येत नाही. टाकीतून सोडलेले पाणी थेट घराघरात पोहोचते. याची माहिती असूनही पालिकेच्या चावीवाल्यांना गप्प बसण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरWaterपाणी