शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

कोल्हापुरात केएमटीचे सहाशे कर्मचारी संपावर, प्रवाशांची गैरसोय होणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2023 12:20 IST

३० नोव्हेंबरपर्यंत मागण्यावर तोडगा काढण्याचे लेखी आश्वासन प्रशासनाने दिले होते

कोल्हापूर : केएमटी कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत ३० नोव्हेंबरपर्यंत ठोस निर्णय घेण्याचे आश्वासन देऊनही महापालिका प्रशासनाने बोळवण केल्यामुळे केएमटीच्या ऑफीस, वर्कशॉप, वाहतूक विभागातील सुमारे ६०० कर्मचारी गुरुवारी मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर गेले. त्यामुळे आज, शुक्रवारपासून, शहरातील केएमटीची बस सेवा खंडित होणार आहे. सध्या लग्नसराईचे दिवस आहेत, शाळा महाविद्यालयेही दिवाळीच्या सुट्टीनंतर सुरू झाली आहेत. अशा परिस्थितीत संप सुरू झाल्याने प्रवाशी वर्गाची गैरसोय होणार आहे.महानगरपालिका परिवहन विभागाच्या (केएमटी) कर्मचाऱ्यांनी आपल्या न्याय मागण्याबाबत प्रशासनाला दिवाळी सणाच्या तोंडावर निवेदन देऊन संपावर जाण्याचा निर्णय घेतला होता. तथापि, प्रशासक के. मंजूलक्ष्मी रजेवर असल्याने त्यावेळी निर्णय घेणे अवघड झाले होते. तेंव्हा ३० नोव्हेंबरपर्यंत मागण्यावर तोडगा काढण्याचे लेखी आश्वासन प्रशासनाने दिले होते. त्यामुळे तात्पुरता संप स्थगित करण्यात आला होता.परंतु ३० नोव्हेंबरपर्यंत प्रशासनाने कोणताही ठोस निर्णय घेतला नसल्याने दुपारपासूनच केएमटी कर्मचाऱ्यांत नाराजी पसरली. दुपारच्या पाळीत कामावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांनी अचानक रजा घेतल्याने अनेक मार्गावरील बसगाड्या कर्मचाऱ्यांअभावी बंद झाल्या. रात्री मुक्कामाला जाणाऱ्या १८ गाड्या कर्मचाऱ्यांमुळे जाऊ शकल्या नाहीत. मध्यरात्रीपासून सर्व कर्मचारी संपावर जात असल्याचे म्युनिसिपल ट्रान्स्पाेर्ट वर्कर्स युनियनचे अध्यक्ष निशिकांत सरनाईक यांनी जाहीर केले.राेजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करण्याबाबत उच्च तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निकाल पाहून तसेच राज्य सरकारची परवानगी घेऊन प्रक्रिया राबविण्यात येईल, असे प्रशासनाकडून गुरुवारी सांगण्यात आले. त्यावर युनियनने आस्थापनावरील सर्व पदे यापूर्वीच मंजूर असून रिक्त झालेल्या पदावर नियुक्ती करायची असल्याने पुन्हा सरकारची परवानगी घेण्याची आवश्यकता नसल्याचे सरनाईक यांनी प्रशासनाला सांगितले. तरीही प्रशासनाने आपली भूमिका बदललेली नाही. केएमटीकडे कंडक्टरची ८१ तर चालकांची ८० पदे रिक्त आहेत. ती भरावीत अशी प्रमुख मागणी युनियनने केली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरStrikeसंप