शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
2
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
3
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, चंद्रकांतदादांच्या 'त्या' व्हिडीओवर म्हणाली..
4
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
5
₹450 कोटींचा बंगला अन् ₹639 कोटींचा डुप्लेक्स..; धनकुबेरांना आकर्षित करतेय वरळी 'सी फेस'
6
फक्त १० वर्षांत १ कोटीचा फंड कसा तयार करायचा? SIP मध्ये दरमहा किती गुंतवणूक करावी लागेल?
7
कंडोम बनवणाऱ्या कंपनीची कमाल...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; गेल्या महिन्यातच बाजारात उतरली, दिला बंपर परतावा
8
"मी सर्वात पहिले पलायन करणाऱ्या बॅचमधील...!"; मैथिली ठाकूरच्या निवडणूक लढण्यासंदर्भात वडिलांची पहिली प्रतिक्रिया, तुम्हीही भावूक व्हाल
9
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
10
माझी पत्नी रात्रीच्या वेळी बनते नागीण आणि..., भयभीत पतीने थेट DM यांनां केली अशी विनंती, प्रकरण काय  
11
"सगळेच लोक अत्यंत...!"; विरोधकांच्या 'मत चोरी'च्या आरोपांवर मैथिली ठाकुरचं मोठं विधान, स्पष्टच बोलली
12
जॉन क्लार्क, मिशेल एच. डेवोरेट आणि जॉन एम. मार्टिनिस यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर
13
न्यायाधीशाची न्यायालयातच गोळ्या घालून हत्या; पिता-पुत्रही जखमी, सुनावणी सुरू असताना घडली घटना
14
Chaitanyananda Saraswati : स्वयंघोषित बाबाचं 'फाईव्ह स्टार' सीक्रेट; डीनने मुलींना दिली हॉटेलमध्ये रात्र घालवण्याची धमकी
15
VIDEO: वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात राडा! खूपच संतापला, भरमैदानात पंचांशी वाद घातला...
16
लोनवर Hero Splendor खरेदी करण्यासाठी किती डाउन पेमेंट करावं लागेल? किती लागेल मंथली EMI, जाणून घ्या
17
"सरकारने आज घोषित केलेली मदत म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा, शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी देणार?’’, काँग्रेसचा सवाल   
18
मोदी सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्रासह या राज्यांमध्ये चार नवीन रेल्वे प्रकल्पांना मंजुरी
19
"शेतकऱ्यांना पंजाबपेक्षा जास्त मदत दिली, तुलना करण्यापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना सुनावलं
20
इतक्या कोटींची मालकीण आहे २५ वर्षीय मैथिली ठाकूर! एका शोचे मानधन किती? बिहार निवडणुकीमुळे चर्चेत

हसत-खेळत क्षमतावृद्धी : पावसामुळं घरात बसून ‘बोअर’ झालेल्या बच्चेकंपनीसाठी अनेक खेळ उपलब्ध

By admin | Updated: July 25, 2014 22:16 IST

‘लोकमत’संगे जाणून घेऊ

प्रगती जाधव-पाटील ल्ल सातारापावसाळा सुरू झाला की छोट्या मास्टर्सना घरगडात कैद करण्यात येते. कितीही इच्छा असली तरी पाऊस आणि वाऱ्यामुळे त्यांना बाहेर खेळायला पाठवले जात नाही. त्यामुळे या चिमुकल्यांचा वैताग वैताग होतो. घरात बसून मग टीव्हीवर कार्टून बघणं किंवा मग आई-वडिलांच्या महागड्या फोनवर चाळे करणं याशिवाय त्यांना कोणताच पर्याय राहत नाही. पालकांनी मुलांच्या या घरात राहण्याचा सदुपयोग करून घेतला तर मुलांच्या मानसिक जडण-घडणीत त्याचा खूप उपयोग होऊ शकतो.पावसाळा म्हणजे लहान मुलांना घरात कोंडून घालण्याचा ऋतू असाच पालकांचा समज असतो. या दिवसांमध्ये बाहेरच्या वातावरणामुळे मुलांचाही त्रागा होतो. या त्राग्यातून गमतीशीर मार्ग काढला तर मुलांसह पालकांचाही वेळ अगदी मजेत जाऊ शकतो. आपल्या पाल्याच्या आवडीचे आणि त्यांच्या सुप्त गुणांचा शोध घेण्यासाठी असे अनेक खेळ उपलब्ध आहेत. पालकांनी पाल्यासाठी आख्खा दिवस देण्यापेक्षा गुणात्मक एक तासाचा वेळ दिला तरी तो पुरेसा ठरू शकतो, हे यापूर्वीही सिध्द झाले आहे. मुलांच्या मानसिकतेचा अभ्यास करून त्यांच्याकडून रचनात्मकदृष्ट्या चांगले प्रयोग करण्यासाठी हे खेळ उपयुक्त ठरतात. याबरोबरच आपल्या मुलाची जडणघडण आणि पुढे काय सुधराणा व्हावी या दृष्टीनेही या खेळांच्या माध्यमातून पालकांना अभ्यास करता येऊ शकतो.-मुलांना कुठल्या वस्तूचे किती ज्ञान आहे, हे माहिती करून घेण्यासाठीही एक खेळ आहे. -घरात नेहमी वापरात असणाऱ्या वस्तू दाखवून मुलांना त्याविषयी तीन वाक्ये बोलायला सांगा.-मुलांच्या चाणाक्ष निरीक्षणातून अनेक वस्तूंचे धम्माल उपयोग समजतात. एका शिबिरात विद्यार्थ्यांना उलथने दाखविले. त्यावर एका मुलाने धम्माल वापर सांगिंतला. तो म्हणाला, ‘चपाती भाजायला, भाजी हलवायला आणि मला मार द्यायला!’ उलथन्याचा असाही वापर होऊ शकतो हे सर्वांना नव्यानेच समजले.खेळांतून म्हणींची ओळखअलीकडच्या मुलांना म्हणींचा वापर केवळ भाषा आणि परीक्षा एवढ्यापुरताच राहिला आहे. मुलांना वर्षानुवर्षे चालत आलेल्या म्हणी पाठ व्हाव्यात या उद्दशाने म्हणींचा खेळ खेळला जातो. साधारण वाचता येणाऱ्या दुसऱ्या तिसरीतील मुलांबरोबर हा खेळ खेळता येतो. यात एका म्हणीचे दोन भाग करायचे उदा. एका चिठ्ठीवर हातच्या काकणाला.. आणि दुसऱ्या चिठ्ठीवर आरसा कशाला... असे लिहायचे. जेवढे गडी त्याच्या निम्म्या म्हणी दोन चिठ्यांमध्ये लिहायच्या. त्यानंतर या चिठ्ठी एकत्र करून प्रत्येक मुलाला चिठ्ठी घ्यायला लावायची. म्हणीचे दोन भाग एकत्र करून त्या मुलांची जोडी शोधायला लावायची. यामुळे मुलांना आपल्या परिचयाचे नसलेल्या मित्रांची ओळख होते व म्हणीही समजतात. अनेक शिबिरांमध्ये खेळातील सवंगडी शोधण्यासाठी हा खेळ खेळला जातो.रचनात्मकता वाढविण्यासाठीमुलांमध्ये रचनात्मका वाढविण्यासाठी आणखी एक खेळ खुप उपयुक्त ठरतो. घरातील कोणत्याही वस्तु घेवून त्यापासून मनोरा किंवा रांग बनवायला मुलांना सांगायचे. ज्याची रांग मोठी असेल तो त्यातील विजेता घोषित करायचे. घरात फळीवरील एक ना एक वस्तु खाली येईल आणि मुलं आपले मनोरे किंवा रांग तयार करण्यात मग्न होतील. काहीजण रांग सरळ करतील, कोणी नागमोडी करेल, कोणी आडवा मनोरा करेल तर कोणी उंच मनोरा करण्याच्या नाद राहिल. हे सगळं बघताना धम्माल वाटते. यातुन मुलांची रचनात्मकता वाढते. त्यानंतर ज्या वस्तु जिथून घेतल्या तिथे परत ठेवण्याचीही स्पर्धा घ्यायची. यामुळे पसारा आवरण्याची सवय लागते आणि घरातील वस्तुंची योग्य जागाही मुलांना समजते. हा खेळ आईचा त्रास कमी करणारा असल्याने पावसाळ्याच्या दिवसात खेळायला हरकत नाही.मालवण पाण्यामध्ये.... व्यक्तिमत्त्व ओळखण्यासाठीचा खेळ!दहा ते पंधरा वर्षे वयोगटातील मुलांसाठी ‘मालवण पाण्यामध्ये...’ हा खेळ व्यक्तिमत्त्व ओळख्णासाठी उपयुक्त आहे. जास्तीत जास्त मुलांना घेऊन हा खेळ खेळता येतो. यात प्रत्येकाने दुसऱ्याच्या व्यक्तिमत्त्वाचा धागा पकडून गाणे म्हणणे अपेक्षित आहे. उदा. मालवण पाण्यामध्ये किल्ला.. शिवाजी सांगा कसा शिरला... शिरला तर शिरला तो चिंटूला म्हणतो कसा... ‘ठंडे ठंडे पानी से नहाना चाहिये’. यात चिंटू नावाचा मुलगा गार पाण्याने आंघाळ करतो हे त्या मुलाचे वैशिष्ट्य असते. अशीच वैशिष्ट्ये अन्य मित्रांच्या बाबतीतही शोधून काढून मुले गाणी म्हणू शकतात. यासारखेच चार वाजले कोंबडा अरवाला... सखू गेली पाण्याला... सखूला तिकडे कोण भेटले... काया... काया काय म्हटली.... अगं सखू काया अशी कशी गेली वाया....! या प्रकारात मुलांनी कविता किंवा गाण्याचा काही भाग स्वत: संपादित करून म्हणणं अपेक्षित असते. यातही यमक जुळवून मुलं पालकांना थक्क करणारी धम्माल गाणी सादर करतात. आपल्या मुलातील हे साहित्याचं अंग अनेक पालकांना ज्ञात नसते. ते यामुळे पालकांच्या समोर येते.वस्तूची आवड आणि व्यक्तिमत्त्वचार पाच मुलांबरोबर घरात खेळता येण्यासारखा आणखी एक खेळ आहे. मुलांची मानसिकता ओळखण्यासाठी त्यांना घरातील कोणतीही एक वस्तू आणायला सांगा. मुलं जी वस्तू आणतात, त्यावरून त्यांचे व्यक्तिमत्व समजते. कोणी दगड आणून मला असे ‘स्ट्राँग’ व्हायचे आहे म्हणतात. कोणाला सुईसारखे लहान व्हायचे असते तर कोणाला फुलासारखे ‘प्रिटी’ व्हायचे असते. यातून मुलांचा कलही समजतो.पेपर, टाचणी, कात्री अन् डिंकलहान मुलांमधील रचनात्मक गुण वृध्दिंगत करायचा असेल तर घरात उपलब्ध असलेल्या कागद, टाचणी, कात्री आणि डिंक मुलांसमोर ठेवा. याच्या माध्यमातून त्यांना काहीही बनवायला सांगा. आपल्या कल्पनेशक्तीनुसार मुलं छान छान कलाकृती तयार करतात. कोणी जोकरची टोपी बनवतं, कोणी रूमाल तर कोणी होडी बनवतं. मुलांनी जी काही वस्तू बनविली असेल त्याचे कौतुक पालकांनी केले पाहिजे. नेमकी हीच वस्तू का बनवावीशी वाटली हे विचारले तर मुलं आपल्या विचारशक्तीच्या पलीकडली उत्तरे देऊन पालकांना स्तब्ध करतात.स्मरणशक्ती वाढविण्यासाठीही खेळ...-साधारण तीन ते दहा वर्षांपर्यंत मुलांच्या मेंदूची वाढ झपाट्याने होत असते. या काळात जर त्यांना स्मरणशक्ती वाढविण्याचे खेळ खेळायला दिले तर तो त्यांच्या मेंदूसाठी व्यायाम ठरतो. पावसाळ्याच्या दिवसात तर मुलांच्या मित्र-मैत्रिणींबरोबर हा खेळ खेळता येऊ शकतो. -एका टेबलवर घरातील विविध प्रकारच्या दहा ते पंधरा वस्तू ठेवा. एकाच वेळी मुलांना या सगळ्या वस्तू बघून लक्षात ठेवायला सांगा. त्यानंतर दोन मिनिटाचा वेळ देऊन पाहिलेल्या वस्तू लिहून ठेवायला सांगा. जो सर्वाधिक वस्तू लक्षात ठेवेल त्याला बक्षिस म्हणून खाऊ द्या. ज्या मुलांना लिहिता येत नाही अशांना या वस्तूंची नावे सांगायला लावा. दोन-तीनदा खेळल्यानंतर मुलं वस्तू लक्षात ठेवून पटापट सांगू लागतात. हा स्मरणशक्तीचा उत्कृष्ट व्यायाम मानला जातो.लहानमुलांमध्ये शिकण्याची भरपूर तयारी असते. त्यांची स्मरणशक्ती अफाट असते. त्यांना नवनवीन गोष्टी पाहायला आणि शिकायला खूप आवडतात. आपल्या कितीतरी पट अधिक त्यांची कल्पनाशक्ती कार्यरत असते. म्हणूनच विद्यार्थ्यांचे खेळाचे शिबिर घेताना त्यांना शिकविण्यापेक्षा आपले शिकणे अधिक होते. छोट्या-छोट्या गोष्टींतून मुलांचे धम्माल खेळ होतात. घरात पसारा आवरायचा असला तरी विद्यार्थ्यांना वस्तू नीट ठेवायचा खेळ खेळू या का, म्हटलं की ते हो म्हणतात आणि बघता-बघता पसारा जैसे थे होतो. - कैलास जाधव, शिबिर प्रशिक्षकउन्हाळ्याच्या सुट्टीत एक दिवसाच्या शिबिराला मी गेले. तिथे माझ्याच वयाच्या बऱ्याच मित्र मैत्रिणींबरोबर एक दिवस धम्माल केली. जोड्या लावणं, वस्तू निवडणं, टेबलावरच्या वस्तू लक्षात ठेवणं, पार्टनर ओळखणं यासारखे असंख्य खेळ आम्ही खेळलो. मला दगडासारखे स्ट्राँग बनायचे आहे. म्हणून तुला काय आवडते म्हटल्यावर मी ‘दगड’ असे उत्तर दिले. पावसात आई-बाबा घराबाहेर पाठवत नाहीत. मग मी आणि माझा दादा घरात यातले बरेच खेळ खेळतो. मला त्यातला वस्तू लक्षात ठेवून सांगणं आणि पसारा करणं हा खेळ आवडतो.- स्वरा तपासे, विद्यार्थीनी