शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

जागे व्हा, नाही तर अस्थी कलश मंत्रालयात ठेवू, शेतकऱ्यांचा ठाकरे सरकारला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2022 11:28 IST

बीडमधील नामदेव जाधव या तरुण शेतकऱ्याने उसाचा फड पेटवून आत्महत्या केली होती. त्यांचा अस्थींचे पंचगंगा घाटावर विसर्जन करण्यात आले.

कोल्हापूर : अतिरिक्त उसाच्या प्रश्नावर सरकार अजूनही जागे होणार नसेल तर अस्थिकलश थेट मंत्रालयात आणून ठेवू, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. बीडमधील नामदेव जाधव या तरुण शेतकऱ्याने उसाचा फड पेटवून आत्महत्या केली होती. त्यांचा अस्थिकलश काल, रविवारी दुपारी कोल्हापुरात आला. नर्सरी बागेत शाहू समाधीस्थळी अभिवादन करून कलशातील अस्थींचे पंचगंगा घाटावर विसर्जन करण्यात आले. शेतकरी कामगार पक्ष, बळीराजा संघटना, मराठा महासंघ, मल्हार सेना, जय शिवराय शेतकरी संघटनेने यात सहभाग घेतला.

राज्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न गंभीर झाला आहे. लाखो टन ऊस शेतात तसाच ठेवून कारखाने बंद झाले आहेत. या उसाचे करायचे काय, असा प्रश्नाने शेतकरी हतबल झाला आहे. तरीही सरकारला याकडे बघायला वेळ नाही. मशीद, भोंगे, मंदिर या प्रश्नात सरकार अडकून पडले आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे कुणीही पाहायला तयार नाही, या उद्विग्नतेतून नामदेव जाधव या तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली. या घटनेनंतर तर शेतकऱ्यांत संतापाची भावना आहे. त्यांचा अस्थिकलश राज्यभर फिरवला जात आहे. रविवारी हा कलश कोल्हापुरात आला.यावेळी शिवाजीराव माने, संपतराव पवार पाटील, बाबासो देवकर, बबन रानगे, वसंतराव मुळीक या कोल्हापुरातील नेत्यांबरोबरच यवतमाळचे सिकंदर शाह, परभणीचे माणिक कदम, कराडचे पंजाबराव पाटील, बी.जी. पाटील, विनायक पाटील यांनी पंचगंगा घाटावर जाऊन अस्थींचे विसर्जन केले. दरम्यान, सोमवारी कराडला प्रीतिसंगमावर अस्थींचे विसर्जन केले जाणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी