शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

दिलासा; इचलकरंजी विभागातील 'इतके' कृषिपंपधारक झाले थकबाकीमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2021 20:05 IST

कोल्हापूर : महावितरणच्या इचलकरंजी विभागातील अब्दुललाट शाखेतील ४५ कृषिपंपधारक शेतकरी ११ लाख १८ हजार रुपयांचे थकीत वीजबिल एकरकमी भरून ...

कोल्हापूर : महावितरणच्या इचलकरंजी विभागातील अब्दुललाट शाखेतील ४५ कृषिपंपधारक शेतकरी ११ लाख १८ हजार रुपयांचे थकीत वीजबिल एकरकमी भरून थकबाकीमुक्त झाले आहेत. कृषी धोरणांतर्गत ५० टक्के अनुदानाचा लाभ घेतल्याबद्दल या शेतकऱ्यांचा कोल्हापूर परिमंडलाचे अधीक्षक अभियंता अंकूर कावळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.कृषिपंपातील थकबाकी वसुली करण्याच्या उद्देशाने गेल्यावर्षीपासून थकबाकीचा भरणा केल्यास ५० टक्के माफी देण्याचे नवे कृषी धोरण जाहीर झाले. याचा लाभ शेतकरी घेत आहेत. यासंदर्भात महावितरणकडून मेळावे घेऊन शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले जात आहे. शुक्रवारी अब्दुललाट शाखेंतर्गत येणाऱ्या लाटवाडी, शिरदवाड, शिवनाकवाडी या गावांतील ४५ शेतकऱ्यांनी पहिल्याच टप्प्यात लाभ घेतला. आतापर्यंत या योजनेचा या शाखेतील ११९२ शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे.थकबाकीनिमित्त घेतलेल्या मेळाव्याला इचलकरंजी विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत राठी, उपकार्यकारी अभियंता सुनील आकीवाटे, सुभाष बिरनाळे, लिपिक दगडू हंकारे, शाखा अभियंता शिवराज पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरीmahavitaranमहावितरण