शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

जागे व्हा, नाही तर अस्थी कलश मंत्रालयात ठेवू, शेतकऱ्यांचा ठाकरे सरकारला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2022 11:28 IST

बीडमधील नामदेव जाधव या तरुण शेतकऱ्याने उसाचा फड पेटवून आत्महत्या केली होती. त्यांचा अस्थींचे पंचगंगा घाटावर विसर्जन करण्यात आले.

कोल्हापूर : अतिरिक्त उसाच्या प्रश्नावर सरकार अजूनही जागे होणार नसेल तर अस्थिकलश थेट मंत्रालयात आणून ठेवू, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. बीडमधील नामदेव जाधव या तरुण शेतकऱ्याने उसाचा फड पेटवून आत्महत्या केली होती. त्यांचा अस्थिकलश काल, रविवारी दुपारी कोल्हापुरात आला. नर्सरी बागेत शाहू समाधीस्थळी अभिवादन करून कलशातील अस्थींचे पंचगंगा घाटावर विसर्जन करण्यात आले. शेतकरी कामगार पक्ष, बळीराजा संघटना, मराठा महासंघ, मल्हार सेना, जय शिवराय शेतकरी संघटनेने यात सहभाग घेतला.

राज्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न गंभीर झाला आहे. लाखो टन ऊस शेतात तसाच ठेवून कारखाने बंद झाले आहेत. या उसाचे करायचे काय, असा प्रश्नाने शेतकरी हतबल झाला आहे. तरीही सरकारला याकडे बघायला वेळ नाही. मशीद, भोंगे, मंदिर या प्रश्नात सरकार अडकून पडले आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे कुणीही पाहायला तयार नाही, या उद्विग्नतेतून नामदेव जाधव या तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली. या घटनेनंतर तर शेतकऱ्यांत संतापाची भावना आहे. त्यांचा अस्थिकलश राज्यभर फिरवला जात आहे. रविवारी हा कलश कोल्हापुरात आला.यावेळी शिवाजीराव माने, संपतराव पवार पाटील, बाबासो देवकर, बबन रानगे, वसंतराव मुळीक या कोल्हापुरातील नेत्यांबरोबरच यवतमाळचे सिकंदर शाह, परभणीचे माणिक कदम, कराडचे पंजाबराव पाटील, बी.जी. पाटील, विनायक पाटील यांनी पंचगंगा घाटावर जाऊन अस्थींचे विसर्जन केले. दरम्यान, सोमवारी कराडला प्रीतिसंगमावर अस्थींचे विसर्जन केले जाणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी