शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

Kolhapur: पुराच्या पाण्यातून शेताकडे जाताना ट्रॅक्टर उलटला, एकाचा मृत्यू; दोघे बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2024 12:52 IST

पाचजण सुदैवाने बचावले, बेपत्ता झालेल्यांचा शोध सुरू

कुरुंदवाड/ दत्तवाड : अकिवाट ( ता. शिरोळ) येथे कृष्णा नदीच्या पुराच्या पाण्यातून जाताना ट्रॅक्टर उलटल्याने नऊजण बुडाले. एकाचा मृत्यू , एक गंभीर, तर दोघेजण बेपत्ता आहेत. अन्य पाच जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास अकिवाट-बस्तवाड रस्त्यावर अकिवाट ओढ्यावर ही घटना घडली. सुहास पाटील (वय ५०, रा. अकिवाट) असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे, तर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य इकबाल बैरगदार व माजी सरपंच आण्णासाहेब हसुरे दोघेजण बेपत्ता आहेत, तर ट्रॅक्टरचालक रोहिदास माने गंभीर जखमी आहे. एनडीआरएफ व रेस्क्यू फोर्सच्या जवानांनी एकूण सात बोटींच्या साहाय्याने दिवसभर कृष्णा नदीपात्रात शोधमोहीम राबविण्यात आली होती. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी अमोल येडगे, पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धैर्यशील माने, तहसीलदार अनिलकुमार हेळकर घटनास्थळी दाखल झाले होते.आण्णासाहेब हसुरे यांची बस्तवाड रस्त्याला शेती असून, शेतात केळीचे पीक आहे. कृष्णा नदीच्या पुराचे पाणी या रस्त्यावर असल्याने हसुरे यांनी केळीचे घड काढण्यासाठी ट्रॅक्टरमध्ये केळी तोडणीचे कामगार प्रदीप पाटील, अंगद मोहिते व अझहर मुजावर यांना घेऊन जात होते. ट्रॅक्टर असल्याने गावचा पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी सरपंच वंदना पाटील यांचे पती सुहास पाटील, इकबाल बैरगदार, तंटामुक्त समिती अध्यक्ष श्रेणिक चौगुले, अरुण कोथळी ट्रॅक्टरमध्ये बसले, तर ग्रामपंचायत कर्मचारी अरुण कांबळे व सुहास माने चालकाला वाट दाखवत पुढे जात होते. पुलावर पुढे जात असताना पाण्याच्या प्रवाहाने ट्रॅक्टरचे चाक अलगद उचलल्याने ट्रॅक्टर उलटला.यावेळी काहीजण पोहत काठावर आले तर काहीजणांना मच्छीमारांनी बाहेर काढले. तोंडात, नाकात पाणी गेल्याने सुहास पाटील व रोहिदास माने बेशुद्ध झाले होते. त्यांना उपचारासाठी नेत असताना पाटील यांचा मृत्यू झाला तर चालक माने याच्यावर कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

२००५ च्या महापुरातील घटनेची पुनरावृत्ती२००५ च्या महापुरात राजापूरमधील लोकांना बोटींच्या साहाय्याने बाहेर काढताना लष्करी बोट बुडाल्याने एका मुलासह दहा जणांचा मृत्यू झाला होता. याच परिसरात महापुराने पुन्हा एकदा दुर्घटना घडली आहे. त्यामुळे २००५ च्या महापुरातील घटनेची पुनरावृत्ती झाल्याची चर्चा परिसरात होती.

बेपत्ता झालेल्यांचा शोध सुरूबेपत्ता असलेल्यांचा शोध घेण्यासाठी कृष्णा नदीत एनडीआरएफच्या तुकड्या, रेस्क्यू फोर्स, व्हाइट आर्मीचे जवान सात यांत्रिक बोटींच्या साहाय्याने शोधमोहीम करत होते. मात्र सायंकाळपर्यंत त्यांना यश आले नव्हते.

अन् उपसरपंच थांबलेगावचा पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी मृत पाटील यांच्याबरोबर उपसरपंच आप्पासाहेब म्हैशाळेही जाणार होते. मात्र सकाळीच त्यांच्या पायाला दुखापत झाल्याने उपचारासाठी दवाखान्यात गेल्याने या दुर्घटनेतून ते वाचले. त्यामुळे काळ आला होता मात्र वेळ आली नव्हती याची प्रचिती त्यांना आल्याची गावात चर्चा आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfloodपूरdrowningपाण्यात बुडणे