शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

कोल्हापुरात एकच चर्चा, मराठा मोर्चा

By admin | Updated: October 15, 2016 00:46 IST

सकल मराठा मोर्चा : आज दुमदुमणार मराठी मनाचा नि:शब्द हुंकार; अभूतपूर्व आणि उत्कंठावर्धक वातावरण

कोल्हापूर : गेल्या महिन्याभरापासून बैठका-मेळावे, पदयात्रांतून मराठा मोर्चाबद्दल झालेली प्रचंड जनजागृती, त्यातून उफाळून आलेला मराठ्यांचा स्वाभिमान, मोर्चाच्या संयोजनात अन्य जातिधर्मांच्या समाजाने घेतलेला सक्रिय सहभाग, मोर्चाची घटिका जवळ येईल तसा शिगेला पोहोचलेला आबालवृद्धांचा उत्साह, शहरात उभारलेले भगवे ध्वज, डिजिटल फलक अशा अभूतपूर्व आणि उत्कंठावर्धक वातावरणाने अवघी शाहूनगरी शुक्रवारी मराठामय झाली. संपूर्ण जिल्ह्याची स्थिती ‘एकच चर्चा, मराठा मोर्चा’ अशी झाली होती आणि मोर्चात किती लाख लोक येणार याबाबतच्या अंदाजाचे मनोरे रचले जात होते. कोल्हापूरच्या इतिहासात मागच्या हजारो वर्षांत असा मोर्चा निघाला नाही आणि पुढच्या हजारो वर्षांत तो निघणार नाही, इतका प्रचंड प्रतिसाद तमाम कोल्हापूरवासीयांकडून या मोर्चाला मिळाला असल्याने जिल्हा प्रशासनासह पोलिस, महानगरपालिका प्रशासनही कमालीच्या तणावाखाली आले आहे. केवळ मोर्चा निघून चालणार नाही, तर मोर्चासाठी आलेले सर्व लोक अतिशय सुरक्षितपणे आपापल्या घरी गेले पाहिजेत, यासाठी सर्व पातळ्यांवर विशेष दक्षता घेतली जात आहे. यासाठी केवळ प्रशासनाचेच नाही तर लाखो स्वयंसेवकांचे हात गेल्या महिन्याभरापासून अव्याहतपणे राबत आहेत. मोर्चाची तयारी पूर्ण झाली असली तरी त्याच्या यशस्वितेसाठीची धावपळ आणि घालमेल मात्र शुक्रवारी अवघ्या मराठी मनांवर दिसून आली. कुतूहल, उत्कंठा, धावपळ, हुरहूर अशा शब्दांचे ओझे घेऊनच शुक्रवारचा दिवस उजाडला. दिवसभर मराठा मोर्चाच्या तयारीसाठी उभारलेल्या कार्यालयांत नेहमीपेक्षा अधिकच धावपळ पाहायला मिळत होती. गेल्या काही दिवसांपासून आलेले भगवे ध्वज, स्टिकर्स, पोस्टर्स, भगव्या टोप्या, झेंड्यासाठी लागणाऱ्या काठ्या, स्वयंसेवकांचे टी शर्टस्, ओळखपत्रे, आदी साहित्यांचे वाटप या कार्यालयांतून होताना दिसत होते. आजच्या मोर्चात स्वयंसेवकांनी कोणती कामे करायची आहेत, याच्या माहितीसह त्यांनी कुठे उभे राहायचे याचीही माहिती कार्यालयातून देण्यात येत होती. आजच्या मोर्चावेळी अंगात काळे टी-शर्ट, हातांत भगवे ध्वज व डोक्यावर भगवी टोपी घालून येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे या साहित्यालाही बाजारपेठेत मोठी मागणी दिसून आली. या संधीचे सोने करत शहराच्या विविध भागांत विशेषत: बिंदू चौक, शिवाजी पुतळा, राजारामपुरी, लक्ष्मीपुरी, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार, ताराबाई रोड, रुईकर कॉलनी, महापालिका चौक येथे मोठ्या प्रमाणात विक्रेत्यांनी ध्वज, टोप्या, टी शर्टस्चे स्टॉल्स लावल्याचे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे जनतेतून खरेदीचा उत्साहही मोठा होता. शहरात चोहोबाजूंनी भगवे ध्वज लावले गेले आहेत. (प्रतिनिधी) आजच्या मोर्चावेळी शहरात ‘नो व्हेईकल डे’ घोषित करण्यात आला आहे. शहरातील नागरिकांनी आपली वाहने बाहेर काढायची नाहीत, तर बाहेरून येणारी वाहने आत शहरामध्ये घेतली जाणार नाहीत. शहराचे प्रमुख प्रवेशमार्ग असलेल्या नऊ रस्त्यांसह लहान-मोठ्या १०० रस्त्यांवर लकडकोट उभारले गेले आहेत. या कामास महानगरपालिका बांधकाम विभागाने शुक्रवारी सकाळपासून सुरुवात केली आणि रात्री बारा वाजता सर्व काम पूर्ण केले. लकडकोट उभारण्याच्या कामात चारीही विभागीय कार्यालयांचे सुमारे २०० हून अधिक कर्मचारी व्यस्त होते. त्याशिवाय मोर्चा मार्गावर नियंत्रण ठेवण्याकरिता ३२ ठिकाणी टेहळणी मनोरे उभे केले आहेत. फूटपाथवरील गटारींची १०० हून अधिक झाकणे बदलण्यात आली आहेत. गेल्या दोन दिवसांत रस्त्यांचे डांबरी पॅचवर्कही करण्यात आले. अवघे कोल्हापूर स्वच्छ मोर्चाच्या निमित्ताने गेल्या दोन दिवसांपासून संपूर्ण शहरात स्वच्छता मोहीम व्यापक प्रमाणावर राबविली जात होती. महापालिका आरोग्य विभागाचे १६ आरोग्य निरीक्षक, ८० मुकादम आणि १२०० सफाई कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले. अडीचशे टन कचरा उठाव केल्याचे सांगण्यात आले. आरोग्य विभागाने १५०० सीटची शौचालये भाड्याने घेतली असून ती मोर्चामार्गावर ठेवली आहेत. ३७ ठिकाणी कनात उभी करून तात्पुरत्या स्वच्छतागृहांची सोय केली आहे. शहरातील २० ‘पे अ‍ॅँड युज’ स्वच्छतागृहे शुक्रवारी विनाशुल्क उपलब्ध करून दिली आहेत. याशिवाय शहरातील सर्व हॉटेल्स, सर्व मंगल कार्यालयांतील सुमारे १२०० स्वच्छतागृहे खुली करण्यात आली आहेत. महापालिकेने या सर्वांना लेखी नोटीस दिली आहे. शहरात सर्वत्र औषध व डीडीटी पावडर फवारणी करण्यात आली आहे. गांधी मैदान टकाटक मोर्चाची सुरुवात कुठून होणार हे लवकर निश्चित झाले नाही. गेल्या चार दिवसांत गांधी मैदान तसेच ताराराणी चौकाची घोषणा करण्यात आली. महापालिकेने गांधी मैदानावरील वाढलेले गवत तत्काळ काढून डोझर, पोकलॅन, रोलर अशी यंत्रसामग्री लावून मैदानाचे सपाटीकरण केले. मैदानाच्या चारी बाजूंच्या पायऱ्यांवरील गवत काढले, साचलेला कचरा उपसला. त्यामुळे दोन दिवसांत गांधी मैदान कात टाकून मोर्चाच्या सेवेला सज्ज झाले. स्वच्छतेमुळे संपूर्ण शहराबरोबरच गांधी मैदानही टकाटक झाले आहे.