कोगेत तरू णाने जपली सामाजिक बांधिलकी
By Admin | Updated: December 16, 2014 00:16 IST2014-12-15T20:55:39+5:302014-12-16T00:16:25+5:30
ग्रामस्थांची साथ : अंत्यविधीसाठी मोफत सरण

कोगेत तरू णाने जपली सामाजिक बांधिलकी
शिवराज लोंढे - सावरवाडी -गोरगरिबांना महागाईच्या काळात मरणही महाग झाले असताना जनसेवेच्या भावनेतून अंत्यविधीसाठी मोफत सरण देण्याचा उपक्रम कोगे (ता. करवीर) गावात ग्रामपंचायत, तरुण मंडळे व ज्योतिर्लिंग विकास सेवा संस्था यांच्या पाठबळावर सरदार शामराव पाटील हा युवक स्वखर्चाने राबवत आहे. सलग चार वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे.
कोगे गावात २००९ साली एका मयत व्यक्तीला अंत्यविधीसाठी जळण न मिळाल्याने दोन तास ग्रामस्थ थांबले. या घटनेने व्यथित झालेल्या सरदार शामराव पाटील याने गावात अंत्यविधीसाठी लागणारे सरण मोफत आणि स्वखर्चाने देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला प्रारंभी काही लोकांचा विरोध होता; पण नंतर ग्रामस्थांनी एक विधायक उपक्रम म्हणून याला साथ देण्यास सुरूवात केली.
तरुणवर्गाच्या पाठबळामुळे आणि ग्रामपंचायत, ज्योतिर्लिंग विकास सेवा संस्था, यशवंतराव अतिग्रे पाणीपुरवठा संस्था, सर्व दूध संस्था, पतसंस्था, शिवशाहू विचारमंच, मित्रप्रेम स्पोर्टस् यांच्या सहकार्यामुळे या उपक्रमाला चालना मिळाली. ज्योतिर्लिंग विकास सेवा संस्थेने एक रिकामा हॉल शेणी व लाकडे जमा करण्यासाठी दिल्या. या पे्ररणेतून सरदार पाटील यांच्या अंत्यविधीसाठी मोफत सरण उपक्रमाला बळ मिळाले. होळी सणानिमित्त गावात पाचशेणी होळीकरिता देऊन बाकीच्या शेणी ग्रामपंचायतीकडे दान करतात. ग्रामपंचायतीतर्फे उत्सव व महाप्रसादावेळी शिल्लक राहिलेली जळाऊ लाकडे ग्रामपंचायत लिलाव घेऊन अंत्यविधीच्या उपक्रमाला दान देतात.
सरदार पाटील गावातील महिलांनी लावलेल्या शेणी स्वत: विकत घेऊन ते हजेरीने माणसांकडून हॉलमध्ये शेणी रचतात. हॉलमध्ये सुमारे ३५ हजार शेणी, पाच टन लाकडे साहित्य आहे. ग्रामपंचायतीमार्फत हा शेणी दान उपक्रम घेऊन शेणी लाकडे अंत्यविधीसाठी दान करतात.
वाढत्या महागाईच्या काळात गोरगरीब लोकांच्या मयत व्यक्तींना सरणासाठी जळण मिळणे कठीण होते. एका प्रसंगातून मनाला खूप वेदना झाल्या आणि मनात विचार केला की, अंत्यविधीसाठी गावात मोफत सरण हा उपक्रम राबवण्याचा. गेल्या चार वर्षांपासून हा उपक्रम राबवत आहे. यासाठी ग्रामपंचायत, सेवा संस्था, तरुण मंडळे यांनी मला साथ दिली. एक पुण्याईचे काम म्हणून मी ही चळवळ सुरू केली आहे.
- सरदार शामराव पाटील,
शेतकरी, कोगे.