शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
2
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
3
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
4
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
5
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
6
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
7
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
8
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
9
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
10
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
11
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
12
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
13
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
14
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
15
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
16
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
17
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
18
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
19
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
20
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!

मिठाच्या रांगोळीतून सामाजिक गोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 12:47 AM

संदीप आडनाईक ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : चिमूटभर मीठ जेवणाची चव वाढविते. मिठाशिवाय जेवण नीरस आणि बेचव लागतं. या मिठाचाच कलेमध्ये प्रतिभेचा वापर करून सामाजिक संदेश देण्याची किमया शिवाजी चौगुले यांनी साधली आहे.मुंबईत सार्वजनिक आरोग्य विभागात शिपाई असलेले शिवाजी चौगुले यांचे मूळ गाव कागल तालुक्यातील बेलेवाडी मासा. आई वडील शेती करतात. ...

संदीप आडनाईक ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : चिमूटभर मीठ जेवणाची चव वाढविते. मिठाशिवाय जेवण नीरस आणि बेचव लागतं. या मिठाचाच कलेमध्ये प्रतिभेचा वापर करून सामाजिक संदेश देण्याची किमया शिवाजी चौगुले यांनी साधली आहे.मुंबईत सार्वजनिक आरोग्य विभागात शिपाई असलेले शिवाजी चौगुले यांचे मूळ गाव कागल तालुक्यातील बेलेवाडी मासा. आई वडील शेती करतात. दहावीपर्यंत उत्तूर येथे शिक्षण झाले. लहानपणापासूनच चित्रकलेची आवड. जख्खेवाडी (ता.गडहिंग्लज) येथे मामा देवदास संकपाळ यांच्याकडे त्याचे लहानपण गेले. २००२ पासून मुंबईत मामासोबत केश कर्तनालयाचा व्यवसाय सुरू केला. २००४ मध्ये आरोग्य खात्यात शिपाई म्हणून नोकरी लागली. कौटुंबिक जबाबदाºया पार पाडत सरकारी कार्यालयातील वार्ताफलकावर दैनंदिन आरोग्य सुविचार आणि घोषवाक्ये लिहायला सुरुवात करीत आपल्यातील कलाकाराला वाट मिळवून दिली.स्केच पेंटिंग आणि अक्षर गणेश साकारण्याची कलाही त्यांच्या अंगी आहे. रांगोळी कलाकृतींबद्दल त्यांना चार पुरस्कार मिळालेले असून, ‘लिम्का बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड’साठी ते प्रयत्न करीत आहेत. मिठापासून बनविलेल्या या कलाकृतींचे प्रदर्शन भरविण्याची त्यांची इच्छा आहे.रांगोळीतून सामाजिक संदेशत्यांनी २०१५ मध्ये प्रजासत्ताकदिनी स्त्री-भ्रूणहत्याविरोधात ‘लेक वाचवा’ हा संदेश देणारी ४५ किलो मिठापासून मोठी रांगोळी सजविली. माघी गणेश जयंतीला ३० किलो मिठापासून त्यांनी श्रीगणेशाचे रूप साकारले. स्वातंत्र्यदिनाला ५० किलो मिठापासून डॉट्स क्षयरोग कार्यक्रमांतर्गत ‘पूर्ण कोर्स, पक्का इलाज’ हा संदेश दिला. शिवजयंतीला ५० किलो मिठापासून जाणता राजा साकारला. उल्हासनगर पालिका मुख्यालयात ‘आधी लगीन कोंढाण्याचे, मग माझ्या रायबाचे’ या विषयावर १६ बाय २० चौरस फुटांची तब्बल १६ तास खपून भव्य रांगोळी साकारली. २०१६ च्या स्वातंत्र्यदिनाला ‘नेत्रदान हेच श्रेष्ठदान’ यावर ४५ किलो मिठापासून रांगोळी साकारली. ‘जागतिक क्षयरोग दिनी’ शिवाजीने साकारलेल्या भव्य रांगोळीची दखल घेऊन सार्वजनिक आरोग्य विभागाने त्यांना सुवर्णपदक, स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या हस्ते शिवाजी यांचा गौरव करण्यात आला. जागतिक लोकसंख्या दिनी मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात ७० किलो जाड मीठ आणि सात किलो रंग वापरुन १६ बाय १८ आकाराची ‘जबाबदारी स्वीकारा, कुटुंब नियोजन पद्धतीचा अवलंब करा,’ असा संदेश देणारी भव्य आणि नेत्रदीपक रांगोळी रेखाटली. सेंट जॉर्जेस रुग्णालय येथील गणेशोत्सव मंडळासाठी १०५ किलो जाड मीठ आणि ८ किलो रंग वापरून १६ बाय १८ ‘मरावे परी अवयवरूपी उरावे’ ही रांगोळी रेखाटली.कलाकृतीसाठी लागते सरासरी १०० किलो मीठकोणतीही रांगोळी काढताना शिवाजी मोठ्या मिठाचा वापर करतात. एखादी कलाकृती साकारताना सरासरी १०० किलो मीठ लागते. यात काही किलो रंगांचाही वापर केला जातो. कलाकृती साकारण्यासाठी त्यांना अंदाजे ११ तास लागतात. यासाठी लागणारे मीठ ते मस्जीद बंदर येथून किरकोळ भावाने विकत घेतात. त्याचा सरासरी सहा रुपये किलो दर पडतो. हे मीठ नंतर नारळीच्या झाडांसाठी वापरले जाते. यामुळे झाडांना कीड लागत नाही. कार्यालयीन परिसरात यासाठी सहा झाडे लावून ती जगविली आहेत.